शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यातील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST

परतवाडा : शहरातील नदीवरील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची तीव्रता बघता पूल केव्हाही कोसळू शकतो. कालबाह्य झालेल्या ...

परतवाडा : शहरातील नदीवरील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची तीव्रता बघता पूल केव्हाही कोसळू शकतो. कालबाह्य झालेल्या या पुलाचे प्रस्तावित बांधकाम १५ महिन्यापासून रखडले आहे. संबंधित ठेकेदाराने गाशा गुंडाळला आहे. पुलावर थांबणारे पावसाचे पाणी काढण्याकरिता त्या पुलालाच भगदाड पाडण्यात आले आहे.

अंजनगाव-परतवाडा- बेतुल- मध्यप्रदेश सीमेपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले आहे. रस्ता दर्जा सुधार कार्यक्रमांतर्गत या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले. २७० कोटीहून अधिक खर्चाच्या या महामार्गाचे आणि पुलांचे बांधकाम पूर्ण झाले. या कामातच हा स्वातंत्र्यपूर्व काळातील पांढरा पूल काढून तेथे नवा पूल प्रस्तावित आहे.

या पुलावरून अचलपूर-परतवाडा शहराला पाणीपुरवठा करणारी चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन गेली आहे. ही पाईपलाईन काढण्याकरिता रस्ते महामार्ग अभियंत्याने १२ फेब्रुवारी २०२० ला अचलपूर पालिकेला पत्र दिले. यावर उशिरा नगरपरिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पत्र दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नगरपरिषदेला ही पाईपलाईन शिफ्ट करण्याकरिता २४ ऑगस्टला तांत्रिक मंजुरी मिळाली.

ती पाईप लाईन पुलावरच

ही मंजुरी मिळाल्यानंतर तीन निविदा प्रकाशित करूनही नगरपरिषदेला कंत्राटदार मिळाला नाही. म्हणून पाणीपुरवठ्याची पाईपलाईन, महामार्ग अभियंत्यांना वेळेत काढता आले नाही. या पाईपलाईनमुळे १५ महिन्यांपासून या पांढऱ्या पुलाचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही. आजही ही पाईपलाईन त्याच पुलावर असून, अपघातास कारणीभूत ठरत आहे. दरम्यान ज्या कंत्राटदाराने महामार्गाचे काम केले त्या कंत्राटदाराने आपला गाशा गुंडाळला आहे. आपली सर्व यंत्रसामुग्री त्याने परतवाड्यातून इतरत्र हलविली आहे.

पूल हलतो, ट्रक झकोला मारतो

आज या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या पुलावरून दहा चाकी, बारा चाकी, लोडेड ट्रकची मोठ्या प्रमाणात अनियंत्रित वाहतूक होत आहे. लोकही त्याच पुलावरून ये-जा करीत आहेत. जेव्हा लोडिंग ट्रक या पुलावरून जातो तेव्हा हा पूल हलतो. या जीवघेण्या गड्यातून जाताना हे ट्रक हेलकावे मारतात. यात अपघाताची शक्यता बळावली आहे.

पुलाचे आयुष्य संपले

शहरातून जाणाऱ्या या बिच्छन नदीवर स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी सर्वप्रथम हा पांढरा पूल बांधला. आज या पुलाचे आयुष्य संपले आहे. कुठल्याही क्षणी तो पूल कोसळू शकतो. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे.

एकाच ठिकाणी दोन पूल

स्वातंत्र्यानंतर अगदी या पुलाला लागूनच १९९७ मध्ये अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुसरा पूल उभारला. एकाच ठिकाणी लागून असलेल्या या दोन पुलांपैकी एका पुलावरून जाणारी तर दुसऱ्या पुलावरून येणारी वाहतूक वळती केल्या गेली. १९९७ पासून ही दुहेरी व्यवस्था शहरात अस्तित्वात आली. परंतु २०१७ मध्ये हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित झाला. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दर्जावाढ करून सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण केले गेले. यातच या पांढऱ्या पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. पण हा पूल दुर्लक्षित आहे.