शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चहाटपरीतून ‘त्यांना’ मिळाले जगण्याचे आत्मभान !

By admin | Updated: November 26, 2015 00:18 IST

घरात अठरा विश्वे दारिद्रय असताना संघर्ष करीत रमेशने लहान भावाला स्वत:च्.ा पायावर उभे केले. त्एका मुलीचे लग्न व दुसरीचे शिक्षण करताना ....

दर्यापूर : घरात अठरा विश्वे दारिद्रय असताना संघर्ष करीत रमेशने लहान भावाला स्वत:च्.ा पायावर उभे केले. त्एका मुलीचे लग्न व दुसरीचे शिक्षण करताना चहा टपरीच्या व्यवसायातून त्यांनी केलेला संघर्ष इतर सुशिक्षीत बेरोजगारांसाठी सुध्दा प्रेरणादायी ठरला आहे. आयुष्यभर रोजंदारी केली. आता स्वत:ची चहाटपरी थाटली. या व्यवसायातून त्यांना आत्मसन्मानाने जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. रमेश स्वत:च्या कुटुंबासाठी संघर्ष करीत आहे. दर्यापूर येथील राजपुतपुऱ्यात राहाणारे रमेश ठाकरे यांनी जीवनाची सुरुवात दर्यापूर येथील बसस्थानकावर असलेल्या कँटीनमध्ये दहा रुपये हप्त्यापासून केली. सतत २० वर्षे एकाच व्यवसायात असताना त्यांना कधी कंटाळा आला नाही. कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविताना त्यांना अनेक अपमानजनक प्रसंग सोसावे लागले. पुढे जाऊन त्यांचे उत्पन्न ७०० रुपये हप्त्यापर्यंत पोहोचले. कुटुंबाची आई-वडिलानंतर जबाबदारी रमेश यांच्या खांद्यावर आली. त्यांनी ती सक्षमपणे सांभाळली. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनाही त्यांचे कौतुक वाटते. लोकांकडे काम करीत असतानाच ठाकरे कुटुंबीयांनी बसस्थानक चौकात उदरनिर्वाह करण्यासाठी चहा व नाश्त्याचे हॉटेल टाकले. सकाळी साडेतीन वाजता त्यांचा दिवस सुरु होतो. त्यांच्या पत्नी देखील त्यांना सक्षमपणे साथ देतात. सकाळी उठून बसस्टँड चौकातील पिण्याचे पाणी ते आणतात. या व्यवसायात त्यांचा मोठा मुलगा राजूचीही त्यांना मोलाची साथ लाभली आहे. या व्यवसायातून दररोज तीन-चार हजार रुपयांची मिळकत त्यांना होते. त्यातून त्यांना हजार ते दीड हजारापर्यंत नफा मिळत आहे. त्यांच्या कामात सातत्य व प्रामाणिकपणा आहे. याच व्यवसायातून रमेश यांनी मुलगा राजीवला बारावीपर्यंत शिकविले. एका मुलीचा थाटात विवाह केला. तर दुसरी मुलगी शिक्षण घेत आहे. त्यांच्या दोन्ही लहान भावांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. एका भावाने राममंदिराजवळ तर दुसऱ्या भावाने बसस्थानकाजवळ हॉटेलचा व्यवसाय थाटून प्रगती केली आहे. त्यामुळे हे कुटूंब समाजासाठी आदर्श ठरले आहे. चहाच्या व्यवसायातून त्यांना आत्मसन्मानाने जगण्याची दिशा मिळाली आहे. परिस्थितीच्या नावाने सतत बोटे मोडण्यापेक्षा संघर्षाचा मार्ग चांगला, असे ते सांगतात.