शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
3
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
4
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
5
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
6
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
7
"जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
8
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
9
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
10
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
12
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
13
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
14
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
15
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
16
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
17
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
18
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
19
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
20
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!

पावसाळ्यातही २३४ गाववाड्यांमध्ये टँकरवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST

अमरावती : मृग नक्षत्र सुरू होऊन महिना उलटत असताना हव्या त्या प्रमाणात वरुणराजा बरसलेला नाही. त्यामुळे राज्यातील २३४ गाव ...

अमरावती : मृग नक्षत्र सुरू होऊन महिना उलटत असताना हव्या त्या प्रमाणात वरुणराजा बरसलेला नाही. त्यामुळे राज्यातील २३४ गाव व वाड्यांमध्ये टँकरवारी सुरू आहे. सोबतच पाऊस नसल्याने राज्यातील जल प्रकल्पांमध्येदेखील केवळ २६.८५ टक्के जलसाठा आहे.

उन्हाळ्यात राज्याला मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी मग टँकरवारी सुरू होते. त्यात खासगी आणि शासकीय असे दोन पठडीतील टँकर गाव-वाड्यापर्यंत पाणी घेऊन पोहोचतात. मुबलक पाण्यासाठी लोकांना हवा असतो तो दमदार पाऊस. मात्र, यंदा महिना होऊनही ‘तो ’ दमदार न बरसल्याने शेतकरी हतबल झाला असताना गावागावांना पाणीपुरवठा करणारे सिंचन प्रकल्पही कोरडे पडले आहेत. ५ जुलैच्या आकडेवारीनुसार, तूर्तास राज्यातील १०९ गावे व १२५ वाड्यांमध्ये ३६ शासकीय व ५८ खासगी अशा एकूण ९४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात ठाणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये तूर्तास टँकरवारी नाही. नाशिक विभागात ५४, पुणे विभागात ८, औरंगाबाद विभागात ६, अमरावती विभागात २० व नागपूर विभागात ६ टँकर सुरू आहेत.

बॉक्स

असा आहे जलसंचय

अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पांमध्ये ३०.८७ टक्के, औरंगाबाद विभागातील ९६४ प्रकल्पांमध्ये २५.०६, कोकण विभागातील १७६ प्रकल्पांमध्ये ३८.५३, नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांमध्ये २९.४५ टक्के, नाशिक विभागातील ५७१ प्रकल्पांमध्ये २०.४६, तर पुणे विभागातील ७२६ प्रकल्पांमध्ये २५.६८ टक्के अशा एकूण ३२७६ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये केवळ २६.८५ टक्के जलसंचय आहे.