शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आदिवासीविरोधी शासनाला धडा शिकवा

By admin | Updated: August 12, 2016 00:14 IST

दोन वर्षांत राज्य व केंद्र शासनाने आदिवासींना योजनांच्या लाभापासून पूर्णत: वंचित ठेवले आहे.

बबलू देशमुख यांचे प्रतिपादन : काँग्रेसचा मेळावा परतवाडा : दोन वर्षांत राज्य व केंद्र शासनाने आदिवासींना योजनांच्या लाभापासून पूर्णत: वंचित ठेवले आहे. अशा या नरकासूर शासनाला आता धडा शिकवा, सर्व योजनांचा लाभ बंद केल्याने शेतकऱ्यांसह आदिवासी, दलित अल्पसंख्याकांच्या जिवावर उठलेल्या शासनाला भररस्त्यात फाशी देण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले. ते आयोजित चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत बोलत होते. शेतकरी आत्महत्या मागील दोन वर्षांत १५ पटीने वाढल्या आहेत. काँग्रेस शासनात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आता काय करायचे, हे तुम्हीच ठरवा. मेळघाटात कोट्यवधी रुपयांची कामे मागील शासनाने केली. माजी आमदार केवलराम काळे यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. परंतु आता तर मेळघाटचे आमदार कोण? हे शोधायची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. अध्यक्षांनी मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे, सभापती दयाराम काळे, महेंद्रसिंग गैलवार, वनमाला खडके, कैलास आवारे, आसीफभाई, रजनी बेलसरे, अजीजभाई, जयंत खडके, राजेश मांगलेकर, भाष्कर हरमकर, सुषमा मालवीय, गौरव काळे, चंदुलाल बेलसरे, बन्सी जामकर, गौरव काळे, अमोल बोरेकार, राहुल येवले, राजाभाऊ टवलाकर, प्रशांत देशमुख, मधुकर नाकट, श्रीकृष्ण सगणे, विनायक ठाकरे, हिरुजी हेकडे, पीयूष मालवीय, मिश्रीलाल झाडखंडे, शैलेश म्हाला, बाबू टेकाडे, सागर व्यास, विक्की राठोडसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष मिश्रीलाल झाडखेडे, श्रीकृष्ण सगणे, आभार सागर व्यास यांनी मानले. यावेळी सुनील उईके यांनी भाजपातून तर कमला कास्देकर यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (तालुका प्रतिनिधी)