शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मिठाईच्या दराचे स्टिकर, ‘एक्सपायरी डेट’ का नाही?

By admin | Updated: September 21, 2016 00:10 IST

‘रघुवीर’प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आता दुग्धजन्य पदार्थांबाबतही संशय निर्माण झाला आहे.

एफडीएची भूमिका संदिग्ध ? : अनेक नियमांचे उल्लंघन, तरीही दुर्लक्षअमरावती : ‘रघुवीर’प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आता दुग्धजन्य पदार्थांबाबतही संशय निर्माण झाला आहे. दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केलेल्या मिठाईवर दराचे ‘स्टिकर्स’ लावले जातात. मात्र ‘एक्सापायरी डेट’ व मिठाईतील घटकांची माहिती का दिली जात नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. या पदार्थांची तपासणी अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) केव्हा करणार? सामान्यांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर बाबीकडे एफडीएचे सहायक आयुक्त जयंत वाणे लक्ष देणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. दुग्धजन्य पदार्थ नाशवंत असल्याने त्याचे सेवन २४ किंवा ४८ तासांत करणेच योग्य असते. जर ती मिठाई ताजी नसेल आणि थंड ठिकाणी साठविलेली नसेल तर खाणे टाळावे, अशा महत्त्वाच्या सूचना एफडीएकडून मिठाई व्यावसायिकांना दिल्या जातात. दर तगडे, नियम धाब्यावरअमरावती : या दुग्धजन्य मिठाईत सूक्ष्मजीव व जिवाणू वाढीस लागण्याची प्रक्रिया गतिमान असते. त्यामुळे अशी मिठाई खाणे आरोग्याला हानिकारक ठरते. रघुवीरमधील शीतकपाटात ठेवलेले पदार्थ ताजे आहेत का, ते किती दिवसाचे आहेत, याची नियमित तपासणी केली जाते की नाही, ही बाब संशय निर्माण करणारी आहे. ब्रेड, दूध, डोनट व पॅकिंग केलेल्या अन्य दुग्धजन्य पदार्थांवर उत्पादन व 'एक्सापायरी डेट' टाकणे विक्रेत्याला बंधनकारक असते. या पदार्थांमध्ये कोणते घटक आहेत, याची माहितीसुद्धा पदार्थांवर नोंदविणे अनिवार्य असते. त्याप्रमाणे या पदार्थांवर उत्पादन व एक्सापायरी डेट सुद्धा टाकली जाते. मात्र, रघुवीर प्रतिष्ठानात केवळ मिठाईच्या दराचे स्टिकर्सखेरीज अन्य कोणत्याही माहितीचे स्टिकर्स आढळून येत नाही. मिठाईचे तगडे दर आकारूनही ग्राहकांना उत्पादनबाद्दल माहिती दिली जात नाही. हा प्रकार ग्राहकांच्या हक्काला डावलणाराच आहे. अमरावतीकरांच्या भरवशावर गलेलठ्ठ झालेल्या रघुवीर प्रतिष्ठानने शहरात व शहराबाहेर प्रस्थ वाढविले आहेत. मात्र, ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष असते. एफडीएच्या नियमावलीचे पालन त्यांच्याद्वारे पूर्णपणे केले जात नाही. मग एफडीएचे प्रभारी सहायक आयुक्त जयंत वाणे कारवाई का करीत नाहीत, हादेखील प्रश्नच आहे.कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी होते काय ?खाद्यान्न तयार करणाऱ्या व ग्राहकांना खाद्यान्न पुरविणारे कर्मचारी निरोगी असणे आवश्यक आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करणेही गरजेचे आहे. एखादा कर्मचारी आजारी असेल तर, त्यापासून संसर्ग ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता असते. मात्र, रघुवीरमधील कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते का? तेथील कर्मचारी निरोगी आहेत का, याबद्दल एफडीएने कधी चौकशी केली आहे काय, असा सवाल आता जागरूक नागरिक उपस्थित करीत आहेत. दुग्धजन्य पदार्थ तयार करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. तेथील कारागिरांची वैद्यकीय तपासणी होणेही आवश्यक असते. ते पदार्थ योग्य त्या तापमानात ठेवणे ही बाबही महत्त्वाची आहे. या सर्व बाबींकडे लक्ष न दिल्यास इन्फेक्शन होऊ शकते. या पदार्थांपासून विषबाधा झाल्यास उलटी, अतिसार, ताप व अन्य आजार हाऊ शकतात - स्वप्निल सोनोने, जनरल फिजिशियन, अमरावती