शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शिक्षक भरती प्रक्रिया वांद्यात

By admin | Updated: July 1, 2014 23:15 IST

राज्याच्या शिक्षण विभागाने अनुदानीत शाळांमधील रिक्त पदभरतीबाबत नवीन आदेश काढल्याने अनुदान प्राप्त शाळांची शिक्षक भरती प्रक्रिया वांद्यात आली आहे.

प्रभाकर भगोले - चांदूर रेल्वे

राज्याच्या शिक्षण विभागाने अनुदानीत शाळांमधील रिक्त पदभरतीबाबत नवीन आदेश काढल्याने अनुदान प्राप्त शाळांची शिक्षक भरती प्रक्रिया वांद्यात आली आहे.शाळांमधील रिक्त पदभरतीसाठी ३० जानेवारी २०१४ रोजी राज्याच्या शिक्षण विभागाने मान्यता दिली होती. परंतु शिक्षण विभागाच्या २० जून २०१४ च्या आदेशाने रिक्त पदभरती प्रक्रियेवर संकट आले आहे. शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त पदे भरण्यासाठी खासगी शिक्षण संस्थांना शिक्षण विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. याचा फायदा भरती प्रक्रिया मंजुरीसाठी शिक्षण विभागाचे अधिकारी घेण्याची परंपरा काळानुरुप सुरु आहे. रिक्तपद भरतीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आदेशाने मंजुरी प्रदान करण्यात आली होती.राज्य शिक्षण शालेय व क्रीडा विभागाने शासन निर्णय काढून रिक्त पदाच्या भरतीसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर शिक्षकांच्या नेमणुकीसाठी पाच अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली. यामुळे १ जूनपूर्वी व नंतर झालेल्या खासगी शिक्षण संस्थेतील रिक्त शिक्षक भरती प्रक्रिया वांध्यात आली आहे. सर्वत्र बीएड, डीएडधारक लाखो बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत.इतर नोकरीपेक्षा शिक्षकाची नोकरी बरी म्हणून विद्यार्थ्यांचा कल शिक्षक होण्याकडे असतो. एकिकडे शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांची यादी जिल्हा पातळीवर तयार केली. याच शिक्षकांना टप्या-टप्याने रिक्तपदावर अतिरिक्त शिक्षकाला नेमण्यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात आला असल्याचीही चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.राजकीय नेत्यांच्या विविध संस्था कार्यरत आहेत. यात शिक्षकाचे पद भरतीसाठी आर्थिक उलाढाली होत असल्याचे आरोप होत असतात. शासन निर्णयाने शाळा संचालकाच्या शिक्षक भरतीबाबतच्या प्रक्रियेला आळा घातला असला तरी जिल्हा पातळीवर नेमलेल्या पाच अधिकाऱ्यांची समिती जुन्या प्रथेला निर्बंध लावणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.