शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निविदा ‘मॅनेज’ कंत्राट निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:13 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ अंतर्गत ८३ कोटींच्या विविध विकासकामांसाठी अगोदर एजन्सी निश्चित केली, तर त्यानंतर कंत्राट सोपविले, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे८३ कोटींची कामे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात दोन महिन्यांपूर्वीच एजन्सी ठरली

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहराला पाणीपुरवठा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ अंतर्गत ८३ कोटींच्या विविध विकासकामांसाठी अगोदर एजन्सी निश्चित केली, तर त्यानंतर कंत्राट सोपविले, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब आ. सुनील देशमुख यांनी निदर्शनास आणली असून, मजीप्राच्या अधिकाऱ्यांचे पितळ त्याअनुषंगाने उघडकीस आले आहे, हे विशेष.मुख्य जलवाहिनीवर तांत्रिक दोष असलेले ८७ बोगस एअर व्हॉल्व्ह ८३ लाख रुपयांतून बसविण्यात आले आहेत. त्यानंतर मजीप्राच्या अफलातून कारभार समोर आला आहे. ‘अमृत’ अभियान अंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ मध्ये तब्बल ११४ कोटी रुपयांतून पाणीपुरवठा वितरण नलिकांचे कार्य नवीन जलकुंभ निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ८३ कोटींच्या कामांचा निर्णय घेण्यात आला. मात्र, जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्यासाठी अगोदरच नाशिक येथील मयूर व्हॉल्व्ह कंपनी निश्चित करण्यात आली. त्याकरिता मजीप्राने ३० आॅगस्ट २०१६ रोजी व्ही.ई.१६/१७ पीओ-०८ आदेशानुसार जलवाहिनीवर बसविलेल्या व्हॉल्व्हची तांत्रिक तपासणी केली, असा अहवाल डॉ. अमीन कंट्रोलर्स प्रा.लि. कंपनीने दिला आहे. मात्र, मजीप्राने १० आॅक्टोबर २०१६ रोजी पाणीपुरवठा कामांसंदर्भात नाशिक येथील मयूर कंपनीला एअर व्हॉल्व्ह बसविण्याबाबत कार्यारंभ आदेश दिले.खरे तर मजीप्राने ८३ लाख रुपयांतून जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. असे असताना नाशिक येथील पी.ए. आडके व वैद्य इलेक्ट्रिकल यांना दोन महिन्यांपूर्वीच मजीप्राला एअर व्हॉल्व्ह लागेल, हे कसे माहीत पडले, हा प्रश्न उपस्थित होत आहे. एअर व्हॉल्व्हसंदर्भात त्रयस्थ एजन्सीकडून तपासणी करण्यात आली असता, ही बाब निदर्शनास आली आहे. क्वॉलिटी कंट्रोलची तपासणी ३० आॅगस्ट २०१६, तर पाणीपुरवठा कार्यारंभ आदेश १० आॅक्टोबर २०१६ रोजी देण्यात आले आहे. त्यामुळे मजीप्राने अगोदर एजन्सी ठरविली, नंतर कामांचे आदेश दिले, हे स्पष्ट होते.व्हॉल्व्हची ही स्थिती; अन्य कामांचे काय?मजीप्राने जुनी जलवाहिनी बदलून त्याऐवजी ६०० किमी नवी जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. नव्याने सहा जलकुंभ, सिंभोरा येथे नवे पंप स्टेशन, तपोवन येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र आदी पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे सुरू आहेत. मात्र, जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्यात झालेली गडबड बघता, अन्य कामांमध्येही मोठा घोळ असल्याचा संशय वर्तविला जात आहे.व्हॉल्व्हचे क्वॉलिटी कंट्रोल ३० आॅगस्ट रोजी झाले, तर कामांचे कार्यारंभ आदेश १० आॅक्टोबर २०१६ रोजी देण्यात आले. दोन महिन्यांपूर्वीच एजन्सी ठरविण्याचा करिश्मा मजीप्राने केला आहे. नाशिक येथील एजन्सीला मजीप्राला अमूक साहित्य लागणार असल्याचे दोन महिन्यांपूर्वीच कळले.- सुनील देशमुखआमदार.