शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

गोड वाणीने होतात व्यक्तिमत्त्वातही बदल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:37 IST

कुणी हिमालयाच्या उंचीचे कार्य केले असेल; परंतु ते आपुलकीने, संवेदनशीलपणे इतरांपर्यंत पोहचविता येणारी वाणी नसेल, तर ते कार्य सामाजिक अर्थाने अपूर्णच राहील. उत्तुंग कार्यासोबतच गोड वाणी आणि क्षमाशीलतेचा गुण अंगी बाळगता आला, तर त्या उत्तुंगतेला सुगंधाचा दरवळ हमखास जाणवेल, अशा शब्दांत अमृता गायगोले यांनी भावना व्यक्त केल्या. 'लोकमत'च्या 'गोड बोला, गुड बोला' या उपक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी हे अभ्यासू पैलू वाचकांसाठी उलगडले.

ठळक मुद्देअमृता गायगोले : विद्यार्थ्यांसाठी उलगडले गूढ

अमरावती : कुणी हिमालयाच्या उंचीचे कार्य केले असेल; परंतु ते आपुलकीने, संवेदनशीलपणे इतरांपर्यंत पोहचविता येणारी वाणी नसेल, तर ते कार्य सामाजिक अर्थाने अपूर्णच राहील. उत्तुंग कार्यासोबतच गोड वाणी आणि क्षमाशीलतेचा गुण अंगी बाळगता आला, तर त्या उत्तुंगतेला सुगंधाचा दरवळ हमखास जाणवेल, अशा शब्दांत अमृता गायगोले यांनी भावना व्यक्त केल्या. 'लोकमत'च्या 'गोड बोला, गुड बोला' या उपक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी हे अभ्यासू पैलू वाचकांसाठी उलगडले.कंटाळवाण्या आणि अल्पपयोगी शिक्षणातून विद्यार्थीप्रिय आणि आयुष्योपयोगी शिक्षणाचा प्रयोग अमरावतीत 'शाश्वत कन्सेप्ट स्कूल'च्या माध्यमातून रूजविणाऱ्या अमृता अतुल गायगोले यांच्या कार्याची दखल आता देशभरात घेतली जाऊ लागली आहे. त्या सांगतात, ज्यावेळी कुणी 'गोड बोलतात, गुड बोलतात' त्यावेळी त्यांच्या मेंदूतील विचारप्रकियादेखील त्याच दिशेने कार्यरत होते. बोलणे ही मनोशारीरिक क्रिया असल्यामुळे सातत्याने संवेदनशील भाषेचा वापर केल्यास अवघे व्यक्तिमत्त्वच तसा आकार घेऊ लागते. हा अफलातून लाभ केवळ विचारपूर्वक बोलण्यामुळे प्राप्त होऊ शकतो.विद्यार्थ्यांनी बोलण्यापूर्वी विचार करण्याची सवय लावल्यास, ते जे बोलतील ते उपयोगी आणि प्रभावी असेल. ते लाभकारकच असेल. विचारांशिवाय व्यक्त केलेले बोल समस्या निर्माण करू शकतात. तमाम विद्यार्थ्यांनी हे समीकरण पक्के लक्षात घ्यावे, त्याचा आवर्जून अंमल करावा, असे आवाहन अमृता यांनी केले.