शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनेच्या अनुदान मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना

By admin | Updated: May 25, 2015 00:31 IST

संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकास्तरावरील समित्या अस्तित्वात नसताना निराधार योजनांच्या लाभार्थींचे अनुदान मंजूर ..

समस्या निकाली : समित्या अस्तित्वात नसल्याने होतो खोळंबाजितेंद्र दखने अमरावतीसंजय गांधी निराधार योजनेच्या तालुकास्तरावरील समित्या अस्तित्वात नसताना निराधार योजनांच्या लाभार्थींचे अनुदान मंजूर करण्याचे अधिकार संबंधित तालुक्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. हे अधिकार काढून आता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदारांना देण्यात आले आहेत.निराधार, वृध्द व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्ता महिला आदी दुर्बल घटकातील व्यक्तिंना विविध योजनांमधून दरमहा अनुदान दिले जाते. पात्र लाभार्थींना अनुदान मंजूर करण्यासाठी शासनाच्यावतीने तालुका पातळीवर समितीची स्थापना करण्यात येते. समितीचे अध्यक्ष व सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे अधिकारी किंवा कार्यकर्ते असतात. समितीचे सदस्य सचिव म्हणून तहसीलदार काम पाहतात. आलेल्या अर्जांची छाननी करून समितीकडून अनुदान मंजूर केले जाते. अनेकदा ही समिती अस्तित्वात नसताना लाभार्थींचे अर्ज प्रलंबित राहतात. यावर उपाय म्हणून शासनाने २०१० मध्ये लाभार्थींचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते. आता हे अधिकार तहसीलदारांच्या सुपूर्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी एकच तहसीलदारसमित्या अस्तित्वात नसल्याने सध्या संपूर्ण जिल्ह्यातील लाभार्थींचे अनुदान मंजूर करण्याचे अधिकार संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदारांकडे आले आहेत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या या समस्येचा निपटारा झाला आहे.संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मंजूर करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे होते. हे अधिकार शासनाने संबंधित योजनेच्या तहसीलदारांकडे दिले आहेत. मात्र, तहसीलदारांकडील कामाचा ताण लक्षात घेता पूर्वीप्रमाणे एसडीओ यांच्याकडेच अनुदान मंजुरीचे अधिकार कायम ठेवायला हवे होते. परंतु शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.- सुरेश बगळे, कार्याध्यक्ष, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना.