शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

‘स्वाईन फ्लू’ बाधितांची धाव अकोला, नागपूरकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:10 IST

स्वाईन फ्लूची लक्षणे सर्वसाधारण आजारासारखीच असल्यामुळे निदान होत नाही आणि रूग्णाची प्रकृती अचानक खालावते.

योग्य निदान न झाल्याने धोका : स्थिती हाताबाहेर गेल्यावर ‘रेफर’अमरावती : स्वाईन फ्लूची लक्षणे सर्वसाधारण आजारासारखीच असल्यामुळे निदान होत नाही आणि रूग्णाची प्रकृती अचानक खालावते. त्यानंतर बहुतांश स्वाईन फ्लू बाधितांना अकोला किंवा नागपूरला हलविले जाते. परिणामी वेळेत उपचार न मिळाल्याने स्वाईन फ्लू बाधित रूग्ण दगावतो. सद्यस्थितीत असाच प्रकार जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूने दगावणाऱ्या रूग्णांची संख्या वाढते आहे. चोरपावलांनी येणाऱ्या या भयंकर रोगाबाबत पुरेशा जनजागृतीचा अभाव व जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेत योग्य समन्वय नसल्यामुळेच स्वाईन फ्लू बाधित रूग्णांच्या योग्य नोंदी देखील घेतल्या जात नाहीत. स्वाईन फ्लू हा आजार इतर ‘फ्लू’सारखाचा आजार आहे. सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, मळमळ उलट्या होणे, अशी सर्वसाधारण लक्षणे यारोगातही आढळून येतात. याच लक्षणांच्या आधारे बहुतांश डॉक्टर औषधोपचार करतात. अशातच तीन-चार दिवस उलटून जातात. निदानच न झाल्याने योग्य औषधोपचार होत नाही आणि रूग्णची प्रकृती खालावते. रूग्णांची अवस्था गंभीर झाल्यानंतर त्यांना श्वासोच्छवासात त्रास, तीव्र पोटदुखी जाणवू लागते. तरीदेखील बहुुतांश डॉक्टरांना स्वाईन फ्लूची लक्षणे असल्याचे लक्षात येत नाही. मग, आपसुकच औषधोपचार प्रायोगिक तत्त्वावर सुरू असतात. अशा चुकीच्या औषधोपचारांमुळे रूग्ण मृत्युपंथाला लागतो. तेव्हा कुठे डॉक्टरर्स त्यांना नागपूर किंवा अकोल्याला पुढील उपचारासाठी रेफर करतात. परंतु तोवर वेळ निघून जाते. रूग्ण औषधोपचाराला प्रतिसाद देईलच याची खात्री उरत नाही. परिणामी रूग्ण दगावतोे. अशा स्थितीत ‘स्वाईन फ्लू’सारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळविणार तरी कसे?, हा खरा प्रश्न आहे. मुंबई, पुण्याप्रमाणेच अमरावती जिल्ह्यात देखील स्वाईन फ्लूने हातपाय पसरले आहेत. पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. कित्येकांचा तर मृत्युदेखील झाला आहे. महापालिका क्षेत्रात आठ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकाचा ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. मात्र, प्रत्यक्षात ही आकडेवारी अधिक आहे.कसा होतो प्रसारस्वाईन फ्लूचे विषांणू संसर्ग पसरवितात, याचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होतो. स्वाईन फ्लूबाधित व्यक्तिच्या खोकण्यातून किंवा शिंकण्यातून उडणारे तुषार हवेच्या माध्यमातून दुसऱ्यापर्यंत पोहोचतात. ते विषाणू धुलिकरणवेष्टीत स्वरुपात जीवंत राहतात. श्वसनादरम्यान नाकातून किंवा तोंडावाटे या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. अशा बाधित व्यक्तिच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर निघणारा कफ हातावर लागल्यास त्यानंतर तो व्यक्ती ज्याठिकाणी स्पर्श करेल, तेथे संसर्ग होऊ शकतो. विषाणूंचा प्रसार थांबविण्यासाठी हे करा उपायतोंड आणि नाक पूर्णत:स झाकून वावरा, नाक पुसण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा, हात वारंवार धुवावेत, टणक पुष्ठभाग असणाऱ्या वस्तू निट पुसून घ्याव्यात, उदा.दरवाजे, कड्या, रिमोट कंट्रोल.लक्षणेस्वाईन फ्लूूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लू सारखीच असतात. थंडी वाजणे, ताप १०० अंश फॅ. पेक्षा अधिक, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, उलटी, जुलाब, मळमळ व कधी कधी पोटदुखी.