शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिठाई घेताय? सावधान !

By admin | Updated: October 4, 2016 00:10 IST

अळीयुक्त कचोरी विकणाऱ्या रघुवीरच्या मिठाईत, खव्यात नेमके असते तरी काय, हा सामान्यांच्या आरोग्याशी जुळलेला अत्यंत गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

एफडीए 'रघुवीर'मय : खव्यात नेमके असते तरी काय ?अमरावती : अळीयुक्त कचोरी विकणाऱ्या रघुवीरच्या मिठाईत, खव्यात नेमके असते तरी काय, हा सामान्यांच्या आरोग्याशी जुळलेला अत्यंत गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नाश्त्याप्रमाणेच रघुवीरच्या मिठाईवरही लोकांनी विश्वास ठेवला होता. घरातील कुठल्याही शुभप्रसंगी रघुवीरची मिठाई बरेच जण न्यायचे. परंतु जिल्हाभरात दुधाचा आश्चर्यकारक तुटवडा असतानाही रघुवीरला असलेली दुधाची मुबलक उपलब्धी आणि त्यातून मागणीनुसार विक्रीसाठी तयार केली जाणारी मिठाई, या बाबी तज्ज्ञांच्याही भुवया उंचावणाऱ्या ठरल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते जिल्ह्यातील दूध उत्पादनाच्या भरवशावर रघुवीरची मिठाई तयार होणे अशक्य आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या दुधाची गुणवत्ता बघता ते मिठाई निर्मितीसाठी अक्षम आहे. तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केलेल्या या गंभीर मुद्यावर 'लोकमत'ने यापूर्वीही एफडीचे लक्ष वेधले होते. एफडीएने सामान्यांच्या पोटात जाणाऱ्या या मिठाईबाबत संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष भूमिका निभावली नाही. एफडीएने 'रॅन्डम सॅम्पल्स' घेणे अपेक्षित आहे. हे सॅम्पल्स अचानकपणे वारंवार घेतले तरच गुणवत्तेवर नियंत्रण राहू शकते. एफडीए अधिकाऱ्यांची नियुक्ती याच कार्यासाठी करण्यात आली आहे. सामान्य नागरिक भरत असलेल्या कराच्या पैशातून एफडीएच्या अधिकाऱ्यांचे वेतन अदा केले जाते. सामान्यांच्या आरोग्याला सुरक्षितता पुरविली जावी, हा त्यामागचा सरकारचा मूळ हेतू. परंतु सामान्यांच्या पोटात जाणारे दोषपूर्ण अन्न रोखण्याऐवजी नियमबाह्य अन्न विकणाऱ्यांनाच अभय देण्यासाठी एफडीए अधिकारी कार्यमग्न आहेत.लोक झाले सतर्करघुवीरतर्फे केला जाणारा दर्जा आणि गुणवत्तेचा दावा कसा फोल आहे, हे कचोरीतील अळीतून सिद्ध झालेच आहे. अधिकाऱ्यांसमोर रघुवीरने पेश केलेली काजुची प्लेट 'लोकमत'ने लोकदरबारात मांडल्यानंतर त्यांच्या व्यवसायाची पद्धतीही आता अमरावतीकरांना उत्तमरीत्या अवगत झाली आहे. पर्याय नसल्यामुळे रघुवीरला महत्त्व देणारी मंडळी आता कमालिची सतर्क झाली आहे. लोकमत कार्यालयात येऊन अनेकांनी त्यांना रघुवीरमध्ये आलेले आक्षेपार्ह अनुभव कथन केलेत. असे अनुभव सांगणाऱ्यांमध्ये जसा सामान्यांचा समावेश आहे तसाच उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठितांचाही त्यात समावेश आहे. काही डॉक्टर्स मंडळींनीही 'लोकमत'जवळ धक्कादायक अनुभव आणि निरीक्षणे नोंदविली. झुरळ, फकडी, दगड आढल्याचेही सांगितले. परंतु त्यांचा आवाज दाबण्यात आला होता. 'लोकमत'ने मुद्दा लोकदरबारात मांडल्यामुळे सामान्यांना व्यासपीठ मिळाल्याची भावना अमरावतीकरांनी व्यक्त केली. 'लोकमत'च्या अमरावती कार्यालयात पत्र पाठवून पाठपुराव्याबाबत अभिनंदन केले.