शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बाल स्वच्छता अभियानात अध्यापन बुडणार

By admin | Updated: November 15, 2014 01:18 IST

स्वच्छ भारत मिशनद्वारे बाल स्वच्छता उपक्रम कालपासून राबविल्या जात आहे. हा अभियान प्रशासनाने व मूळ पातळीवर...

मोहाडी : स्वच्छ भारत मिशनद्वारे बाल स्वच्छता उपक्रम कालपासून राबविल्या जात आहे. हा अभियान प्रशासनाने व मूळ पातळीवर अंमलबजावणी करणाऱ्या शाळांनी गंभीरतेने घेतल्याने बऱ्याच शाळांमध्ये अध्यापन बुडणार असल्याची बाब समोर आली आहे.बाल स्वच्छता अभियान उपक्रम १४ नोव्हेंबर पासून राबविणे सुरू झाले. बाल स्वच्छता कार्यक्रमाला उसंत दिली गेली नाही. सातत्याने हा कार्यक्रम सहा दिवस चालणार आहे. या सहा दिवसात शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ करायचा आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व पटवून द्यायचे आहेत. रांगोळी, निबंध, पोस्टर स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन शाळा-शाळांमध्ये केले जाणार आहे. एकूणच सहा दिवस स्वच्छता या विषयावर पूर्ण शाळा केंद्रीत झाल्या आहेत. तसेच कोणत्या शाळा बाल स्वच्छता कार्यक्रमात गांभिर्याने सहभागी होत नाही त्यांची निगरानी विविध पथकाद्वारे होणार आहे. बालस्वच्छता हा भाग केवळ शाळांपूरता मर्यादित केला नसल्याने गावात स्वच्छतेची जागृती, समाजाचा गावातील प्रत्येक घटकांचा सहभाग करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांवर येवून पडली आहे. त्यामुळे एकूणच शाळा प्रमुखावर तसेच अध्यापकावर अप्रत्यक्षपणे स्वच्छता मिशनचा दडपण आलेला आहे. या स्वच्छता अभियानातून सुटण्याचा कुठेच मार्ग शिल्लक राहिला नाही. त्यामुळे शाळा प्रमुख व शिक्षक आधी स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमाला प्रथम प्राधान्य देवू लागली आहे. पथकाच्या निरीक्षणात कमी जास्त आढळले त्याचा ठपका आपल्या शाळेवर येवू नये यासाठी बाल स्वच्छता अभियान अतिशय काळजीपूर्वक राबविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व बाबीमुळे बऱ्याच शाळांमध्ये खडू-फळा बंद राहण्याची शक्यता असल्याची प्रचिती दिसून आली. या सहा दिवसात अध्यापन निटपणे होईल याची शाश्वती अधिकारी देण्यास पुढे मागे बघत आहेत. आम्ही तरी काय सांगणार, शासनाचा उपक्रम राबविलाच पाहिजे, तुमच्या सारखीच आमची स्थिती आहे. एवढाच फरक की आम्ही अधिकारी म्हणून निरीक्षण करणार तुम्ही राबणार ही प्रतिक्रिया बालस्वच्छता अभियानात निरीक्षण पथकात असणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे.शाळांना रविवार हा दिवस सुटीचा असला तरी त्या दिवशी शाळा स्तरावर आरोग्य विभागाच्या चमूकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासाठी शाळा सकाळपाळीत भरविण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री व शालेय सचिव यांनी वेगवेगळे पत्र काढले आहे. त्या पत्रात १६ नोव्हेंबरला कोणताच उपक्रम दिला नाही. त्यांनी शाळांना रविवारी सुटी असल्याची जाणिव ठेवून कोणताच शाळांसाठी कार्यक्रम ठेवला नाही. तथापि, प्रशासनाने रविवारीही शाळांच्या शिक्षकांना वेठीस पकडले आहे. रविवार असल्याने त्या दिवशी पूर्ण उपस्थित राहणार नाही जाणीव मंत्र्यांना आहे, शालेय सचिवांना आहे, मात्र प्रशासनाने अधिकचा शहणपणा केला असल्याचे दिसून येते. जे विद्यार्थी अनुपस्थित राहणार त्यांची आरोग्य तपासणी परत होणार नाही. यापूर्वीही शाळांमध्ये आरोग्य तपासणीचा कार्यक्रम झाला. या उपक्रमात विशेष काही आरोग्य तपासणी होणार आहे, असे दिसत नाही. सकाळच्या ८ ते १२ पर्यंत रविवारी आरोग्य तपासणीचा कार्यक्रम आहे. त्या निर्माण केलेल्या आरोग्य पथकांना आरोग्य तपासणीचा दिलेला उद्दीष्ट धावपळीतच पार पाडावा लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)