शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गावांना मिळणार ४६ कोटी

By admin | Updated: September 20, 2014 23:42 IST

सन २०१२-१३ मध्ये राज्यातील १७४१ गावे तंटामुक्त जाहीर करून या गावांना ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रूपये बक्षिसांची रक्कम मंजूर करण्यात आली. यात अमरावती जिल्ह्यातील ९६ तंटामुक्त गावांना

सुरेश सवळे - चांदूरबाजारसन २०१२-१३ मध्ये राज्यातील १७४१ गावे तंटामुक्त जाहीर करून या गावांना ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रूपये बक्षिसांची रक्कम मंजूर करण्यात आली. यात अमरावती जिल्ह्यातील ९६ तंटामुक्त गावांना २ कोटी ४९ लाख रूपये मंजूर झाले आहे. ही पुरस्काराची रक्कम मंजूर केल्याने भविष्यात तंटामुक्त गाव मोहिमेला अधिक गती मिळणार आहे. गावात तंटे होऊ नयेत म्हणून तसेच दाखल झालेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून मिळविण्यासाठी व्यवस्था निर्माण व्हावी या दृष्टीने १५ आॅगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने भविष्यात तंटे निर्माण होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे, दाखल केलेल्या दिवाणी, महसुली व इतर तंट्याची माहिती संकलित करुन ते लोकसहभागातून सामोपचाराने मिटविले जातात. सन २०१२-१३ मध्ये गाव पुरस्कारासाठी गावांची यादी शासनाच्या गृह विभागाने नुकतीच जाहीर केली. यामध्ये तंटामुक्त गावे व त्यांना मिळणारी बक्षिसांची रक्कम मंजूर करण्यात आली. यात राज्यातील सर्वाधिक २४६ गावे बुलडाणा जिल्ह्यात तंटामुक्त झाली. या गावांना ७ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये बक्षीस स्वरुपात मिळणार आहेत. त्याखालोखाल हिंगोलीतील १४८ तंटामुक्त गावांना ३ कोटी ८३ लाख ५० हजार तर नाशिक ग्रामीणमधील १३४ तंटामुक्त गावांना ३ कोटी १९ लाख मंजूर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे परभणीतील ४५ गावांना १ कोटी २९ लाख ५० हजार, नांदेड- १ गाव ३ लाख, उस्मानाबाद- २९ गावांना ७९ लाख ७५ हजार, बीड- ९ गावांना २५ लाख, जालना- ८५ गावांना १ कोटी ९६ लाख ५० हजार, औरंगाबाद ग्रामीण ६४ गावांना १ कोटी ५९ लाख, अकोला ४९ गावांना ९० लाख रूपये, वाशीम ३४ गावांना ६१ लाख, यवतमाळ १२९ गावांना ३ कोटी १५ लाख ७५ हजार, नागपूर ग्रामीण ९० गावांना २ कोटी १७ लाख ५० हजार, भंडारा १३ गावांना २६ लाख रूपये, चंद्रपूर १०५ गावांना २ कोटी ५६ लाख ७५ हजार, गडचिरोली ४१ गावांना ८५ लाख रूपये, वर्धा ६ गावांना २१ लाख रूपये, नंदूरबार १५ गावांना ४२ लाख रूपये, धुळे जिल्ह्यातील ३२ गावांना १ कोटी २ लाख रूपये, जळगाव ७१ गावांना १ कोटी ७० लाख, अहमदनगर ४७ गावांना १ कोटी २८ लाख ५० हजार, सोलापूर ग्रामीण ५६ गावांना २ कोटी ९ लाख, सांगली १ गावाला ७ लाख रूपये, सातारा १५ गावांना ४६ लाख, कोल्हापूर ५३ गावांना २ कोटी ११ लाख २५ हजार, पूणे ग्रामीण २६ गावांना ९५ लाख रूपये, सिंधुदुर्ग २१ गावांना ६७ लाख रूपये, रत्नागिरी जिल्ह्यातील १३ तंटामुक्त गावांना २४ लाख रूपये, रायगड जिल्ह्यातील ८ गावांना ३० लाख रूपये, ठाणे ग्रामीण मधील ५९ तंटामुक्त गावांना १ कोटी ५६ लाख रूपये अशा ३३ जिल्ह्यातील १७४१ तंटामुक्त गावांना महात्मागांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपयांस मान्यता देण्यात आली असून येत्या काही दिवसांत संबंधित जिल्ह्यांतील पुरस्कारप्राप्त गावांना पुरस्काराच्या रकमेचे धनादेश संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांमार्फत गावनिहाय वितरित करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील गावांना २ कोटी ४९ लाख रुपयांचे वाटप होेणार आहे.