शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

रेड्डी यांचे निलंबन, आरोपी करून अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:08 IST

अमरावती : मेळघाटच्या जंगलात ‘लेडी सिंघम’ असलेल्या दीपाली चव्हाण यांच्या दुर्देवी आत्महत्येला कारणीभूत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला पोलिसांनी ...

अमरावती : मेळघाटच्या जंगलात ‘लेडी सिंघम’ असलेल्या दीपाली चव्हाण यांच्या दुर्देवी आत्महत्येला कारणीभूत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला पोलिसांनी अटक केली. मात्र, दीपालीच्या आत्महत्येला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी हे सुद्धा तितकेच जबाबदार असून, त्यांचे तात्काळ निलंबन करावे. आरोपी करून अटक करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी रविवारी पत्रपरिषदेतून केली.

शिवराय कुळकर्णी यांच्या मते, रेड्डी यांना वाचविण्यासाठी आयएफएस लॉबी सक्रिय झाली आहे. त्यामुळेच काही वनकर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असून, ते घरोघरी जाऊन रेड्डी कसे चांगले अधिकारी आहेत, हे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे. रेड्डी यांना मृत दीपाली चव्हाण यांनी अनेकदा विनोद शिवकुमार बाला याच्याविषयी अवगत केले. मात्र, आयएफएस लॉबी असल्यामुळे दीपाली यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे गोळी झाडून तिने आत्महत्या केली. पुन्हा वनविभागात कोणी दीपाली होऊ नये, यासाठी एम.एस. रेड्डी यांचे निलंबन व्हावे. आरोपी करून अटक करावी, अशी भाजपने मागणी केली आहे. दीपाली यांना अधिकाऱ्याच्या प्रादेशिक वादातून न्याय मिळणार की नाही?, याबाबत शंका आहे. मात्र, रेड्डी यांचे निलंबन आणि आरोपी केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देण्यात आला. पत्रपरिषदेत भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे, प्रशांत शेगोकार, बादल कुळकर्णी आदी उपस्थित होते.

-------------

केेंद्रीय वनमंत्र्यांकडे साकडे

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे यांनी केंद्रीय वने, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना माहिती दिली. याप्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी जबाबदार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार ना. जावडेकर यांनी रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याबाबत राज्याच्या वनमंत्रालयाला निर्देश दिल्याची माहिती आहे.

------------

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात विशाखा समिती गायब

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सन- २००७ पासून महिला अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी विशाखा समिती गायब असल्याचा आरोप भाजपने केला आहे. महिलांच्या लैंगिक शोषणासंदर्भात किंवा अधिकाऱ्यांच्या किंवा सहकारी कर्मचाऱ्याच्या आक्षेपार्ह वर्तनासाठी शासकीय नियमानुसार विशाखा समिती गठित करणे अनिवार्य आहे. मात्र, रेड्डी यांनी विशाखा समिती गठित होऊ दिली नाही, असा आरोप भाजपने केला आहे.