शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

मिठाईच्या दराचे स्टिकर, ‘एक्सपायरी डेट’ का नाही?

By admin | Updated: September 21, 2016 00:10 IST

‘रघुवीर’प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आता दुग्धजन्य पदार्थांबाबतही संशय निर्माण झाला आहे.

एफडीएची भूमिका संदिग्ध ? : अनेक नियमांचे उल्लंघन, तरीही दुर्लक्षअमरावती : ‘रघुवीर’प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आता दुग्धजन्य पदार्थांबाबतही संशय निर्माण झाला आहे. दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केलेल्या मिठाईवर दराचे ‘स्टिकर्स’ लावले जातात. मात्र ‘एक्सापायरी डेट’ व मिठाईतील घटकांची माहिती का दिली जात नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. या पदार्थांची तपासणी अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) केव्हा करणार? सामान्यांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर बाबीकडे एफडीएचे सहायक आयुक्त जयंत वाणे लक्ष देणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. दुग्धजन्य पदार्थ नाशवंत असल्याने त्याचे सेवन २४ किंवा ४८ तासांत करणेच योग्य असते. जर ती मिठाई ताजी नसेल आणि थंड ठिकाणी साठविलेली नसेल तर खाणे टाळावे, अशा महत्त्वाच्या सूचना एफडीएकडून मिठाई व्यावसायिकांना दिल्या जातात. दर तगडे, नियम धाब्यावरअमरावती : या दुग्धजन्य मिठाईत सूक्ष्मजीव व जिवाणू वाढीस लागण्याची प्रक्रिया गतिमान असते. त्यामुळे अशी मिठाई खाणे आरोग्याला हानिकारक ठरते. रघुवीरमधील शीतकपाटात ठेवलेले पदार्थ ताजे आहेत का, ते किती दिवसाचे आहेत, याची नियमित तपासणी केली जाते की नाही, ही बाब संशय निर्माण करणारी आहे. ब्रेड, दूध, डोनट व पॅकिंग केलेल्या अन्य दुग्धजन्य पदार्थांवर उत्पादन व 'एक्सापायरी डेट' टाकणे विक्रेत्याला बंधनकारक असते. या पदार्थांमध्ये कोणते घटक आहेत, याची माहितीसुद्धा पदार्थांवर नोंदविणे अनिवार्य असते. त्याप्रमाणे या पदार्थांवर उत्पादन व एक्सापायरी डेट सुद्धा टाकली जाते. मात्र, रघुवीर प्रतिष्ठानात केवळ मिठाईच्या दराचे स्टिकर्सखेरीज अन्य कोणत्याही माहितीचे स्टिकर्स आढळून येत नाही. मिठाईचे तगडे दर आकारूनही ग्राहकांना उत्पादनबाद्दल माहिती दिली जात नाही. हा प्रकार ग्राहकांच्या हक्काला डावलणाराच आहे. अमरावतीकरांच्या भरवशावर गलेलठ्ठ झालेल्या रघुवीर प्रतिष्ठानने शहरात व शहराबाहेर प्रस्थ वाढविले आहेत. मात्र, ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष असते. एफडीएच्या नियमावलीचे पालन त्यांच्याद्वारे पूर्णपणे केले जात नाही. मग एफडीएचे प्रभारी सहायक आयुक्त जयंत वाणे कारवाई का करीत नाहीत, हादेखील प्रश्नच आहे.कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी होते काय ?खाद्यान्न तयार करणाऱ्या व ग्राहकांना खाद्यान्न पुरविणारे कर्मचारी निरोगी असणे आवश्यक आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करणेही गरजेचे आहे. एखादा कर्मचारी आजारी असेल तर, त्यापासून संसर्ग ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता असते. मात्र, रघुवीरमधील कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते का? तेथील कर्मचारी निरोगी आहेत का, याबद्दल एफडीएने कधी चौकशी केली आहे काय, असा सवाल आता जागरूक नागरिक उपस्थित करीत आहेत. दुग्धजन्य पदार्थ तयार करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. तेथील कारागिरांची वैद्यकीय तपासणी होणेही आवश्यक असते. ते पदार्थ योग्य त्या तापमानात ठेवणे ही बाबही महत्त्वाची आहे. या सर्व बाबींकडे लक्ष न दिल्यास इन्फेक्शन होऊ शकते. या पदार्थांपासून विषबाधा झाल्यास उलटी, अतिसार, ताप व अन्य आजार हाऊ शकतात - स्वप्निल सोनोने, जनरल फिजिशियन, अमरावती