शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

तहसीलदार, नायब तहसीलदारावर तहसीलची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:09 IST

तहसीलचे कामकाज मंदावणार? १ जुलैपासून कामाचा खोळंबा: चांदूर बाजार : तालुक्यातील तहसील कार्यालयात १ जुलैपासून एक तहसीलदार व एक ...

तहसीलचे कामकाज मंदावणार?

१ जुलैपासून कामाचा खोळंबा:

चांदूर बाजार : तालुक्यातील तहसील कार्यालयात १ जुलैपासून एक तहसीलदार व एक नायब तहसीलदारावर तहसीलचा संपूर्ण कारभार चालविण्याची वेळ येणार असल्याने तहसीलचे कामकाज मंदावणार असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.

जिल्ह्यात चांदूरबाजार तालुका हा सर्वात मोठा आहे. यात ६ जिल्हा परिषद सर्कल असून, १२ पंचायत समिती गण आहेत. तालुक्यात १७१ गावे असून, शिरजगाव बंड, करजगाव, शिरजगाव कसबा, घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, आसेगाव आदी गावे मोठ्या लोकसंख्येची आहेत. स्थानिक तहसील कार्यालयात चार नायब तहसीलदारांचे पद मंजूर असून, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार गजानन पाथरे यांचा विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या अपघातामुळे ते दीर्घ रजेवर आहेत.

निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अर्जुन वांदे हे ३० मार्चला सेवानिवृत्त झाले, तर महसूल नायब तहसीलदार हे ३० जून रोजी निवृत्त होणार आहेत. निवासी नायब तहसीलदार संतोष कारसकर यांचाही पूर्वी अपघात झाला होता. आता ३० जूनला नायब तहसीलदार देवेन्द्र सवई निवृत्त होणार असल्याने एका तहसीलदार व एका नायब तहसीलदारांच्या भरवशावर तहसीलचा कारभार चालणार का, असा प्रश्न सामान्य जनतेमधून विचारला जात आहे.

नुकतेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. त्यामुळे रखडलेली कामे करण्यासाठी तहसीलमध्ये नागरिकांची अचानक गर्दी वाढली आहे. यात शेतकरी, विद्यार्थी, तसेच पक्षकारांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे तहसीलदारांना सहकारी असलेल्या नायब तहसीलदार असल्याशिवाय तहसीलचा कारभार पूर्णत: चालू शकत नाही. याकरिता नायब तहसीलदारांची रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक झाले आहे.

( निवासी नायब तहसीलदार संतोष कारसकर यांचाही पूर्वी अपघात झाल्याने दुर्देवाने त्यांनाही अपंगत्व आले आहे. तरीसुद्धा त्यांची बदली अमरावतीहून चांदूर बाजारला गत वर्षी करण्यात आली. विशेष म्हणजे अपंग कर्मचाऱ्यांना १० किलोमीटरच्या आत त्यांचे मुख्यालय असावे, असा शासन निर्णय असल्याचे बोलले जाते. तरीसुद्धा त्यांना चांदूरबाजारला का पाठवण्यात आले? यावर तालुक्यातील कर्मचाऱ्यांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहे. दुसरीकडे काही कर्मचारी, अधिकारी अमरावतीमध्ये कित्येक वर्षांपासून ठाण मांडून बसले आहे. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिक्त जागांवर न पाठविता अपंग अधिकाऱ्यांना अन्य तालुक्यात पाठविण्यात आले. यावर चांगलीच चर्चा जोर धरत आहे.