शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

मिठाईच्या दराचे स्टिकर, ‘एक्सपायरी डेट’ का नाही?

By admin | Updated: September 21, 2016 00:10 IST

‘रघुवीर’प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आता दुग्धजन्य पदार्थांबाबतही संशय निर्माण झाला आहे.

एफडीएची भूमिका संदिग्ध ? : अनेक नियमांचे उल्लंघन, तरीही दुर्लक्षअमरावती : ‘रघुवीर’प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आता दुग्धजन्य पदार्थांबाबतही संशय निर्माण झाला आहे. दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केलेल्या मिठाईवर दराचे ‘स्टिकर्स’ लावले जातात. मात्र ‘एक्सापायरी डेट’ व मिठाईतील घटकांची माहिती का दिली जात नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. या पदार्थांची तपासणी अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) केव्हा करणार? सामान्यांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर बाबीकडे एफडीएचे सहायक आयुक्त जयंत वाणे लक्ष देणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. दुग्धजन्य पदार्थ नाशवंत असल्याने त्याचे सेवन २४ किंवा ४८ तासांत करणेच योग्य असते. जर ती मिठाई ताजी नसेल आणि थंड ठिकाणी साठविलेली नसेल तर खाणे टाळावे, अशा महत्त्वाच्या सूचना एफडीएकडून मिठाई व्यावसायिकांना दिल्या जातात. दर तगडे, नियम धाब्यावरअमरावती : या दुग्धजन्य मिठाईत सूक्ष्मजीव व जिवाणू वाढीस लागण्याची प्रक्रिया गतिमान असते. त्यामुळे अशी मिठाई खाणे आरोग्याला हानिकारक ठरते. रघुवीरमधील शीतकपाटात ठेवलेले पदार्थ ताजे आहेत का, ते किती दिवसाचे आहेत, याची नियमित तपासणी केली जाते की नाही, ही बाब संशय निर्माण करणारी आहे. ब्रेड, दूध, डोनट व पॅकिंग केलेल्या अन्य दुग्धजन्य पदार्थांवर उत्पादन व 'एक्सापायरी डेट' टाकणे विक्रेत्याला बंधनकारक असते. या पदार्थांमध्ये कोणते घटक आहेत, याची माहितीसुद्धा पदार्थांवर नोंदविणे अनिवार्य असते. त्याप्रमाणे या पदार्थांवर उत्पादन व एक्सापायरी डेट सुद्धा टाकली जाते. मात्र, रघुवीर प्रतिष्ठानात केवळ मिठाईच्या दराचे स्टिकर्सखेरीज अन्य कोणत्याही माहितीचे स्टिकर्स आढळून येत नाही. मिठाईचे तगडे दर आकारूनही ग्राहकांना उत्पादनबाद्दल माहिती दिली जात नाही. हा प्रकार ग्राहकांच्या हक्काला डावलणाराच आहे. अमरावतीकरांच्या भरवशावर गलेलठ्ठ झालेल्या रघुवीर प्रतिष्ठानने शहरात व शहराबाहेर प्रस्थ वाढविले आहेत. मात्र, ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष असते. एफडीएच्या नियमावलीचे पालन त्यांच्याद्वारे पूर्णपणे केले जात नाही. मग एफडीएचे प्रभारी सहायक आयुक्त जयंत वाणे कारवाई का करीत नाहीत, हादेखील प्रश्नच आहे.कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी होते काय ?खाद्यान्न तयार करणाऱ्या व ग्राहकांना खाद्यान्न पुरविणारे कर्मचारी निरोगी असणे आवश्यक आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करणेही गरजेचे आहे. एखादा कर्मचारी आजारी असेल तर, त्यापासून संसर्ग ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता असते. मात्र, रघुवीरमधील कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते का? तेथील कर्मचारी निरोगी आहेत का, याबद्दल एफडीएने कधी चौकशी केली आहे काय, असा सवाल आता जागरूक नागरिक उपस्थित करीत आहेत. दुग्धजन्य पदार्थ तयार करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. तेथील कारागिरांची वैद्यकीय तपासणी होणेही आवश्यक असते. ते पदार्थ योग्य त्या तापमानात ठेवणे ही बाबही महत्त्वाची आहे. या सर्व बाबींकडे लक्ष न दिल्यास इन्फेक्शन होऊ शकते. या पदार्थांपासून विषबाधा झाल्यास उलटी, अतिसार, ताप व अन्य आजार हाऊ शकतात - स्वप्निल सोनोने, जनरल फिजिशियन, अमरावती