शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

पावसाळ्यातही २३४ गाववाड्यांमध्ये टँकरवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST

अमरावती : मृग नक्षत्र सुरू होऊन महिना उलटत असताना हव्या त्या प्रमाणात वरुणराजा बरसलेला नाही. त्यामुळे राज्यातील २३४ गाव ...

अमरावती : मृग नक्षत्र सुरू होऊन महिना उलटत असताना हव्या त्या प्रमाणात वरुणराजा बरसलेला नाही. त्यामुळे राज्यातील २३४ गाव व वाड्यांमध्ये टँकरवारी सुरू आहे. सोबतच पाऊस नसल्याने राज्यातील जल प्रकल्पांमध्येदेखील केवळ २६.८५ टक्के जलसाठा आहे.

उन्हाळ्यात राज्याला मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी मग टँकरवारी सुरू होते. त्यात खासगी आणि शासकीय असे दोन पठडीतील टँकर गाव-वाड्यापर्यंत पाणी घेऊन पोहोचतात. मुबलक पाण्यासाठी लोकांना हवा असतो तो दमदार पाऊस. मात्र, यंदा महिना होऊनही ‘तो ’ दमदार न बरसल्याने शेतकरी हतबल झाला असताना गावागावांना पाणीपुरवठा करणारे सिंचन प्रकल्पही कोरडे पडले आहेत. ५ जुलैच्या आकडेवारीनुसार, तूर्तास राज्यातील १०९ गावे व १२५ वाड्यांमध्ये ३६ शासकीय व ५८ खासगी अशा एकूण ९४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात ठाणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये तूर्तास टँकरवारी नाही. नाशिक विभागात ५४, पुणे विभागात ८, औरंगाबाद विभागात ६, अमरावती विभागात २० व नागपूर विभागात ६ टँकर सुरू आहेत.

बॉक्स

असा आहे जलसंचय

अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पांमध्ये ३०.८७ टक्के, औरंगाबाद विभागातील ९६४ प्रकल्पांमध्ये २५.०६, कोकण विभागातील १७६ प्रकल्पांमध्ये ३८.५३, नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांमध्ये २९.४५ टक्के, नाशिक विभागातील ५७१ प्रकल्पांमध्ये २०.४६, तर पुणे विभागातील ७२६ प्रकल्पांमध्ये २५.६८ टक्के अशा एकूण ३२७६ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये केवळ २६.८५ टक्के जलसंचय आहे.