शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

दहावीच्या विद्यार्थ्यांची ८ फेब्रुवारीपासून कल चाचणी

By admin | Updated: February 2, 2016 00:08 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळांमध्ये दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या (मानसशास्त्रीय चाचण्या) ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान घेतल्या जाणार आहे.

मानसशास्त्रीय चाचण्या : व्यवसाय शिक्षण निवडण्यासाठी निर्णायकअमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळांमध्ये दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या (मानसशास्त्रीय चाचण्या) ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान घेतल्या जाणार आहे. या चाचण्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यवसायिक क्षेत्राची निवड करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी आहे. तेथूनच विद्यार्थी शैक्षणिक व व्यवसायिक क्षेत्राच्या निवडीला प्रारंभ करतात. मात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन न मिळाल्यास ते चुकीच्या विषयाकडे वळतात. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये ताण व नैराश्याचे प्रमाण वाढायला लागते. या प्रकाराला आळा घालून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य ठरेल, या दृष्टीने कल चाचणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अनुषंगाने २ महिन्यांपासून कलचाचणी घेण्याची तयारी शिक्षण विभागाद्वारा सुरू आहे. यासाठी ९ ते २३ डिसेंबर २०१५ या कालावधीत राज्यातील प्रत्येक शाळेमधील सर्व संगणकांचे आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हास्तरावर जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयकाची निवड करून एक समिती गठित करण्यात आली आहे. याअंतर्गत प्रत्येक मुख्याध्यापकांना तसेच निवडण्यात आलेल्या संगणक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कल चाचण्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या चाचण्या आॅनलाईन व आॅफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे व ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.(प्रतिनिधी)१५२ प्रश्न, ४० मिनिटांचा राहणार वेळविद्यार्थ्यांच्या कल ओळखण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मानसशास्त्रीय चाचणीमध्ये एकूण १५२ प्रश्न राहणार आहे. विद्यार्थ्यांना ४० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. तसेच दहावीच्या निकालापासून विद्यार्थ्यांना कल चाचणीचे रिपोर्ट कार्ड मिळणार आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक किंवा व्यवसायिक क्षेत्राची निवड करताना विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. निर्धारित वेळेत या कल चाचण्या होणार आहेत व चाचणीदरम्यान विद्यार्थ्यांना कुठलाही ताण येऊ नये, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. - सी. आर. राठोड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)