शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

अंबानगरीत पुन्हा घाण कपात चहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2016 00:07 IST

अंबानगरीत पुन्हा लहान कॅन्टीन व हॉटेल्समध्ये चहाचे कप घाण पाण्यात धुतले जात आहेत.

आजाराला आमंत्रण : अतिशय घाण पाण्यात धुतले जातात कपसंदीप मानकर अमरावतीअंबानगरीत पुन्हा लहान कॅन्टीन व हॉटेल्समध्ये चहाचे कप घाण पाण्यात धुतले जात आहेत. त्याच अस्वच्छ कपात ग्राहकांना चहा देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आले आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या दिवसांत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामध्ये दूषित व घाण जागेवरील अन्नपदार्थ प्राशन केल्याने किंवा घाण पाण्यात धुतलेल्या कापातच वारंवार चहा पिल्यानेही पोटाचे व इतर आजार वाढतात. अंबानगरीत काही हॉटेल्समध्ये अतिक्रमण करुन व हातगाड्यांवरील चहाच्या टपऱ्यांवर अन्नसुरक्षा मानदे कायद्याचे उल्लंघन होत आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून या कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे या कायद्याची गरजच काय, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना हॉटेलचालकांवर किंवा अन्नपदार्थांची जर अशाप्रकारे विक्री होत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी एफडीएची आहे. परंतु, अन्न व सुरक्षा मानदे कायद्याची अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे वाटेल तशा गलथान सुविधा नागरिकांना पुरविल्या जातात. अन्नपदार्थांचे दामदुप्पट पैसे घेतल्यानंतरही मात्र त्यांना सुविधा पुरविली जात नाही. अंबानगरीत सात ते १० रुपये कट याप्रमाणे चहाची विक्री करण्यात येते. पण अनेक हॉटेलमध्ये कप धुण्यासाठी वारंवार घाण पाणीच वापरले जातात. कप धुतल्यानंतर तासन्तास हे पाणी बदलले जात नाही. ग्र्राहकांच्या डोळ्यासमोर त्याच घाण पाण्यातून हे कप काढली जातात व त्यामध्ये चहा टाकण्यात येतो. मात्र, काही प्रमाणात घाण पाणी त्या चहासोबत आपल्या पोटात जाते. दरदिवसाला अनेक लोकांचे तोंड या कपांना लागते, त्यामुळे कप स्वच्छ पाण्याने धुवून निर्जंतुक करून वापरणे गरजेचे असते. परंतु असे न होता घाण पाण्यातच हे कप धुवून ग्राहकांना या कपांमध्ये चहा दिल्या जातो. अनेक हॉटेल चालकांने कप धुण्याचे पाणी घाण झाल्यानंतर पाणी त्वरित बदलले पाहिजे. एका टबात कप धुतल्यानंतरसुध्दा बाजूला दुसरा टब असला पाहिजे. हॉटेलमध्ये कप धुण्यासाठी स्वतंत्र बेसिन असले पाहिजे. या सर्व बाबी जर नसेल तर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून हा सर्व प्रकार तपासला पाहिजे. जर कायद्याचे उल्लंघन होत असेल, तर त्यांना सुधारणा नोटीस दिली पाहिजे. जर वारवांर हा प्रकार घडत असेल तर त्या हॉटेल चालकांचा परवाना रद्द करून त्यांच्या अन्न व सुरक्षा मानदे कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे.