शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मिठाई घेताय? सावधान !

By admin | Updated: October 4, 2016 00:10 IST

अळीयुक्त कचोरी विकणाऱ्या रघुवीरच्या मिठाईत, खव्यात नेमके असते तरी काय, हा सामान्यांच्या आरोग्याशी जुळलेला अत्यंत गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

एफडीए 'रघुवीर'मय : खव्यात नेमके असते तरी काय ?अमरावती : अळीयुक्त कचोरी विकणाऱ्या रघुवीरच्या मिठाईत, खव्यात नेमके असते तरी काय, हा सामान्यांच्या आरोग्याशी जुळलेला अत्यंत गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नाश्त्याप्रमाणेच रघुवीरच्या मिठाईवरही लोकांनी विश्वास ठेवला होता. घरातील कुठल्याही शुभप्रसंगी रघुवीरची मिठाई बरेच जण न्यायचे. परंतु जिल्हाभरात दुधाचा आश्चर्यकारक तुटवडा असतानाही रघुवीरला असलेली दुधाची मुबलक उपलब्धी आणि त्यातून मागणीनुसार विक्रीसाठी तयार केली जाणारी मिठाई, या बाबी तज्ज्ञांच्याही भुवया उंचावणाऱ्या ठरल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते जिल्ह्यातील दूध उत्पादनाच्या भरवशावर रघुवीरची मिठाई तयार होणे अशक्य आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या दुधाची गुणवत्ता बघता ते मिठाई निर्मितीसाठी अक्षम आहे. तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केलेल्या या गंभीर मुद्यावर 'लोकमत'ने यापूर्वीही एफडीचे लक्ष वेधले होते. एफडीएने सामान्यांच्या पोटात जाणाऱ्या या मिठाईबाबत संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष भूमिका निभावली नाही. एफडीएने 'रॅन्डम सॅम्पल्स' घेणे अपेक्षित आहे. हे सॅम्पल्स अचानकपणे वारंवार घेतले तरच गुणवत्तेवर नियंत्रण राहू शकते. एफडीए अधिकाऱ्यांची नियुक्ती याच कार्यासाठी करण्यात आली आहे. सामान्य नागरिक भरत असलेल्या कराच्या पैशातून एफडीएच्या अधिकाऱ्यांचे वेतन अदा केले जाते. सामान्यांच्या आरोग्याला सुरक्षितता पुरविली जावी, हा त्यामागचा सरकारचा मूळ हेतू. परंतु सामान्यांच्या पोटात जाणारे दोषपूर्ण अन्न रोखण्याऐवजी नियमबाह्य अन्न विकणाऱ्यांनाच अभय देण्यासाठी एफडीए अधिकारी कार्यमग्न आहेत.लोक झाले सतर्करघुवीरतर्फे केला जाणारा दर्जा आणि गुणवत्तेचा दावा कसा फोल आहे, हे कचोरीतील अळीतून सिद्ध झालेच आहे. अधिकाऱ्यांसमोर रघुवीरने पेश केलेली काजुची प्लेट 'लोकमत'ने लोकदरबारात मांडल्यानंतर त्यांच्या व्यवसायाची पद्धतीही आता अमरावतीकरांना उत्तमरीत्या अवगत झाली आहे. पर्याय नसल्यामुळे रघुवीरला महत्त्व देणारी मंडळी आता कमालिची सतर्क झाली आहे. लोकमत कार्यालयात येऊन अनेकांनी त्यांना रघुवीरमध्ये आलेले आक्षेपार्ह अनुभव कथन केलेत. असे अनुभव सांगणाऱ्यांमध्ये जसा सामान्यांचा समावेश आहे तसाच उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठितांचाही त्यात समावेश आहे. काही डॉक्टर्स मंडळींनीही 'लोकमत'जवळ धक्कादायक अनुभव आणि निरीक्षणे नोंदविली. झुरळ, फकडी, दगड आढल्याचेही सांगितले. परंतु त्यांचा आवाज दाबण्यात आला होता. 'लोकमत'ने मुद्दा लोकदरबारात मांडल्यामुळे सामान्यांना व्यासपीठ मिळाल्याची भावना अमरावतीकरांनी व्यक्त केली. 'लोकमत'च्या अमरावती कार्यालयात पत्र पाठवून पाठपुराव्याबाबत अभिनंदन केले.