शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार पुरविण्यासाठी शिक्षक निघाले बाजाराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:31 IST

एकीकडे अशैक्षणिक कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असताना शिक्षण विभागाने त्याच्यावर आणखी एका नवीन जबाबदारीची भर टाकली आहे.

ठळक मुद्देमुख्याध्यापकांवरही जबाबदारी : माध्यान्ह भोजनाची साहित्य खरेदी करावी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एकीकडे अशैक्षणिक कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असताना शिक्षण विभागाने त्याच्यावर आणखी एका नवीन जबाबदारीची भर टाकली आहे. विद्यार्थ्याना माध्यान्ह भोजन पुरविण्याचे काम मुख्याध्यापक, शिक्षकांना करावे लागणार आहे.माध्यान्ह भोजनासाठीचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराची अद्याप निवडच केली नाही. त्यामुळे ही निवड प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर शाळा स्तरावर मिळालेल्या निधीतून साहित्य खरेदी करून विद्यार्थ्यांची सोय करण्याचे आदेश आहेत. येत्या काही दिवसांत मुख्याध्याकांसह शिक्षक हातात पिशव्या घेऊन बाजारात दिसले तर यात काही नवल वाटू नये, जनगणना, निवडणूक आयोगाची कामे, विविध शासकीय सर्वेक्षणाबरोबरच आता माध्यान्ह भोजनासाठी लागणारे साहित्यही शिक्षकांनाच गोळा करावे लागणार आहेत.राज्यातील शाळांमधील मुलांना माध्यान्ह भोजन देण्यासाठी काढण्यात येणारी निविदा प्रक्रिया एप्रिल ते मे दरम्यान पूर्ण होऊन ठेकेदारांमार्फत आहार पुरवठा होतो. ती आजपर्यतची प्रक्रिया होती. मात्र शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे माध्यान्ह भोजनावर प्रश्नचिन्ह लागले आहे.निविदा काढून पोषण आहाराचे साहित्य पुरविण्याचे काम कंत्राटदारामार्फत करून घेण्यात येते. या कंत्राटदारामार्फतच राज्यातील ८० हजार शाळांना साहीत्य पुरवठा केला जातो. मात्र शासनाकडृून कंत्राटदारच निवडला न गेल्यामुळे शाळांना साहित्य पुरवठा बंद झाला आहे. यामुळे अनेक शाळांमधील साहित्य संपला असून माध्यान्ह भोजनासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. शाळेत दिल्या जाणाºया निधीतून मुख्याध्यापकांनी साहित्य खरेदी करून माध्यान्ह भोजन देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे अशैक्षणिक कामात भर पडली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याच्या वेळात खोडा निर्माण होण्याची शक्यता आहे.शिक्षकांनी ज्ञानार्जन करावे की बाजारात पिशव्या घेऊन फिरायचे हा प्रश्न पडला आहे. दुकानदार उधार किती दिवस देतील. शासनाच्या या निर्णयामुळे शाळांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळण्याची शक्यता वाढीस लागली आहे.- राजेश सावरकर,मुख्याध्यापकशिक्षकांना अशैक्षणिक कामे दिल्याने अध्यापनासाठी वेळ मिळत नाही. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांना केवळ अध्यापनाचेच काम दिले जावे, माध्यान्ह भोजनासाठी शासनाने स्वतंत्र्य यंत्रणा उभारावी.- किरण पाटील, सरचिटणीसप्राथमिक शिक्षक संघ