शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

गोड वाणी, संयमी वृत्ती आजारमुक्तीची गुरुकिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:35 IST

गोड बोलणे हे केवळ मानवी संबंधांमध्ये माधुर्य आणण्याचेच उपयोगी सूत्र नव्हे, तर या गुणामुळे आरोग्यही उत्तम राखता येते, असे गुपित प्रसिद्ध कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अतुल यादगीरे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.

ठळक मुद्देडॉ. अतुल यादगीरे : रागात घातक हार्मोन्सची निर्मिती

अमरावती - गोड बोलणे हे केवळ मानवी संबंधांमध्ये माधुर्य आणण्याचेच उपयोगी सूत्र नव्हे, तर या गुणामुळे आरोग्यही उत्तम राखता येते, असे गुपित प्रसिद्ध कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अतुल यादगीरे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.डॉ. यादगीरे सांगतात, गोड बोलण्यासाठी अंगी संयम बाळगावा लागेल. संयम बाळगण्यासाठी अनावश्यक रागापासून दूर राहावे लागेल. त्याचा लाभ असा होईल की, रागादरम्यानच्या मनोशारीरिक स्थितीत शरीरात उत्पन्न होणारे हानिकारक स्टेरॉइड्स आणि अ‍ॅड्रिनॅलीन हार्मोन्सची गैरजरूरी निर्मिती नियंत्रित होईल. आरोग्य त्यामुळे उत्तम राखले जाईल.हल्ली प्रत्येकाच्या आयुष्यात वाढलेला ताणतणाव आणि ढळलेला संयम ‘सायकोसोमॅटिक’ आजारांना कारणीभूत ठरला आहे. हृदयरोग, मधुमेह, रक्तचाप, कर्करोग, मूळव्याध, लठ्ठपणा यांसारख्या आजारांचा परिचय जवळजवळ प्रत्येक शरीराला आहे. गोड बोलणे आणि 'रिअ‍ॅक्ट' होण्याऐवजी 'रिस्पॉन्स' (प्रतिक्रिया ऐवजी प्रतिसाद) देणे हे अत्यंत महत्त्वाचे. संतुलित आहार, योग्य व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोण आणि परिपूर्ण विश्रांती या चतु:सूत्रीने अशी जीवनशैली हमखास साधता येईल.डोक्यावर बर्फ आणि ओठांवर साखर ठेवावी म्हणतात, ते खरेच. लहान-लहान कारणांमुळे उडणारे खटके आणि त्यातून अंगात भिनणारा राग हे अनारोग्याचे द्वारच. 'तीळ-गूळ घ्या, गोड गोड बोला' हे भारतीय संस्कृतीतील निकोप आरोग्याचे सूत्र पुनरुज्जीवित होणे वैद्यकीयदृष्ट्याही गरजेचे आहे, असे मत डॉ. अतुल यादगीरे यांनी व्यक्त केले.