शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

परतवाड्यातील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST

परतवाडा : शहरातील नदीवरील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची तीव्रता बघता पूल केव्हाही कोसळू शकतो. कालबाह्य झालेल्या ...

परतवाडा : शहरातील नदीवरील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची तीव्रता बघता पूल केव्हाही कोसळू शकतो. कालबाह्य झालेल्या या पुलाचे प्रस्तावित बांधकाम १५ महिन्यापासून रखडले आहे. संबंधित ठेकेदाराने गाशा गुंडाळला आहे. पुलावर थांबणारे पावसाचे पाणी काढण्याकरिता त्या पुलालाच भगदाड पाडण्यात आले आहे.

अंजनगाव-परतवाडा- बेतुल- मध्यप्रदेश सीमेपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले आहे. रस्ता दर्जा सुधार कार्यक्रमांतर्गत या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले. २७० कोटीहून अधिक खर्चाच्या या महामार्गाचे आणि पुलांचे बांधकाम पूर्ण झाले. या कामातच हा स्वातंत्र्यपूर्व काळातील पांढरा पूल काढून तेथे नवा पूल प्रस्तावित आहे.

या पुलावरून अचलपूर-परतवाडा शहराला पाणीपुरवठा करणारी चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन गेली आहे. ही पाईपलाईन काढण्याकरिता रस्ते महामार्ग अभियंत्याने १२ फेब्रुवारी २०२० ला अचलपूर पालिकेला पत्र दिले. यावर उशिरा नगरपरिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पत्र दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नगरपरिषदेला ही पाईपलाईन शिफ्ट करण्याकरिता २४ ऑगस्टला तांत्रिक मंजुरी मिळाली.

ती पाईप लाईन पुलावरच

ही मंजुरी मिळाल्यानंतर तीन निविदा प्रकाशित करूनही नगरपरिषदेला कंत्राटदार मिळाला नाही. म्हणून पाणीपुरवठ्याची पाईपलाईन, महामार्ग अभियंत्यांना वेळेत काढता आले नाही. या पाईपलाईनमुळे १५ महिन्यांपासून या पांढऱ्या पुलाचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही. आजही ही पाईपलाईन त्याच पुलावर असून, अपघातास कारणीभूत ठरत आहे. दरम्यान ज्या कंत्राटदाराने महामार्गाचे काम केले त्या कंत्राटदाराने आपला गाशा गुंडाळला आहे. आपली सर्व यंत्रसामुग्री त्याने परतवाड्यातून इतरत्र हलविली आहे.

पूल हलतो, ट्रक झकोला मारतो

आज या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या पुलावरून दहा चाकी, बारा चाकी, लोडेड ट्रकची मोठ्या प्रमाणात अनियंत्रित वाहतूक होत आहे. लोकही त्याच पुलावरून ये-जा करीत आहेत. जेव्हा लोडिंग ट्रक या पुलावरून जातो तेव्हा हा पूल हलतो. या जीवघेण्या गड्यातून जाताना हे ट्रक हेलकावे मारतात. यात अपघाताची शक्यता बळावली आहे.

पुलाचे आयुष्य संपले

शहरातून जाणाऱ्या या बिच्छन नदीवर स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी सर्वप्रथम हा पांढरा पूल बांधला. आज या पुलाचे आयुष्य संपले आहे. कुठल्याही क्षणी तो पूल कोसळू शकतो. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे.

एकाच ठिकाणी दोन पूल

स्वातंत्र्यानंतर अगदी या पुलाला लागूनच १९९७ मध्ये अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुसरा पूल उभारला. एकाच ठिकाणी लागून असलेल्या या दोन पुलांपैकी एका पुलावरून जाणारी तर दुसऱ्या पुलावरून येणारी वाहतूक वळती केल्या गेली. १९९७ पासून ही दुहेरी व्यवस्था शहरात अस्तित्वात आली. परंतु २०१७ मध्ये हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित झाला. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दर्जावाढ करून सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण केले गेले. यातच या पांढऱ्या पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. पण हा पूल दुर्लक्षित आहे.