शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

चौकशी समितीचा ‘पीडीएमसी’तील गंभीर त्रुट्यांवर कटाक्ष

By admin | Updated: June 4, 2017 00:08 IST

नवजात चार शिशूंच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणाची चौकशी करीत असताना पाच सदस्यीय समितीने पीडीएमसी प्रशासनावर गंभीर ताशेरे ओढले.

शिशू मृत्यू प्रकरण : अन्य डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवजात चार शिशूंच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणाची चौकशी करीत असताना पाच सदस्यीय समितीने पीडीएमसी प्रशासनावर गंभीर ताशेरे ओढले. पीडीएमसी हे टेरिटरी केअर सेंटर असताना अशा त्रुट्या अपेक्षित नसून संबंधित सर्वांवर योग्य ती कार्यवाहीची शिफारस समितीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर चौकशी अहवालात केली आहे.येथील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ‘पीडीएमसी’त रविवारी रात्री एकाचवेळी चार नवजात शिशूंचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राऊत, पॅथालॉजिस्ट व्ही.व्ही. जाधव, बालरोगतज्ज्ञ एन.जी. राऊत, आर.एस. नागलकर तथा कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ.के.बी.देशमुख यांचा त्यात समावेश होता. या समितीने ३० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सुपूर्द केला.एनआयसीयूचे दर आठवड्याला निजंतूकीकरण करणे अनिवार्य असताना प्रत्यक्षात १३ वेळा एनआयसीयूमध्ये फंगी’ असल्याचा अहवाल आहे. याबाबत संबंधित विभागप्रमुखांनी कुठलीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे एनआयसीयूच्या प्रोटोकॉलचे निकष पाळण्यात आले नसल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले. एनआयसीयू इन्फेक्शन कंट्रोल व्यवस्थितरीत्या व पूर्णपणे केली नसल्याची टिप्पणी समितीने केली आहे. संबंधित चारही बाळ नार्मल असताना ते गंभीर होत गेले. त्या काळात कोणत्याही डॉक्टरने त्यांना बघितले नाही. चारही नवजात बाळांचा मृत्यू २९ मे रोजी पहाटे २ ते ३ दरम्यान मृत्यू झाल्याचे मत या समितीने नोंदविले आहे. आफरिन बानो यांचे बाळ २९ मे रोजी पहाटे १२.१० वाजता, शिल्पा वेरुळकर यांचे बाळ पहाटे २.२० वाजता, माधुरी कावरे यांचे बाळ पहाटे २ वाजता, तर पूजा घरडे यांचे बाळ पहाटे २.३५ वाजता गंभीर झाल्याची नोंद केसपेपरवर घेण्यात आली. अर्थात या कालावधीत कोणत्याही डाक्टरांनी बघितले नसल्याचे समितीने म्हटले आहे. त्यापार्श्वभूमिवर पीडीएमसीतील अन्य डॉक्टरांची चौकशी होणार असून त्यातील काहींना सहआरोपी करण्याचे संकेत मिळाले आहेत.कट्टा एनआयसीयू बाहेर वस्तुस्थिती पाहता एनआयसीयुमध्ये २४ तास एका डॉक्टरने उपलब्ध राहणे अनिवार्य आहे. प्रत्यक्षात एका बाळाची प्रकृती गंभीर झाली तेव्हा ड्युटीवरील कट्टा उपस्थित नव्हते.त्यांना परिचारिकेने कळविल्यानंतर ते आले. यावरुन प्रथमदर्शनी नवजात बाळांच्या उपचारात निष्काळजीपणा दिसून येत असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.