शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

शिक्षकांनो ! व्यसन कराल तर घरी जाल

By admin | Updated: January 11, 2016 00:00 IST

फळ्यावर गणित लिहिले, खडू खाली ठेवला, खिशातील तंबाखू काढून मस्तपैकी चोळून एक बार भरला, अन् लिहा रे पोरंहो, असा भरल्या तोंडाने आदेश दिला’...

अमरावती : ‘फळ्यावर गणित लिहिले, खडू खाली ठेवला, खिशातील तंबाखू काढून मस्तपैकी चोळून एक बार भरला, अन् लिहा रे पोरंहो, असा भरल्या तोंडाने आदेश दिला’ असे करणाऱ्या शिक्षकांना आता अडचणीचे जाणार आहे. तंबाखू किंवा इतर कोणतेही व्यसन करुन शिकविणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केले आहेत. प्रत्यक्ष वर्गात अध्यापन करताना व्यसन करुन शिकविणारे शिक्षक अनेक शाळांमध्ये असतात. सगळेच शिक्षक काही व्यसनाच्या अधिन नसतात. परंतु तरीही तंबाखू किंवा खर्रा खाणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. तंबाखुचे पदार्थ खाऊन विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकाचा अनुभव अनेकांनी घेतला असतो. अशा सर्व शिक्षकांना आता काळजी घ्यावी लागणार आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक परिसर तंबाखू किंवा व्यसनाच्या पदार्थापासून मुक्त करण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. शाळांचा परिसर तंबाखुमुक्त असल्याचे फलक शाळांमध्ये लावण्याबाबत याआधीच आदेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी तंबाखुमुक्तीचा संकल्प सुध्दा करण्यात आला आहे. याच्यापुढे जाऊन आता अधिक कडक कारवाई करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळेतील शिक्षकांना तंबाखू, खर्रा, बिडी, सिगारेट किंवा दारू यासारख्या पदार्थांचे व्यसन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ठाणे येथील ओरिएंटल वुमन प्रोटेक्शन फोरमने याबाबत शासनाला निवेदन दिले होते. त्याआधारे शिक्षण विभागाने नवे आदेश जारी केले आहेत. काही शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना विविध प्रकारची व्यसने करतात. त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. शिक्षकांकडे बघून विद्यार्थी देखील व्यसनाधिन होत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा व्यसनी शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण सहसंचालक सुनील चव्हाण यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे शिक्षकांना सवयीला लगाम घालावा लागेल. शिक्षण विभागाचे आदेश;-तर नोकरीला मुकावे लागणार असे असेल कारवाईचे स्वरूप४व्यसन करुन शिकविणाऱ्या शिक्षकांना प्रमोशन न देणे, त्यांना शिक्षक पुरस्कारापासून वंचित ठेवणे, व्यसनी शिक्षकांना शासनाच्या सोयी सुविधांपासून वंचित ठेवणे, सूचनांचे पालन न करणाऱ्या शिक्षकांना बडतर्फ करणे. याबाबत वरिष्ठपातळीवर निर्णय झाला असला तरी अद्याप लेखी पत्र प्राप्त झालेले नाही. मात्र, तरीही मंत्रीमहोदयांनी घेतल्या निर्णयानुसार याची अंमलबजावणी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा अत्यंत चांगला निर्णय आहे- एस.बी.कुलकर्णी, शिक्षण उपसंचालक.