शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डाच्या परीक्षा केंद्रावरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:12 IST

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची २९ एप्रिल आणि बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिलपासून ...

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची २९ एप्रिल आणि बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिलपासून होणार आहे. त्याअनुषंगाने बोर्डाने परीक्षांची तयारी चालविली असून, परीक्षा केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणार आहे. दहावीसाठी २,५११ तर, बारावीसाठी १,५१९ परीक्षा केंद्र असणार आहेत.

विभागीय शिक्षण मंडळाने अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यांत दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. शिक्षण मंडळाने कोविड -१९ च्या अनुषंगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे परीक्षा केंद्रांवर पालन होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यंदा दहावीत १,६४,६३२ तर, बारावीच्या परीक्षेसाठी १,३७,५६९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहे.

बारावीच्या परीक्षांसाठी विभागातून परीरक्षक केंद, परीक्षा केंद्र. उपकेंद्र, परीक्षक, नियामक, वरिष्ठ नियामक आणि इतर कर्मचारी असे १८,३६७ मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. यात अमरावती विभागात केंद्र संचालक ४९८, उपकेंद्र संचालक ४९८, पर्यवेक्षक ६१६२, रिलिव्हर पर्यवेक्षक ९९६, स्टेशनरी पर्यवेक्षक ४९८, लिपिक ४९८, शिपाई ९९६, पाणीवाला १,४९४ अन्य घटक ४९८, मुख्य नियामक १०, वरिष्ठ नियामक ६, नियामक ७९७, परीक्षक ४४६०, परीरक्षक ७३, उपपरीरक्षक ७३, सहायक परीरक्षक ४९८, लिपिक ७३, शिपाई १४६ अन्य घटक ७३ असे मनुष्यबळ बारावीच्या परीक्षांसाठी नेमण्यात येणार आहे. अकोला २६८, अमरावती ३९५, बुलडाणा ३१७, यवतमाळ ३४८, वाशिम १९१ असे जिल्हानिहाय परीक्षा केंद्र असणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी अकोला ४३९, अमरावती ६६५, बुुलडाणा ५०३,यवतमाळ ६०९, वाशिम २९५ असे जिल्हानिहाय परीक्षा केंद्र असणार आहे.

———————————

बारावीच्या परीक्षा केंद्रांवर असे राहील मनुष्यबळ

अकोला- २०९३

अमरावती -३१२५

बुलडाणा- २६४१

यवतमाळ - २७२४

वाशिम - १५७५

——————————

राज्य शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षांचे नियोजन सुरू झाले आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीबाबत अद्याप काही गाईडलाईन नाही. मात्र, जवळपास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली आहे. बोर्डात कर्मचाऱ्यांनी ९० टक्के चाचणी, लसीकरण आटोपले आहे.

- जयश्री राऊत, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ