शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

सर्वधर्म समभावाचे प्रतीक, विश्वमानव मंदिर

By admin | Updated: January 22, 2015 00:18 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज १२ मार्च १९६५ रोजीे गुरुकुंज आश्रमातून, गुरुदेवनगरपासून एक किमी अंतरावरील उंच टेकडीवर रहायला गेले.

अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज १२ मार्च १९६५ रोजीे गुरुकुंज आश्रमातून, गुरुदेवनगरपासून एक किमी अंतरावरील उंच टेकडीवर रहायला गेले. तेथे सर्वप्रथम राष्ट्रसंतांनी राहण्यासाठी एक कुटी बांधली व तेथेच राष्ट्रसंतांना रामकृष्ण हरी मंदिराची संकल्पना सूचली. आज जे विशाल रामकृष्ण हरी मंदिर उभे आहे त्या टेकडीला राष्ट्रसंत दास टेकडी म्हणत. कारण ते स्वत:लाच ईश्वराचे दास समजत व त्यांनी लोकांनासुद्धा दास बनून काम करा, लिनतेची भावना अंगी ठेवा, असे ते आपल्या भजनातूनसुद्धा सांगत. ते म्हणत की, ‘तुकड्यादास दास रह जाये अंत मे भी निभे यह फकिरी’ या सर्वांच्या मागे राष्ट्रसंतांचा विशाल दृष्टिकोन होता. पंढरपूरची वारी करण्यादूर - दूर का जाताइथेच येवुनी सदा बसावे वाटतसे भगवंताआषाढी एकादशीला गुरुकुंजात मोठा उत्सव पार पडतो. टेकडीचे नंतर राष्ट्रसंतांनी दास टेकडी असे नामकरण केले. आज याला रामकृष्ण हरी मंदिर, दास टेकडी व विश्व मानव मंदिर या नावानेसुद्धा ओळखला जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीला तेथे भव्य प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. रामकृष्ण हरी मंदिराच्या विषयी राष्ट्रसंत म्हणतात, की रामकृष्ण हरी मंदिराची कल्पना सांप्रदायिक नाही. तात्त्विकच आहे. अखिल विश्वातील उच्चतम मानवाची कल्पना रामकृष्णहरीत अंतर्भूत आहे. कोणत्याही देशा-धर्माचे मानव येथे आल्यास त्यांना मानवधर्माचे हे स्थान आहे असे वाटायला पाहिजे, असे राष्ट्रसंत लिहितात. रामकृष्णहरी मंदिर हे उंच टेकडीवर असून निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे दररोज भाविक येथे मोठ्या संख्येने येतात. मंदिरावर जाण्यासाठी भुयारी मार्गातून जावे लागते. राष्ट्रसंतांनी येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गुरुनानक, रवींद्रनाथ टागोर, चक्रधर स्वामी, विवेकानंद, महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी, स्वामी दयानंद भगवान गौतम बुद्ध, डॉ. अल्बर्ट श्वार्टटार, डॉ. मार्टिंन लुथर किंग, डॉ. अ‍ॅनी बेझंट, डी व्हॅलेरा, एम. डगलस, कार्ल मार्क्स व महमंद पैगंबर यांचे प्रतिकात्मक अशा २७ मूर्ती बसविण्यात याव्यात, असे सांगितले होते. त्याप्रमाणे येथे काही मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. राष्ट्रसंतांना सर्व संप्रदायांना एकत्र आणावयाचे आहे व सर्वांनी एकत्र येऊन विश्वाचे कल्याण करावे हा राष्ट्रसंतांचा विशाल दृष्टिकोन होता. येथे जागतिक ग्रंथालय असावे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वप्न होते. ते साकारण्यासाठी संचालक मंडळीचे प्रयत्न सुरू आहे. जगभऱ्यातून येथे लोकांनी येऊन अभ्यास करावा व अखिल मानव जातीचे कल्याण व्हावे, हा त्यामागचा उद्देश होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील अखेरचे दिवस येथेच घालवले. ते ज्या झोपडीत राहत त्या कुटीची जपवणूक करण्यात आली आहे. राष्ट्रसंत ज्या बंगईवर बसत तीही शाबूत आहे. रामकृष्ण हरी मंदिरात दररोज ब्रम्हमुहूर्तावर ध्यान व सायंकाळी प्रार्थनेचा कार्यक्रम नियमिंत होतो. महाराजांच्या पुण्यतिथीच्या व ग्रामजयंतीच्या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे मंदिर अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाअंतर्गत असून स्वतंत्र समिती येथील कार्यभार पाहते. यामध्ये महादेव नाकाडे समिती प्रमुख म्हणून तर जनसेवक जयस्वाल श्रीराम चांदूरकर, सुरेश चौधरी, अरविंद गहुकर यांच्यासह एकूण २० सदस्य काम पाहतात. भाविकांच्या देणगीतून सर्व खर्च भागविला जातो. येथे गुरुदेव पद्धतीने विवाहाचे आयोजन व अनेक समाजोपयोगी कार्यक्रम होतात. आषाढी एकादशीच्या दिवशी येथे पंढरीचे स्वरुप पहायला मिळते. दास टेकडीवरुन गुरुकुंज आश्रमाचे आल्हाददायक व निसर्गरम्य दृश्यसुद्धा दिसते. राष्ट्रसंतांनी निर्माण केलेले रामकृष्ण हरी मंदिर हे खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. या विश्वमंदिरात २२ ते २९ जानेवारीदरम्यान माघशुद्ध दशमी महोत्सव साजरा होत आहे. (प्रतिनिधी)