शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शांतता, सलोख्यासाठी काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:44 IST

सामाजिक ऐक्य आणि सलोखा जपावा, शांतता कायम राहावी, यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या सूचनेवरून सोमवारी देशभरात राज्य आणि जिल्हास्तरावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. त्यानुसार येथील इर्विन चौकात सकाळी १० पासून शहर, जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे लाक्षणिक उपोषणाला प्रारंभ झाला. यावेळी भाजप सरकारविरोधी नारेबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देशक्तीप्रदर्शन : शहर-ग्रामीणचे स्वतंत्र तंबू, भाजपविरोधी नारेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सामाजिक ऐक्य आणि सलोखा जपावा, शांतता कायम राहावी, यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या सूचनेवरून सोमवारी देशभरात राज्य आणि जिल्हास्तरावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. त्यानुसार येथील इर्विन चौकात सकाळी १० पासून शहर, जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे लाक्षणिक उपोषणाला प्रारंभ झाला. यावेळी भाजप सरकारविरोधी नारेबाजी करण्यात आली.महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने लाक्षणिक उपोषणास सुरुवात झाली. शहर काँग्रेसतर्फे माजी आमदार रावसाहेब शेखावत, सुलभा खोडके, शहराध्यक्ष किशोर बोरकर, बबलू शेखावत, विलास इंगोले, पुष्पा बोंडे यांनी, तर ग्रामीणतर्फे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे आदींनी उपोषणाचे नेतृत्व केले.उपोषणस्थळ एकच असताना काँग्रेसने शहर व ग्रामीण असे स्वतंत्र दोन तंबू ठोकल्याची चर्चा जोरात रंगली. परिणामी काँग्रेसमध्ये गटबाजी कायम असल्याचे मानले जात आहे.आंदोलनात माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, साजिद फुलारी, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, उषा उताणे, सुधाकर भारसाकळे, अनंत साबळे, प्रकाश साबळे, श्रीराम नेहर, शिवाजी बंड, मोहन सिंगवी, गणेश आरेकर, सुरेश निमकर, गजानन राठोड, अभिजित बोके, दिलीप काळबांडे, विनोद गुडदे, प्रकाश काळबांडे, बाळासाहेब हिंगणीकर, हरिभाऊ मोहोड, नितीन दगडकर, दयाराम काळे, सुरेश आडे, किशोर किटूकले, बिटू मंगरोळे, भागवत खांडे, संजय वानखडे, विलास गांजरे, अभिजित देवके, किशोर देशमुख, विठ्ठल सरडे, दिवाकर देशमुख, संजय मापले, श्रीपाल पाल, शिटू सूर्यवंशी, कांचनमाला गावंडे, छाया दंडाळे, बबलू बोबडे, माजी मंत्री सुरेंद्र भुयार, विजय बोंडे, वंदना कंगाले, नीलिमा काळे, मंजुश्री महल्ले, प्रशांत डवरे, शोभा शिंदे, प्रदीप हिवसे, सुनीता भेले, शेख जफर, साहेबराव घोगरे, अनिल माधोगढीया, गणेश पाटील, बी.आर. देशमुख, नानाभाई सोनी, संजय वाघ, पुरुषोत्तम मुंधडा, बाबुसेठ खंडेलवाल, आनंद भामोरे, भैयासाहेब निचळ आदी उपस्थित होते.शासनाच्या चुकीच्या निर्णयानेच जातीय तणाव : जगतापकेंद्र सरकार चुकीचे निर्णय घेऊन देशात जातीय तणाव निर्माण, दंगली घडवित असल्याचा आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी याप्रसंगी केला. केंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणांमुळे सांप्रदायिक सद्भाव लोप पावत चालला आहे. समाजात तेढ निर्माण होत आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समुदाय असुरक्षित असल्याची भावना जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केली. भाजप सरकारच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता आणि सामाजिक सलोखा संपुष्टात आला आहे. भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांना न्यायालयाने अटकेचे आदेश देऊनही सरकार त्यांना का अटक करीत नाही, असा सवाल शहराध्यक्ष किशोर बोरकर यांनी उपस्थित केला.