शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

दहावी, बारावीच्या पहिल्यांदाच २८३० केंद्रांवर परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:13 IST

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल आणि बारावीची लेखी परीक्षा ...

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल आणि बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिलपासून होऊ घातली आहे. कोरोना संसर्गाच्या विळख्यामुळे प्रवेशित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयेच परीक्षा केंद्रे राहतील, असा निर्णय झाला आहे. यामुळे अमरावती विभागात पहिल्यांदाच तब्बल २८३० केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

विभागीय शिक्षण मंडळाने अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. शिक्षण मंडळाने कोविड-१९ च्या अनुषंगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे परीक्षा केंद्रांवर पालन होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. नियमित विद्यार्थ्यांना परीक्षेत अर्धा तास व अपंग विद्यार्थ्यांना एक तास अधिक वेळ देण्यात येणार आहे.

विभागात दहावीच्या एकूण २६६८ शाळांची नोंद आहे. गतवर्षी दहावीच्या परीक्षेसाठी ७१६ केंद्रे होती. मात्र, यंदा २५३६ परीक्षा केंद्रे असतील. १८२० केंद्रे वाढली आहेत. १३२ शाळांना विद्यार्थिसंख्या अथवा तांत्रिक कारणांनी डच्चू देण्यात आला आहे.

अमरावती विभागात बारावीसाठी एकूण १५७२ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यापैकी १५१४ परीक्षा केंद्रे राहतील. ५८ कनिष्ठ महाविद्यालयांना वंचित ठेवण्यात आले आहे. गतवर्षी बारावीसाठी ५०४ केंद्रे होती. यंदा १०१० परीक्षा केंद्रे वाढली आहेत.

--------------------

विभागात असे आहेत परीक्षार्थी

दहावी : १,६४, ६३२

बारावी : १,३७, ५६९

------------------

राज्य शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षांचे नियोजन सुरू आहे. दहावीसाठी १८२०, तर बारावी परीक्षेसाठी १०१० केंद्रे वाढली आहेत. काही अपवाद वगळता प्रवेशित विद्यार्थ्यांना त्याच शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.

- शरद गोसावी, विभागीय अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ.