शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

तहसीलदार, नायब तहसीलदारावर तहसीलची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:09 IST

तहसीलचे कामकाज मंदावणार? १ जुलैपासून कामाचा खोळंबा: चांदूर बाजार : तालुक्यातील तहसील कार्यालयात १ जुलैपासून एक तहसीलदार व एक ...

तहसीलचे कामकाज मंदावणार?

१ जुलैपासून कामाचा खोळंबा:

चांदूर बाजार : तालुक्यातील तहसील कार्यालयात १ जुलैपासून एक तहसीलदार व एक नायब तहसीलदारावर तहसीलचा संपूर्ण कारभार चालविण्याची वेळ येणार असल्याने तहसीलचे कामकाज मंदावणार असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.

जिल्ह्यात चांदूरबाजार तालुका हा सर्वात मोठा आहे. यात ६ जिल्हा परिषद सर्कल असून, १२ पंचायत समिती गण आहेत. तालुक्यात १७१ गावे असून, शिरजगाव बंड, करजगाव, शिरजगाव कसबा, घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, आसेगाव आदी गावे मोठ्या लोकसंख्येची आहेत. स्थानिक तहसील कार्यालयात चार नायब तहसीलदारांचे पद मंजूर असून, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार गजानन पाथरे यांचा विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या अपघातामुळे ते दीर्घ रजेवर आहेत.

निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अर्जुन वांदे हे ३० मार्चला सेवानिवृत्त झाले, तर महसूल नायब तहसीलदार हे ३० जून रोजी निवृत्त होणार आहेत. निवासी नायब तहसीलदार संतोष कारसकर यांचाही पूर्वी अपघात झाला होता. आता ३० जूनला नायब तहसीलदार देवेन्द्र सवई निवृत्त होणार असल्याने एका तहसीलदार व एका नायब तहसीलदारांच्या भरवशावर तहसीलचा कारभार चालणार का, असा प्रश्न सामान्य जनतेमधून विचारला जात आहे.

नुकतेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. त्यामुळे रखडलेली कामे करण्यासाठी तहसीलमध्ये नागरिकांची अचानक गर्दी वाढली आहे. यात शेतकरी, विद्यार्थी, तसेच पक्षकारांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे तहसीलदारांना सहकारी असलेल्या नायब तहसीलदार असल्याशिवाय तहसीलचा कारभार पूर्णत: चालू शकत नाही. याकरिता नायब तहसीलदारांची रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक झाले आहे.

( निवासी नायब तहसीलदार संतोष कारसकर यांचाही पूर्वी अपघात झाल्याने दुर्देवाने त्यांनाही अपंगत्व आले आहे. तरीसुद्धा त्यांची बदली अमरावतीहून चांदूर बाजारला गत वर्षी करण्यात आली. विशेष म्हणजे अपंग कर्मचाऱ्यांना १० किलोमीटरच्या आत त्यांचे मुख्यालय असावे, असा शासन निर्णय असल्याचे बोलले जाते. तरीसुद्धा त्यांना चांदूरबाजारला का पाठवण्यात आले? यावर तालुक्यातील कर्मचाऱ्यांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहे. दुसरीकडे काही कर्मचारी, अधिकारी अमरावतीमध्ये कित्येक वर्षांपासून ठाण मांडून बसले आहे. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिक्त जागांवर न पाठविता अपंग अधिकाऱ्यांना अन्य तालुक्यात पाठविण्यात आले. यावर चांगलीच चर्चा जोर धरत आहे.