शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

अंबानगरीत पुन्हा घाण कपात चहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2016 00:07 IST

अंबानगरीत पुन्हा लहान कॅन्टीन व हॉटेल्समध्ये चहाचे कप घाण पाण्यात धुतले जात आहेत.

आजाराला आमंत्रण : अतिशय घाण पाण्यात धुतले जातात कपसंदीप मानकर अमरावतीअंबानगरीत पुन्हा लहान कॅन्टीन व हॉटेल्समध्ये चहाचे कप घाण पाण्यात धुतले जात आहेत. त्याच अस्वच्छ कपात ग्राहकांना चहा देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आले आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या दिवसांत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामध्ये दूषित व घाण जागेवरील अन्नपदार्थ प्राशन केल्याने किंवा घाण पाण्यात धुतलेल्या कापातच वारंवार चहा पिल्यानेही पोटाचे व इतर आजार वाढतात. अंबानगरीत काही हॉटेल्समध्ये अतिक्रमण करुन व हातगाड्यांवरील चहाच्या टपऱ्यांवर अन्नसुरक्षा मानदे कायद्याचे उल्लंघन होत आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून या कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे या कायद्याची गरजच काय, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना हॉटेलचालकांवर किंवा अन्नपदार्थांची जर अशाप्रकारे विक्री होत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी एफडीएची आहे. परंतु, अन्न व सुरक्षा मानदे कायद्याची अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे वाटेल तशा गलथान सुविधा नागरिकांना पुरविल्या जातात. अन्नपदार्थांचे दामदुप्पट पैसे घेतल्यानंतरही मात्र त्यांना सुविधा पुरविली जात नाही. अंबानगरीत सात ते १० रुपये कट याप्रमाणे चहाची विक्री करण्यात येते. पण अनेक हॉटेलमध्ये कप धुण्यासाठी वारंवार घाण पाणीच वापरले जातात. कप धुतल्यानंतर तासन्तास हे पाणी बदलले जात नाही. ग्र्राहकांच्या डोळ्यासमोर त्याच घाण पाण्यातून हे कप काढली जातात व त्यामध्ये चहा टाकण्यात येतो. मात्र, काही प्रमाणात घाण पाणी त्या चहासोबत आपल्या पोटात जाते. दरदिवसाला अनेक लोकांचे तोंड या कपांना लागते, त्यामुळे कप स्वच्छ पाण्याने धुवून निर्जंतुक करून वापरणे गरजेचे असते. परंतु असे न होता घाण पाण्यातच हे कप धुवून ग्राहकांना या कपांमध्ये चहा दिल्या जातो. अनेक हॉटेल चालकांने कप धुण्याचे पाणी घाण झाल्यानंतर पाणी त्वरित बदलले पाहिजे. एका टबात कप धुतल्यानंतरसुध्दा बाजूला दुसरा टब असला पाहिजे. हॉटेलमध्ये कप धुण्यासाठी स्वतंत्र बेसिन असले पाहिजे. या सर्व बाबी जर नसेल तर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून हा सर्व प्रकार तपासला पाहिजे. जर कायद्याचे उल्लंघन होत असेल, तर त्यांना सुधारणा नोटीस दिली पाहिजे. जर वारवांर हा प्रकार घडत असेल तर त्या हॉटेल चालकांचा परवाना रद्द करून त्यांच्या अन्न व सुरक्षा मानदे कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे.