शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

निविदा ‘मॅनेज’ कंत्राट निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:13 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ अंतर्गत ८३ कोटींच्या विविध विकासकामांसाठी अगोदर एजन्सी निश्चित केली, तर त्यानंतर कंत्राट सोपविले, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे८३ कोटींची कामे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात दोन महिन्यांपूर्वीच एजन्सी ठरली

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहराला पाणीपुरवठा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ अंतर्गत ८३ कोटींच्या विविध विकासकामांसाठी अगोदर एजन्सी निश्चित केली, तर त्यानंतर कंत्राट सोपविले, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब आ. सुनील देशमुख यांनी निदर्शनास आणली असून, मजीप्राच्या अधिकाऱ्यांचे पितळ त्याअनुषंगाने उघडकीस आले आहे, हे विशेष.मुख्य जलवाहिनीवर तांत्रिक दोष असलेले ८७ बोगस एअर व्हॉल्व्ह ८३ लाख रुपयांतून बसविण्यात आले आहेत. त्यानंतर मजीप्राच्या अफलातून कारभार समोर आला आहे. ‘अमृत’ अभियान अंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ मध्ये तब्बल ११४ कोटी रुपयांतून पाणीपुरवठा वितरण नलिकांचे कार्य नवीन जलकुंभ निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ८३ कोटींच्या कामांचा निर्णय घेण्यात आला. मात्र, जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्यासाठी अगोदरच नाशिक येथील मयूर व्हॉल्व्ह कंपनी निश्चित करण्यात आली. त्याकरिता मजीप्राने ३० आॅगस्ट २०१६ रोजी व्ही.ई.१६/१७ पीओ-०८ आदेशानुसार जलवाहिनीवर बसविलेल्या व्हॉल्व्हची तांत्रिक तपासणी केली, असा अहवाल डॉ. अमीन कंट्रोलर्स प्रा.लि. कंपनीने दिला आहे. मात्र, मजीप्राने १० आॅक्टोबर २०१६ रोजी पाणीपुरवठा कामांसंदर्भात नाशिक येथील मयूर कंपनीला एअर व्हॉल्व्ह बसविण्याबाबत कार्यारंभ आदेश दिले.खरे तर मजीप्राने ८३ लाख रुपयांतून जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. असे असताना नाशिक येथील पी.ए. आडके व वैद्य इलेक्ट्रिकल यांना दोन महिन्यांपूर्वीच मजीप्राला एअर व्हॉल्व्ह लागेल, हे कसे माहीत पडले, हा प्रश्न उपस्थित होत आहे. एअर व्हॉल्व्हसंदर्भात त्रयस्थ एजन्सीकडून तपासणी करण्यात आली असता, ही बाब निदर्शनास आली आहे. क्वॉलिटी कंट्रोलची तपासणी ३० आॅगस्ट २०१६, तर पाणीपुरवठा कार्यारंभ आदेश १० आॅक्टोबर २०१६ रोजी देण्यात आले आहे. त्यामुळे मजीप्राने अगोदर एजन्सी ठरविली, नंतर कामांचे आदेश दिले, हे स्पष्ट होते.व्हॉल्व्हची ही स्थिती; अन्य कामांचे काय?मजीप्राने जुनी जलवाहिनी बदलून त्याऐवजी ६०० किमी नवी जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. नव्याने सहा जलकुंभ, सिंभोरा येथे नवे पंप स्टेशन, तपोवन येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र आदी पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे सुरू आहेत. मात्र, जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्यात झालेली गडबड बघता, अन्य कामांमध्येही मोठा घोळ असल्याचा संशय वर्तविला जात आहे.व्हॉल्व्हचे क्वॉलिटी कंट्रोल ३० आॅगस्ट रोजी झाले, तर कामांचे कार्यारंभ आदेश १० आॅक्टोबर २०१६ रोजी देण्यात आले. दोन महिन्यांपूर्वीच एजन्सी ठरविण्याचा करिश्मा मजीप्राने केला आहे. नाशिक येथील एजन्सीला मजीप्राला अमूक साहित्य लागणार असल्याचे दोन महिन्यांपूर्वीच कळले.- सुनील देशमुखआमदार.