शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

आश्रमातील शिक्षकानेच घ्यायला लावला प्रवेश

By admin | Updated: August 13, 2016 23:52 IST

प्रथमेश हा अमरावती शहरातील आनंनदनगर भागातील रहिवासी. शहरातून खेड्यात शिक्षणासाठी जाण्याचा ..

अनुदानासाठी 'टार्गेट' : प्रवेशासाठी शिक्षकांची विद्यार्थ्यांवर नजरअमरावती : प्रथमेश हा अमरावती शहरातील आनंनदनगर भागातील रहिवासी. शहरातून खेड्यात शिक्षणासाठी जाण्याचा उफराटा प्रवास करण्याची तशी त्याला गरज नव्हतीच; तथापि पिंपळखुट्याच्या आश्रमांतर्गत असलेल्या शाळेतील शिक्षक किशोर ठाकरे यांनी अवधून सगणे यांना आग्रह केल्यामुळेच त्यांनी प्रथमेशला पिंपळखुट्याच्या निवासी शाळेत धाडले. पिंपळखुटा येथील संत श्री शंकर महाराज समाजकल्याण वसतिगृहात वास्तव्याला असलेली मुले आश्रमाच्याच आवारातील संत श्री शंकर महाराज विद्यामंदिरात शिक्षण घेतात. या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. वसतिगृहात वास्तव्याला असलेल्या मुलांमध्ये अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांतील विद्यार्थी आहेत. दूरदुरून मुले यावीत, असा लौकिक या वसतिगृहाचा वा विद्यालयाचा निश्चितच नाही. विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक गरजू पालकांशी संपर्क साधून त्यांच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रविष्ट करवून घेतात, अशी माहिती 'लोकमत'च्या शोधमोहिमेत उघड झाली आहे. दरवर्षी आवश्यक ते प्रवेश करवून घेण्याचे 'टार्गेट' शिक्षकांना असते. आश्रमातील शाळा, वसतिगृह अनुदानित आहे. अनुदान कायम राखायचे असेल तर नियमानुसारची विद्यार्थी संख्या पूर्ण करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांवर नजरा ठेवून असतात. त्यासाठी प्रलोभन दिले जाते. प्रथमेशच्या शिक्षणाचा कुठलाही खर्च येणार नाही, असे प्रलोभन प्रथमेशच्या कुटुंबीयांनाही देण्यात आले होते. (प्रतिनिधी)ठाकरे गुरुजींचाच फोनप्रथमेश नागपंचमीला घरी येणार म्हणून हर्षभरीत झालेले आई-वडील त्याच्या लाडकौतुकासाठीचा, मेजवाणीसाठीचा अमरावतीत बेत आखत असतानाच तिकडे चिमुकल्या प्रथमेशचा निर्दयीपणे सपासप गळा चिरला गेला- एकदा.. दोनदा... तीनदा ! घटनेनंतर काही वेळाने वडिलांचा फोन बंद असल्यामुळे दुसऱ्याच्या फोनवरून वडिलांना घटनेबाबत निरोप देण्यात आला. मुलाला इर्विनमध्ये नेल्याचा तो निरोप होता. किशोर ठाकरे यांनीच तो निरोप दिला होता. जबाबदारी स्वीकारून धडधाकट, गोरागोमटा मुलगा घेऊन जाणारे ठाकरे गुरुजी मुलगा मरणाच्या दारात असल्याचा निरोप घेऊन आले. आश्रमाकडून खुलासा नाहीप्रथमेश प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्याची अपप्रतिष्ठा झाली. श्री संत शंकर महाराज यांच्या आश्रमातील कारभारावर जाहीरपणे शंका व्यक्त केली जाऊ लागली. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागलेत. ऐकणाऱ्या कुणाच्या काळजाचा ठोका चुकावा इतकी गंभीर घटना आश्रम परिसरात घडूनही आश्रमाच्यावतीने कुठलीही भूमिका जाहीर करण्यात आली नाही. संपर्क साधल्यास प्रतिक्रियेसाठी आश्रमाच्यावतीने कुणीही उपलब्ध होत नाहीत. या अपादर्शितेवर जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.