शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

‘तापी मेगा रिचार्ज’ सर्वेक्षण सुरू

By admin | Updated: September 19, 2016 00:22 IST

मेळघाटातील जनतेची ३६ वर्षांपासून झोप उडवून देणाऱ्या तापी प्रकल्पाच्या मेगा रिचार्ज योजनेचे प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम मागील दहा दिवसांपासून तालुक्यात सुरू झाले आहे.

लोकप्रतिनिधी अनभिज्ञ : कर्मचारी १० दिवसांपासून तळ ठोकूनश्यामकांत पाण्डेय धारणीमेळघाटातील जनतेची ३६ वर्षांपासून झोप उडवून देणाऱ्या तापी प्रकल्पाच्या मेगा रिचार्ज योजनेचे प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम मागील दहा दिवसांपासून तालुक्यात सुरू झाले आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणाच्या कामात इतकी गुप्तता ठेवण्यात येत आहे की सर्व्हे करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहात न थांबता शहरातच भाड्याने रुम घेऊन आपली ओळख लपविण्याचे काम करीत असल्याची माहिती आहे. तापी नदीचे पाणी पावसाळ्यात वाहून जाते. त्यामुळे या नदीवर मोठे सिंचन प्रकल्प व्हावे, अशी सूचना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७४ मध्ये धारणीत आल्यावर केली होती. तेव्हा त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानुसार खारिया-घुटीघाट येथे तापी प्रकल्प टप्पा २ तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. १९७८ मध्ये या प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा तयार करून पाठविण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकल्प थंडबस्त्यात गेले होते. १९९५ मध्ये युती शासनात पुन्हा या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली. माजी आमदार पटल्या गुरुजी व एकनाथराव खडसे यांनी हत्तीवर बसून खारिया-घुटीघाट यांनी २००४ मध्ये पुन्हा या प्रकल्पाला गती दिली होती. मात्र स्थानिक जनतेच्या विरोधामुळे हे प्रकल्प पुन्हा थंडबस्त्यात पडले होते. यावेळी पुन्हा महायुती शासनाने या योजनेकडे आपले लक्ष केंद्रित केले. आता तापी प्रकल्प टप्पा २ हे नाव बदलून तापी मेगा रिचार्ज योजना असे नामकरण करण्यात आले आहे. यावेळी सुरू असलेल्या तापी प्रकल्पाबाबतच्या बैठका व निर्णय हे मध्यप्रदेशातील बुरहाणपूर येथून सुरू आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे अवलोकन केले असता याचा मेळघाटला तीळमात्रही फायदा होत नसल्याने उलट नुकसानी अधिक होणार आहे.त्यामुळे प्रकल्प स्थळ धारणी तालुक्यात असतानाही बैठका मात्र मध्यप्रदेशात सुरू आहेत. परिणामी मेळघाटवासीयांना संशय येऊ लागला आहे. मेळघाटचा बळी देऊन मध्य प्रदेशचा विकासया मेगा रिचार्जची पाहणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलसंशासन मंत्री उमा भारती यांच्यासोबत हवाई दौरा केला आहे. या प्रकल्पातील पाण्याचा बहुतांश लाभ महाराष्ट्रातील खानदेश व मध्यप्रदेशात होणार असल्याने मध्यप्रदेशच्या मंत्री अर्चना चिटणीस यांचा या योजनेवर विशेष भर आहे, तर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्रीसुद्धा खानदेशचे असल्याने त्यांनीही ही योजना लवकर सुरू व्हावी, यासाठी कंबर कसली आहे. मात्र मध्यप्रदेश आणि खानदेशचा विकास मेळघाटाचा बळी देऊन केला जात आहे. याकडे सध्या जनप्रतिनिधींचे प्रचंड दुर्लक्ष येत्या काळात आदिवासी जनतेसाठी कष्टकरी ठरणार आहे. सध्या सर्वेचे काम सुरू झाल्यावरही सर्वत्र स्मशानशांतता असल्याने येथील नेत्यांनी मूकसमर्थन दिल्याचे बोलले जात आहे.