शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाईन फ्लू’ बाधितांची धाव अकोला, नागपूरकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:10 IST

स्वाईन फ्लूची लक्षणे सर्वसाधारण आजारासारखीच असल्यामुळे निदान होत नाही आणि रूग्णाची प्रकृती अचानक खालावते.

योग्य निदान न झाल्याने धोका : स्थिती हाताबाहेर गेल्यावर ‘रेफर’अमरावती : स्वाईन फ्लूची लक्षणे सर्वसाधारण आजारासारखीच असल्यामुळे निदान होत नाही आणि रूग्णाची प्रकृती अचानक खालावते. त्यानंतर बहुतांश स्वाईन फ्लू बाधितांना अकोला किंवा नागपूरला हलविले जाते. परिणामी वेळेत उपचार न मिळाल्याने स्वाईन फ्लू बाधित रूग्ण दगावतो. सद्यस्थितीत असाच प्रकार जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूने दगावणाऱ्या रूग्णांची संख्या वाढते आहे. चोरपावलांनी येणाऱ्या या भयंकर रोगाबाबत पुरेशा जनजागृतीचा अभाव व जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेत योग्य समन्वय नसल्यामुळेच स्वाईन फ्लू बाधित रूग्णांच्या योग्य नोंदी देखील घेतल्या जात नाहीत. स्वाईन फ्लू हा आजार इतर ‘फ्लू’सारखाचा आजार आहे. सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, मळमळ उलट्या होणे, अशी सर्वसाधारण लक्षणे यारोगातही आढळून येतात. याच लक्षणांच्या आधारे बहुतांश डॉक्टर औषधोपचार करतात. अशातच तीन-चार दिवस उलटून जातात. निदानच न झाल्याने योग्य औषधोपचार होत नाही आणि रूग्णची प्रकृती खालावते. रूग्णांची अवस्था गंभीर झाल्यानंतर त्यांना श्वासोच्छवासात त्रास, तीव्र पोटदुखी जाणवू लागते. तरीदेखील बहुुतांश डॉक्टरांना स्वाईन फ्लूची लक्षणे असल्याचे लक्षात येत नाही. मग, आपसुकच औषधोपचार प्रायोगिक तत्त्वावर सुरू असतात. अशा चुकीच्या औषधोपचारांमुळे रूग्ण मृत्युपंथाला लागतो. तेव्हा कुठे डॉक्टरर्स त्यांना नागपूर किंवा अकोल्याला पुढील उपचारासाठी रेफर करतात. परंतु तोवर वेळ निघून जाते. रूग्ण औषधोपचाराला प्रतिसाद देईलच याची खात्री उरत नाही. परिणामी रूग्ण दगावतोे. अशा स्थितीत ‘स्वाईन फ्लू’सारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळविणार तरी कसे?, हा खरा प्रश्न आहे. मुंबई, पुण्याप्रमाणेच अमरावती जिल्ह्यात देखील स्वाईन फ्लूने हातपाय पसरले आहेत. पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. कित्येकांचा तर मृत्युदेखील झाला आहे. महापालिका क्षेत्रात आठ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकाचा ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. मात्र, प्रत्यक्षात ही आकडेवारी अधिक आहे.कसा होतो प्रसारस्वाईन फ्लूचे विषांणू संसर्ग पसरवितात, याचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होतो. स्वाईन फ्लूबाधित व्यक्तिच्या खोकण्यातून किंवा शिंकण्यातून उडणारे तुषार हवेच्या माध्यमातून दुसऱ्यापर्यंत पोहोचतात. ते विषाणू धुलिकरणवेष्टीत स्वरुपात जीवंत राहतात. श्वसनादरम्यान नाकातून किंवा तोंडावाटे या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. अशा बाधित व्यक्तिच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर निघणारा कफ हातावर लागल्यास त्यानंतर तो व्यक्ती ज्याठिकाणी स्पर्श करेल, तेथे संसर्ग होऊ शकतो. विषाणूंचा प्रसार थांबविण्यासाठी हे करा उपायतोंड आणि नाक पूर्णत:स झाकून वावरा, नाक पुसण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा, हात वारंवार धुवावेत, टणक पुष्ठभाग असणाऱ्या वस्तू निट पुसून घ्याव्यात, उदा.दरवाजे, कड्या, रिमोट कंट्रोल.लक्षणेस्वाईन फ्लूूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लू सारखीच असतात. थंडी वाजणे, ताप १०० अंश फॅ. पेक्षा अधिक, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, उलटी, जुलाब, मळमळ व कधी कधी पोटदुखी.