शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांची ८ फेब्रुवारीपासून कल चाचणी

By admin | Updated: February 2, 2016 00:08 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळांमध्ये दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या (मानसशास्त्रीय चाचण्या) ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान घेतल्या जाणार आहे.

मानसशास्त्रीय चाचण्या : व्यवसाय शिक्षण निवडण्यासाठी निर्णायकअमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळांमध्ये दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या (मानसशास्त्रीय चाचण्या) ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान घेतल्या जाणार आहे. या चाचण्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यवसायिक क्षेत्राची निवड करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी आहे. तेथूनच विद्यार्थी शैक्षणिक व व्यवसायिक क्षेत्राच्या निवडीला प्रारंभ करतात. मात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन न मिळाल्यास ते चुकीच्या विषयाकडे वळतात. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये ताण व नैराश्याचे प्रमाण वाढायला लागते. या प्रकाराला आळा घालून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य ठरेल, या दृष्टीने कल चाचणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अनुषंगाने २ महिन्यांपासून कलचाचणी घेण्याची तयारी शिक्षण विभागाद्वारा सुरू आहे. यासाठी ९ ते २३ डिसेंबर २०१५ या कालावधीत राज्यातील प्रत्येक शाळेमधील सर्व संगणकांचे आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हास्तरावर जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयकाची निवड करून एक समिती गठित करण्यात आली आहे. याअंतर्गत प्रत्येक मुख्याध्यापकांना तसेच निवडण्यात आलेल्या संगणक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कल चाचण्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या चाचण्या आॅनलाईन व आॅफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे व ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.(प्रतिनिधी)१५२ प्रश्न, ४० मिनिटांचा राहणार वेळविद्यार्थ्यांच्या कल ओळखण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मानसशास्त्रीय चाचणीमध्ये एकूण १५२ प्रश्न राहणार आहे. विद्यार्थ्यांना ४० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. तसेच दहावीच्या निकालापासून विद्यार्थ्यांना कल चाचणीचे रिपोर्ट कार्ड मिळणार आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक किंवा व्यवसायिक क्षेत्राची निवड करताना विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. निर्धारित वेळेत या कल चाचण्या होणार आहेत व चाचणीदरम्यान विद्यार्थ्यांना कुठलाही ताण येऊ नये, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. - सी. आर. राठोड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)