शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी समितीचा ‘पीडीएमसी’तील गंभीर त्रुट्यांवर कटाक्ष

By admin | Updated: June 4, 2017 00:08 IST

नवजात चार शिशूंच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणाची चौकशी करीत असताना पाच सदस्यीय समितीने पीडीएमसी प्रशासनावर गंभीर ताशेरे ओढले.

शिशू मृत्यू प्रकरण : अन्य डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवजात चार शिशूंच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणाची चौकशी करीत असताना पाच सदस्यीय समितीने पीडीएमसी प्रशासनावर गंभीर ताशेरे ओढले. पीडीएमसी हे टेरिटरी केअर सेंटर असताना अशा त्रुट्या अपेक्षित नसून संबंधित सर्वांवर योग्य ती कार्यवाहीची शिफारस समितीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर चौकशी अहवालात केली आहे.येथील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ‘पीडीएमसी’त रविवारी रात्री एकाचवेळी चार नवजात शिशूंचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राऊत, पॅथालॉजिस्ट व्ही.व्ही. जाधव, बालरोगतज्ज्ञ एन.जी. राऊत, आर.एस. नागलकर तथा कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ.के.बी.देशमुख यांचा त्यात समावेश होता. या समितीने ३० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सुपूर्द केला.एनआयसीयूचे दर आठवड्याला निजंतूकीकरण करणे अनिवार्य असताना प्रत्यक्षात १३ वेळा एनआयसीयूमध्ये फंगी’ असल्याचा अहवाल आहे. याबाबत संबंधित विभागप्रमुखांनी कुठलीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे एनआयसीयूच्या प्रोटोकॉलचे निकष पाळण्यात आले नसल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले. एनआयसीयू इन्फेक्शन कंट्रोल व्यवस्थितरीत्या व पूर्णपणे केली नसल्याची टिप्पणी समितीने केली आहे. संबंधित चारही बाळ नार्मल असताना ते गंभीर होत गेले. त्या काळात कोणत्याही डॉक्टरने त्यांना बघितले नाही. चारही नवजात बाळांचा मृत्यू २९ मे रोजी पहाटे २ ते ३ दरम्यान मृत्यू झाल्याचे मत या समितीने नोंदविले आहे. आफरिन बानो यांचे बाळ २९ मे रोजी पहाटे १२.१० वाजता, शिल्पा वेरुळकर यांचे बाळ पहाटे २.२० वाजता, माधुरी कावरे यांचे बाळ पहाटे २ वाजता, तर पूजा घरडे यांचे बाळ पहाटे २.३५ वाजता गंभीर झाल्याची नोंद केसपेपरवर घेण्यात आली. अर्थात या कालावधीत कोणत्याही डाक्टरांनी बघितले नसल्याचे समितीने म्हटले आहे. त्यापार्श्वभूमिवर पीडीएमसीतील अन्य डॉक्टरांची चौकशी होणार असून त्यातील काहींना सहआरोपी करण्याचे संकेत मिळाले आहेत.कट्टा एनआयसीयू बाहेर वस्तुस्थिती पाहता एनआयसीयुमध्ये २४ तास एका डॉक्टरने उपलब्ध राहणे अनिवार्य आहे. प्रत्यक्षात एका बाळाची प्रकृती गंभीर झाली तेव्हा ड्युटीवरील कट्टा उपस्थित नव्हते.त्यांना परिचारिकेने कळविल्यानंतर ते आले. यावरुन प्रथमदर्शनी नवजात बाळांच्या उपचारात निष्काळजीपणा दिसून येत असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.