शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

मिठाई घेताय? सावधान !

By admin | Updated: October 4, 2016 00:10 IST

अळीयुक्त कचोरी विकणाऱ्या रघुवीरच्या मिठाईत, खव्यात नेमके असते तरी काय, हा सामान्यांच्या आरोग्याशी जुळलेला अत्यंत गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

एफडीए 'रघुवीर'मय : खव्यात नेमके असते तरी काय ?अमरावती : अळीयुक्त कचोरी विकणाऱ्या रघुवीरच्या मिठाईत, खव्यात नेमके असते तरी काय, हा सामान्यांच्या आरोग्याशी जुळलेला अत्यंत गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नाश्त्याप्रमाणेच रघुवीरच्या मिठाईवरही लोकांनी विश्वास ठेवला होता. घरातील कुठल्याही शुभप्रसंगी रघुवीरची मिठाई बरेच जण न्यायचे. परंतु जिल्हाभरात दुधाचा आश्चर्यकारक तुटवडा असतानाही रघुवीरला असलेली दुधाची मुबलक उपलब्धी आणि त्यातून मागणीनुसार विक्रीसाठी तयार केली जाणारी मिठाई, या बाबी तज्ज्ञांच्याही भुवया उंचावणाऱ्या ठरल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते जिल्ह्यातील दूध उत्पादनाच्या भरवशावर रघुवीरची मिठाई तयार होणे अशक्य आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या दुधाची गुणवत्ता बघता ते मिठाई निर्मितीसाठी अक्षम आहे. तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केलेल्या या गंभीर मुद्यावर 'लोकमत'ने यापूर्वीही एफडीचे लक्ष वेधले होते. एफडीएने सामान्यांच्या पोटात जाणाऱ्या या मिठाईबाबत संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष भूमिका निभावली नाही. एफडीएने 'रॅन्डम सॅम्पल्स' घेणे अपेक्षित आहे. हे सॅम्पल्स अचानकपणे वारंवार घेतले तरच गुणवत्तेवर नियंत्रण राहू शकते. एफडीए अधिकाऱ्यांची नियुक्ती याच कार्यासाठी करण्यात आली आहे. सामान्य नागरिक भरत असलेल्या कराच्या पैशातून एफडीएच्या अधिकाऱ्यांचे वेतन अदा केले जाते. सामान्यांच्या आरोग्याला सुरक्षितता पुरविली जावी, हा त्यामागचा सरकारचा मूळ हेतू. परंतु सामान्यांच्या पोटात जाणारे दोषपूर्ण अन्न रोखण्याऐवजी नियमबाह्य अन्न विकणाऱ्यांनाच अभय देण्यासाठी एफडीए अधिकारी कार्यमग्न आहेत.लोक झाले सतर्करघुवीरतर्फे केला जाणारा दर्जा आणि गुणवत्तेचा दावा कसा फोल आहे, हे कचोरीतील अळीतून सिद्ध झालेच आहे. अधिकाऱ्यांसमोर रघुवीरने पेश केलेली काजुची प्लेट 'लोकमत'ने लोकदरबारात मांडल्यानंतर त्यांच्या व्यवसायाची पद्धतीही आता अमरावतीकरांना उत्तमरीत्या अवगत झाली आहे. पर्याय नसल्यामुळे रघुवीरला महत्त्व देणारी मंडळी आता कमालिची सतर्क झाली आहे. लोकमत कार्यालयात येऊन अनेकांनी त्यांना रघुवीरमध्ये आलेले आक्षेपार्ह अनुभव कथन केलेत. असे अनुभव सांगणाऱ्यांमध्ये जसा सामान्यांचा समावेश आहे तसाच उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठितांचाही त्यात समावेश आहे. काही डॉक्टर्स मंडळींनीही 'लोकमत'जवळ धक्कादायक अनुभव आणि निरीक्षणे नोंदविली. झुरळ, फकडी, दगड आढल्याचेही सांगितले. परंतु त्यांचा आवाज दाबण्यात आला होता. 'लोकमत'ने मुद्दा लोकदरबारात मांडल्यामुळे सामान्यांना व्यासपीठ मिळाल्याची भावना अमरावतीकरांनी व्यक्त केली. 'लोकमत'च्या अमरावती कार्यालयात पत्र पाठवून पाठपुराव्याबाबत अभिनंदन केले.