शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

टंचाईत शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती

By admin | Updated: November 29, 2014 23:14 IST

अल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारा कर्ज वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये अमरावती विभागातील ७ हजार २४१ गावांमधील शेतकऱ्यांसह

जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे : चार लाख ५४ हजार शेतकऱ्यांना लाभअमरावती : अल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारा कर्ज वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये अमरावती विभागातील ७ हजार २४१ गावांमधील शेतकऱ्यांसह अमरावती जिल्ह्यातील १९८६ गावे व ४ लाख ५३ हजार ९६४ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.पावसाअभावी राज्यातील विविध भागांत खरीप पिके हातून गेली. उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे शेतकरी डबघाईस आला आहे. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील खरीप पिकाची सुधारित आणेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या राज्यातील सहा विभागांतील १९ हजार ५९ गावांमध्ये टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील १९८६ गावांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यास आलेल्या आहेत. या सवलतींमध्ये शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त ७ हजार २४१ गावांमधील शेतकऱ्यांना पीककर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्याच्या विवंचनेतून दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)