शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

पक्षिमित्रांनी वाचविले १५ जंगली कबुतरांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:07 IST

तालुक्यातील उत्तमसरा गावात शिकाऱ्याकडून १५ जंगली कबुतरांना पक्षिमित्रांनी सोडविले. तपासणीनंतर ते वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

ठळक मुद्देअंधश्रद्धेचे ठरतात बळी : वनविभाग आणि वसा संस्थेची संयुक्त कार्यवाही, उत्तमसरा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभातकुली : तालुक्यातील उत्तमसरा गावात शिकाऱ्याकडून १५ जंगली कबुतरांना पक्षिमित्रांनी सोडविले. तपासणीनंतर ते वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.उत्तमसरा गावात मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास चार शिकारी शिरले. गावानजीक असलेल्या शेतात त्यांनी शिकारी जाळे लावले. जाळ्यावर टाकलेल्या धान्याकडे कबुतरे आकर्षित होऊन त्यात अडकली. सकाळपासून पाळतीवर असलेल्या ग्रामस्थांनी वसा संस्थेला या घटनेची माहिती दिली. संस्थेचे सहायक पशुचिकित्सक शुभम सायंके, पक्षिमित्र भूषण सायंके, निखिल फुटाणे, मुकेश मालवे, पंकज मालवे आणि गणेश अकर्ते यांनी शेतात जाऊन पडताळणी केली असता, त्यांना चार शिकारी आढळले व जखमी अवस्थेत १५ कबुतरेही मिळाली. वसाच्या माहितीवरून उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुम्बर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकार प्रतिबंध पथकाचे वनरक्षक अमोल गावणेर, उमक आणि ठाकूर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु, शिकारी पसार झाले होते. जखमी कबुतरांवर शुभम सायंके यांनी प्रथमपोचार केलेत. तपासणीनंतर सर्व कबुतरे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकारावर वनविभागाने अंकुश ठेवण्याची मागणी पक्षिमित्रांनी केली आहे.लकव्याच्या उपचारासाठी शिकारलकवा गेलेल्या रुग्णाला जंगली कबुतराचे रक्त लावल्यास तो बरा होतो, या गैरसमजातून दररोज अनेक जंगली कबुतरांची शिकार केली जाते. अशी शिकारीची घटना आढळल्यास वनविभागाच्या १९२६ या निशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती वसाचे शुभम सायंके यांनी दिली.शिकारीची क्रूर पद्धतशिकारी त्यांची पाळीव कबुतरे जाळ्यात बांधून ठेवतात. त्यांना उपाशी ठेवून अवतीभोवती धान्य टाकतात. बाजूला धान्य असूनही ते खाता येत नसल्याने ती कबुतरे जिवाच्या आकांताने ओरडतात. त्यांचे ओरडणे ऐकून परिसरातील इतर कबुतरे जाळ्यानजीक येऊन अडकतात. लपून बसलेला शिकारी हातामधली दोरी ओढतो. पक्षी जाळ्यात अडकल्यानंतर त्यांचे एका बाजूचे पंख हाताने उपटून मोडून टाकतात. त्यामुळे हे पक्षी उडू शकत नाही, असे निखिल फुटाणे यांनी सांगितले.