शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिक्षक दिन विशेष; पोटाची भूक हाच माझा गुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 07:00 IST

गुरुजी तुम्ही ज्ञानदाता आहात. तुमचे कर्तृत्वच विद्यार्थ्यांना घडवणार आहे. गरीब विद्यार्थ्यांवरही प्रेम करा. पगारासाठी नव्हे तर माझा प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी अध्यापन करा, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्देशिक्षकांमुळे वाचनाची गोडीदत्तात्रयांसारखे माझेही अनेक गुरूवाचनाच्या आवडीपोटी बिळात कागद लपविला नि मुंगूस चावला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: गुरुजी तुम्ही ज्ञानदाता आहात. तुमचे कर्तृत्वच विद्यार्थ्यांना घडवणार आहे. गरीब विद्यार्थ्यांवरही प्रेम करा. पगारासाठी नव्हे तर माझा प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी अध्यापन करा, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी येथे व्यक्त केली.वांदिले मास्तरांनी मारले, कांबळे गुरुजींनी जीव लावलाचिखलदरा हे कार्यक्षेत्र असलेल्या सिंधुताई सपकाळ सांगतात, वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावातील उत्तर बुनियादी शाळेत मी शिकले. म्हशी पाण्यात बसल्या की, मी शाळेत जायचे. त्यासाठी वांदिले मास्तरने अनेकदा मारले. शद्धलेखनही त्यांच्यामुळेच समजले. नुकत्याच नोकरीवर लागलेल्या कांबळे गुरूजींनी मला जीव लावला. काळजी घेतली.भाषणातून रेशन मिळते, ते माझ्या मुलांना जेऊ घालतेमी केवळ चौथी शिक लेली. लौकीकार्थाने तशी निरक्षरच. मात्र शिकली, सवरली ते समाजातून. ३५० लेक रांची आई असलेली ‘मी’ वयाच्या २० व्या वर्षी खचले; पण तेवढ्याच ताकदीने उठले. एकाकी लढा दिला. स्मशानात राहिले. कधीकाळी संसारातून उठले. आता ३५० मुले, ४९ सुना, २८२ जावई अशा भल्यामाठ्या संसाराची कुटुंबप्रमुख आहे.लहानपणी चाफ्याच्या फुलांतून खरकटे अन्न खाल्ले. जळणाऱ्या प्रेताच्या निखाऱ्यावर मी भाकरी भाजली. आज भाषणांतून रेशन मिळते. त्यातून मी माझ्या मुलांना खाऊ घालते. स्वत:च्या मुलांना विसरून विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक आजही आहेत.शिक्षकांमुळेच वाढेल देशाचा लौकीकचौथीत असताना गुरूजी शाळेत उशिरा येते म्हणून मारायचे. तर मोकाट म्हशी शेतात शिरल्या म्हणून शेतकरी थेट वर्गात शिरायचा. दोन्हीकडून मार. तेव्हाचे शिक्षक झोकून देऊन ज्ञानदान करायचे. आज अपवाद वगळता शिक्षक हा पेशा, व्यवसाय झालाय. मोजक्या का होईना; पण शिक्षकांमुळेच या देशाचा लौकीक वाढेल.अक्षरे लिहिलेली कागदं चाऊन खायची...शिक्षकांमुळे वाचनाची गोडी लागली. रस्त्यावरची कागदं उचलून धुऊन ती मी वाचायची. पतीला वाचन पटेचना. उंदरांच्या, मुंगसांच्या बिळात ती कागदं मी लपवायची. एकदा मुंगूसही चावला. पतीने माझ्यासमोर ती फाडू नये यासाठी मी अक्षर लिहिलेली कागदं चावून खायची. नवऱ्यापासून २० व्या वर्षी विभक्त झाले. आयुष्य काळोखमय झाले ;पण निर्धार अन् ज्ञानामुळेच मला जग लख्खपणे दिसू शकले, अन्यथा ज्ञानाशिवाय मी आंधळीच असते..

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिन