शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विदर्भात आठ जागांवर दावा

By admin | Updated: August 19, 2014 23:26 IST

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात महायुतीकडे ३८ जागांची मागणी केली आहे. यामध्ये विदर्भातील आठ जागांवर संघटनेने दावा केला

अमरावती : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात महायुतीकडे ३८ जागांची मागणी केली आहे. यामध्ये विदर्भातील आठ जागांवर संघटनेने दावा केला असल्याची माहिती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता गजानन अमदाबादकर यांनी येथे दिली . स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विदर्भस्तरीय बैठकीसाठी ते अमरावतीत आले असता शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते.स्वाभीमान शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका अमदाबादकर यांनी मांडतानाच यापूर्वीच्या केंद्रातील व सध्याच्या राज्यातील शासनकर्त्यांवर ताशेरे ओढले. ते म्हणाले देशाची अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. मात्र देशात शेतकऱ्यांच्याच बाबतीत केंद्र व राज्य शासन उदासीन आहे. दरवर्षी रेल्वेसाठी स्वतंत्र बजेट सादर केले जाते. याशिवाय अर्थसंकल्प सादर करताना यामध्ये शेतीसाठी मात्र केवळ ३ टक्केच तरतुद केली जाते. यामुळे शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न दुर्लक्षित राहतात. शेत मालाला योग्य भाव मिळत नाही. केंद्र शासनाने कृषीसाठी स्वतंत्र बजेट सादर करावे अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची असल्याचे त्यांनी सांगितले. शेतमाला भाव मिळावा यादृष्टीने शेतीवर आधारीत उद्योग धंदे सुरू करावे व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीसोबत निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणुका लढण्याची तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने महायुतीच्या नेत्यांकडे ३८ जागांचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये विदर्भातील आठ जागा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मागितल्या आहेत. विदर्भात ज्या जागांवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेने दावा सांगितला त्यात वरूड-मोर्शी, चिखली, खामगाव, कारंजा, वणी, देवळी, काटोल व बाळापूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान विदर्भातील जागांबाबतचा अंतीम निर्णय संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हेच घेतील. त्यांचा निर्णय संघटनेला मंजुर राहील असेही अमदाबादकर यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, प्रफुल्ल गजबे, नारायण जांभोळे, सीताराम भुते, विनायक काकडे, कैलास फाटे, प्रवीण मोहोड उपस्थित होते. ( प्रतिनिधी )