शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

पावसाळ्यातही २३४ गाववाड्यांमध्ये टँकरवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST

अमरावती : मृग नक्षत्र सुरू होऊन महिना उलटत असताना हव्या त्या प्रमाणात वरुणराजा बरसलेला नाही. त्यामुळे राज्यातील २३४ गाव ...

अमरावती : मृग नक्षत्र सुरू होऊन महिना उलटत असताना हव्या त्या प्रमाणात वरुणराजा बरसलेला नाही. त्यामुळे राज्यातील २३४ गाव व वाड्यांमध्ये टँकरवारी सुरू आहे. सोबतच पाऊस नसल्याने राज्यातील जल प्रकल्पांमध्येदेखील केवळ २६.८५ टक्के जलसाठा आहे.

उन्हाळ्यात राज्याला मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी मग टँकरवारी सुरू होते. त्यात खासगी आणि शासकीय असे दोन पठडीतील टँकर गाव-वाड्यापर्यंत पाणी घेऊन पोहोचतात. मुबलक पाण्यासाठी लोकांना हवा असतो तो दमदार पाऊस. मात्र, यंदा महिना होऊनही ‘तो ’ दमदार न बरसल्याने शेतकरी हतबल झाला असताना गावागावांना पाणीपुरवठा करणारे सिंचन प्रकल्पही कोरडे पडले आहेत. ५ जुलैच्या आकडेवारीनुसार, तूर्तास राज्यातील १०९ गावे व १२५ वाड्यांमध्ये ३६ शासकीय व ५८ खासगी अशा एकूण ९४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात ठाणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये तूर्तास टँकरवारी नाही. नाशिक विभागात ५४, पुणे विभागात ८, औरंगाबाद विभागात ६, अमरावती विभागात २० व नागपूर विभागात ६ टँकर सुरू आहेत.

बॉक्स

असा आहे जलसंचय

अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पांमध्ये ३०.८७ टक्के, औरंगाबाद विभागातील ९६४ प्रकल्पांमध्ये २५.०६, कोकण विभागातील १७६ प्रकल्पांमध्ये ३८.५३, नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांमध्ये २९.४५ टक्के, नाशिक विभागातील ५७१ प्रकल्पांमध्ये २०.४६, तर पुणे विभागातील ७२६ प्रकल्पांमध्ये २५.६८ टक्के अशा एकूण ३२७६ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये केवळ २६.८५ टक्के जलसंचय आहे.