शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
2
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
3
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
4
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
5
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
6
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
7
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
8
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
9
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
11
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
12
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
13
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
15
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
16
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
17
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
18
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
19
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
20
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम

बाल स्वच्छता अभियानात अध्यापन बुडणार

By admin | Updated: November 15, 2014 01:18 IST

स्वच्छ भारत मिशनद्वारे बाल स्वच्छता उपक्रम कालपासून राबविल्या जात आहे. हा अभियान प्रशासनाने व मूळ पातळीवर...

मोहाडी : स्वच्छ भारत मिशनद्वारे बाल स्वच्छता उपक्रम कालपासून राबविल्या जात आहे. हा अभियान प्रशासनाने व मूळ पातळीवर अंमलबजावणी करणाऱ्या शाळांनी गंभीरतेने घेतल्याने बऱ्याच शाळांमध्ये अध्यापन बुडणार असल्याची बाब समोर आली आहे.बाल स्वच्छता अभियान उपक्रम १४ नोव्हेंबर पासून राबविणे सुरू झाले. बाल स्वच्छता कार्यक्रमाला उसंत दिली गेली नाही. सातत्याने हा कार्यक्रम सहा दिवस चालणार आहे. या सहा दिवसात शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ करायचा आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व पटवून द्यायचे आहेत. रांगोळी, निबंध, पोस्टर स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन शाळा-शाळांमध्ये केले जाणार आहे. एकूणच सहा दिवस स्वच्छता या विषयावर पूर्ण शाळा केंद्रीत झाल्या आहेत. तसेच कोणत्या शाळा बाल स्वच्छता कार्यक्रमात गांभिर्याने सहभागी होत नाही त्यांची निगरानी विविध पथकाद्वारे होणार आहे. बालस्वच्छता हा भाग केवळ शाळांपूरता मर्यादित केला नसल्याने गावात स्वच्छतेची जागृती, समाजाचा गावातील प्रत्येक घटकांचा सहभाग करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांवर येवून पडली आहे. त्यामुळे एकूणच शाळा प्रमुखावर तसेच अध्यापकावर अप्रत्यक्षपणे स्वच्छता मिशनचा दडपण आलेला आहे. या स्वच्छता अभियानातून सुटण्याचा कुठेच मार्ग शिल्लक राहिला नाही. त्यामुळे शाळा प्रमुख व शिक्षक आधी स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमाला प्रथम प्राधान्य देवू लागली आहे. पथकाच्या निरीक्षणात कमी जास्त आढळले त्याचा ठपका आपल्या शाळेवर येवू नये यासाठी बाल स्वच्छता अभियान अतिशय काळजीपूर्वक राबविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व बाबीमुळे बऱ्याच शाळांमध्ये खडू-फळा बंद राहण्याची शक्यता असल्याची प्रचिती दिसून आली. या सहा दिवसात अध्यापन निटपणे होईल याची शाश्वती अधिकारी देण्यास पुढे मागे बघत आहेत. आम्ही तरी काय सांगणार, शासनाचा उपक्रम राबविलाच पाहिजे, तुमच्या सारखीच आमची स्थिती आहे. एवढाच फरक की आम्ही अधिकारी म्हणून निरीक्षण करणार तुम्ही राबणार ही प्रतिक्रिया बालस्वच्छता अभियानात निरीक्षण पथकात असणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे.शाळांना रविवार हा दिवस सुटीचा असला तरी त्या दिवशी शाळा स्तरावर आरोग्य विभागाच्या चमूकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासाठी शाळा सकाळपाळीत भरविण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री व शालेय सचिव यांनी वेगवेगळे पत्र काढले आहे. त्या पत्रात १६ नोव्हेंबरला कोणताच उपक्रम दिला नाही. त्यांनी शाळांना रविवारी सुटी असल्याची जाणिव ठेवून कोणताच शाळांसाठी कार्यक्रम ठेवला नाही. तथापि, प्रशासनाने रविवारीही शाळांच्या शिक्षकांना वेठीस पकडले आहे. रविवार असल्याने त्या दिवशी पूर्ण उपस्थित राहणार नाही जाणीव मंत्र्यांना आहे, शालेय सचिवांना आहे, मात्र प्रशासनाने अधिकचा शहणपणा केला असल्याचे दिसून येते. जे विद्यार्थी अनुपस्थित राहणार त्यांची आरोग्य तपासणी परत होणार नाही. यापूर्वीही शाळांमध्ये आरोग्य तपासणीचा कार्यक्रम झाला. या उपक्रमात विशेष काही आरोग्य तपासणी होणार आहे, असे दिसत नाही. सकाळच्या ८ ते १२ पर्यंत रविवारी आरोग्य तपासणीचा कार्यक्रम आहे. त्या निर्माण केलेल्या आरोग्य पथकांना आरोग्य तपासणीचा दिलेला उद्दीष्ट धावपळीतच पार पाडावा लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)