शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

रेड्डी यांचे निलंबन, आरोपी करून अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:08 IST

अमरावती : मेळघाटच्या जंगलात ‘लेडी सिंघम’ असलेल्या दीपाली चव्हाण यांच्या दुर्देवी आत्महत्येला कारणीभूत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला पोलिसांनी ...

अमरावती : मेळघाटच्या जंगलात ‘लेडी सिंघम’ असलेल्या दीपाली चव्हाण यांच्या दुर्देवी आत्महत्येला कारणीभूत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला पोलिसांनी अटक केली. मात्र, दीपालीच्या आत्महत्येला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी हे सुद्धा तितकेच जबाबदार असून, त्यांचे तात्काळ निलंबन करावे. आरोपी करून अटक करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी रविवारी पत्रपरिषदेतून केली.

शिवराय कुळकर्णी यांच्या मते, रेड्डी यांना वाचविण्यासाठी आयएफएस लॉबी सक्रिय झाली आहे. त्यामुळेच काही वनकर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असून, ते घरोघरी जाऊन रेड्डी कसे चांगले अधिकारी आहेत, हे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे. रेड्डी यांना मृत दीपाली चव्हाण यांनी अनेकदा विनोद शिवकुमार बाला याच्याविषयी अवगत केले. मात्र, आयएफएस लॉबी असल्यामुळे दीपाली यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे गोळी झाडून तिने आत्महत्या केली. पुन्हा वनविभागात कोणी दीपाली होऊ नये, यासाठी एम.एस. रेड्डी यांचे निलंबन व्हावे. आरोपी करून अटक करावी, अशी भाजपने मागणी केली आहे. दीपाली यांना अधिकाऱ्याच्या प्रादेशिक वादातून न्याय मिळणार की नाही?, याबाबत शंका आहे. मात्र, रेड्डी यांचे निलंबन आणि आरोपी केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देण्यात आला. पत्रपरिषदेत भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे, प्रशांत शेगोकार, बादल कुळकर्णी आदी उपस्थित होते.

-------------

केेंद्रीय वनमंत्र्यांकडे साकडे

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे यांनी केंद्रीय वने, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना माहिती दिली. याप्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी जबाबदार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार ना. जावडेकर यांनी रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याबाबत राज्याच्या वनमंत्रालयाला निर्देश दिल्याची माहिती आहे.

------------

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात विशाखा समिती गायब

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सन- २००७ पासून महिला अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी विशाखा समिती गायब असल्याचा आरोप भाजपने केला आहे. महिलांच्या लैंगिक शोषणासंदर्भात किंवा अधिकाऱ्यांच्या किंवा सहकारी कर्मचाऱ्याच्या आक्षेपार्ह वर्तनासाठी शासकीय नियमानुसार विशाखा समिती गठित करणे अनिवार्य आहे. मात्र, रेड्डी यांनी विशाखा समिती गठित होऊ दिली नाही, असा आरोप भाजपने केला आहे.