शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

टंचाईत शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती

By admin | Updated: November 29, 2014 23:14 IST

अल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारा कर्ज वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये अमरावती विभागातील ७ हजार २४१ गावांमधील शेतकऱ्यांसह

जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे : चार लाख ५४ हजार शेतकऱ्यांना लाभअमरावती : अल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारा कर्ज वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये अमरावती विभागातील ७ हजार २४१ गावांमधील शेतकऱ्यांसह अमरावती जिल्ह्यातील १९८६ गावे व ४ लाख ५३ हजार ९६४ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.पावसाअभावी राज्यातील विविध भागांत खरीप पिके हातून गेली. उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे शेतकरी डबघाईस आला आहे. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील खरीप पिकाची सुधारित आणेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या राज्यातील सहा विभागांतील १९ हजार ५९ गावांमध्ये टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील १९८६ गावांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यास आलेल्या आहेत. या सवलतींमध्ये शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त ७ हजार २४१ गावांमधील शेतकऱ्यांना पीककर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्याच्या विवंचनेतून दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)