शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मिठाई चविष्ट, दर्जेदार किती ?

By admin | Updated: September 29, 2016 00:08 IST

अळीयुक्त कचोरी विकणाऱ्या 'रघुवीर'ची मिठाई चविष्ठ वाटत असली तरी ती दर्जेदार किती...

पारदर्शकता काय? : विश्वास एकतर्फीच !अमरावती : अळीयुक्त कचोरी विकणाऱ्या 'रघुवीर'ची मिठाई चविष्ठ वाटत असली तरी ती दर्जेदार किती या महत्त्वपूर्ण प्रश्नाच्या मुळाशी जाताना अनेक धक्कादायक तत्थ्ये समोर येतात. 'रघुवीर'चा नाश्ता दर्जेदार असल्याचे अमरावतीकर मानत आले होते. तथापि दर्जा किती राखला जातो, हे 'लोकमत'ने केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने उघड झाले आहे. नजरेआड केवळ पैसा कमविण्याचा व्यापार येथेही चालतो. जसे कचोरी, समोसा, सांबारवडी, पालकवडा आणि पेटीस याबाबत घडते तसेच मिठाईबाबतही घडते. रघुवीरची मिठाई उत्तमच, असा ज्यांचा विचार असेल त्यांनी त्यांचा विचार पुन्हा तपासून बघायला हवा. मिठाई निर्मितीत पारदर्शकता किती, हा मोठाच प्रश्न उपस्थित होतो. मिठाईतून तुमच्या पोटात नेमके काय चालले याचे छातीठोक उत्तर कुणीही देऊ शकत नाही. मिठाईचे इन्ग्रेडियन्ट काय, याची जराही माहिती सामान्य ग्राहकांना दिली जात नाही. व्यापार होतो तो केवळ विश्वासाच्याच भरवशावर. मिठाई खरेदी करताना विश्वास ठेवून तुम्हाला मिठाई दिली जात नाही. त्यासाठी रघुवीरने ठरविलेले पैसे अदा करावेच लागतात. परंतु तुम्हाला मात्र 'काय खातो?' हे विचारण्याची मुभा नाही. विश्वास ठेवूनच मिठाई सेवन करावी लागते. विश्वास हा व्यापार एकतर्फी आहे. चिल्ल्या-पिल्ल्यांच्या पोटातही जाणारी ही मिठाई निकोप असेल याची शाश्वती कोण देणार? रघुवीरचा नाश्ता न खाण्याचा भावी अधिकाऱ्यांचा संकल्पउपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, अन्न सुरक्षा अधिकारी यासारखे अधिकारी ज्या स्पर्धा परीक्षेतून तयार होतात, त्या राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी कणाऱ्या ८० सुविद्य विद्यार्थ्यांनी आता रघुवीरचा नाश्ता, मिठाई न खाण्याचा तसेच पार्सल न बोलविण्याचा संकल्प सोडला. तसा ठरावच त्यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाचे समर्थन करताना ते सांगतात, आम्ही उद्याचे अधिकारी आहोत. लोक भ्रष्टाचाराने वैतागले आहेत. नियम पाळलेच जावेत, यासाठी आम्ही आजच सतर्क असायलाच हवे. 'लोकमत'मुळे जनजागृतीला सुुरुवात झाली. सामन्यांच्या आरोग्याशी खेळ करणारे असे काही प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आहेत. 'रघुवीर'च्या नाश्त्यात फकडी आणि झुरळ हे किटक आढल्याचे अनुभव आमच्यातील काहींचे आहेत. असा प्रकार घडल्यावर नाश्ता परत करून, राग व्यक्त करून विषयाला विराम दिला जातो. तथापि सामान्यांनी त्यांचे अधिकार वापरून प्रत्येकवेळी अशा मुद्यांची रीतसर तक्रार एफडीएला आणि पोलिसांना करायला हवी. पंचनामा करवून घ्यायला हवा. असे होत नाही. एफडीए अधिकाऱ्यांसमोर काजुच्या प्लेट पेश केल्या जातात. म्हणूनच अधिकारी कारवाई करीत नाहीत. रघुवीरसारख्यांचा धंदा त्यामुळेच फोफावतो. ग्राहक हक्काचे संरक्षण व्हावे, यासाठी आता प्रत्येक ग्राहकाने पुढे सरसावायला हवे. स्वत:ची लढाई स्वत: लढायला हवी. त्याचाच आरंभ म्हणून हा आमचा सामूहिक संकल्प आहे. प्रत्येक सदस्याने किमान दहा लोकांना जागे करण्याची शपथ आम्ही घेतली आहे. आम्ही ८० जण ८०० लोकांना जागे करू. 'खाणार नाही तर विकणार कसे?' हा आमचा मुलमंत्र असल्याचे या युवाशक्तीने स्पष्ट केले. 'अ‍ॅम्बिशन अ‍ॅकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा'च्यावतीने वैभव मस्के आणि इतरांनी त्यांची ही भूमिका 'लोकमत'ला कळविली. लोकमतच्या अभिनंदनाचा ठरावही या भावी अधिकाऱ्यांनी घेतला.