शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

बडनेऱ्यात दुकाने बंदच्या कारणावरून तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

‘सीएए’, ‘एनआरसी’ कायद्याला विरोध करणारा गट बुधवारी सकाळी ९ पासून एकवटला होता. बडनेऱ्याच्या जुनिवस्ती जलकुंभासमोरील अमरावती मार्गावर ये-जा करणाऱ्या ऑटोरिक्षाचालकांनी बंदसाठी पुढाकार घेतला होता. जमावातील काहींनी ऑटो रिक्षातून प्रवासी उतरविण्यापर्यंत मजल गाठल्याचे दिसून आले. मात्र, जमावात मोठी गर्दी झाल्यामुळे ऑटोरिक्षासह शहर बस, एसटी बसदेखील रोखून बंदचे समर्थन केले.

ठळक मुद्देदोन्ही गट आमने-सामने : आॅटो केले बंद, एसटी बस रोखल्या, प्रवाशांना नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या कारणावरून बुधवारी बडनेरा शहरात दुकाने बंद करताना तणावाची स्थिती निर्माण झाली होती. काही काळ दोन्ही गट आमने-सामने आले. मात्र, पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने तणाव निवळला. दरम्यान जमावाने जुनीवस्तील ऑटो बंद करतावेळी एसटी बस रोखल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.‘सीएए’, ‘एनआरसी’ कायद्याला विरोध करणारा गट बुधवारी सकाळी ९ पासून एकवटला होता. बडनेऱ्याच्या जुनिवस्ती जलकुंभासमोरील अमरावती मार्गावर ये-जा करणाऱ्या ऑटोरिक्षाचालकांनी बंदसाठी पुढाकार घेतला होता. जमावातील काहींनी ऑटो रिक्षातून प्रवासी उतरविण्यापर्यंत मजल गाठल्याचे दिसून आले. मात्र, जमावात मोठी गर्दी झाल्यामुळे ऑटोरिक्षासह शहर बस, एसटी बसदेखील रोखून बंदचे समर्थन केले. प्रवाशांना नाहक त्रास होत असल्याने पोलिसांनी जमावाला रस्त्याच्या बाजूला केले. रोखून ठेवलेल्या एसटी बस, ऑटो पुन्हा सुरू केले. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जमावाला संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा सल्ला दिला. ही लढाई केंद्र सरकारविरूद्ध असून, सामान्य माणसाला त्रास देऊ नका, अशी भूमिका घेतली. त्यानंतर जमावाने रस्त्यावरील गर्दी कमी केली. नवीवस्ती भागात जमावाने दुकाने बंद करताना बळजबरी केल्याच्या कारणावरून दोन्ही गट आमने-सामने आले होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास दबाव टाकून दुकाने बंद करण्यात आली. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. मात्र, या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नवीवस्तीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भाजप, सेनेसह व्यापारी एकवटले होते. बंद ठेवायचे की नाही? ही बाब ऐश्चिक असून, बळजबरी कशासाठी यावरून येथे दोन्ही गट आमने-सामने आलेत. काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ‘भारत माता की जय’, जय भवानी-जय शिवाजी’च्या नाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. घटनास्थळी हजर असलेले सहायक पोलीस आयुक्त शोहेल शेख, ठाणेदार शरद कुळकर्णी यांनी दोन्ही गटाची समजूत काढली. कालांतराने तणाव निवळला, हे विशेष.दुपारी १२ वाजेपर्यंत दुकाने बंद‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधात बडनेऱ्यात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जमावाने दुकाने बंद केल्यानंतर बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद कायम होता. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली असताना ते पुन्हा सुरू करा, अशा सूचना एका गटाने केल्यानंतरही व्यावसायिकांनी मात्र दुकाने दुपारी १२ वाजेनंतरच सुरू केल्याचे दिसून आले. बडनेऱ्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून होते.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद