शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परतवाड्यातील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST

परतवाडा : शहरातील नदीवरील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची तीव्रता बघता पूल केव्हाही कोसळू शकतो. कालबाह्य झालेल्या ...

परतवाडा : शहरातील नदीवरील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची तीव्रता बघता पूल केव्हाही कोसळू शकतो. कालबाह्य झालेल्या या पुलाचे प्रस्तावित बांधकाम १५ महिन्यापासून रखडले आहे. संबंधित ठेकेदाराने गाशा गुंडाळला आहे. पुलावर थांबणारे पावसाचे पाणी काढण्याकरिता त्या पुलालाच भगदाड पाडण्यात आले आहे.

अंजनगाव-परतवाडा- बेतुल- मध्यप्रदेश सीमेपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले आहे. रस्ता दर्जा सुधार कार्यक्रमांतर्गत या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले. २७० कोटीहून अधिक खर्चाच्या या महामार्गाचे आणि पुलांचे बांधकाम पूर्ण झाले. या कामातच हा स्वातंत्र्यपूर्व काळातील पांढरा पूल काढून तेथे नवा पूल प्रस्तावित आहे.

या पुलावरून अचलपूर-परतवाडा शहराला पाणीपुरवठा करणारी चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन गेली आहे. ही पाईपलाईन काढण्याकरिता रस्ते महामार्ग अभियंत्याने १२ फेब्रुवारी २०२० ला अचलपूर पालिकेला पत्र दिले. यावर उशिरा नगरपरिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पत्र दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नगरपरिषदेला ही पाईपलाईन शिफ्ट करण्याकरिता २४ ऑगस्टला तांत्रिक मंजुरी मिळाली.

ती पाईप लाईन पुलावरच

ही मंजुरी मिळाल्यानंतर तीन निविदा प्रकाशित करूनही नगरपरिषदेला कंत्राटदार मिळाला नाही. म्हणून पाणीपुरवठ्याची पाईपलाईन, महामार्ग अभियंत्यांना वेळेत काढता आले नाही. या पाईपलाईनमुळे १५ महिन्यांपासून या पांढऱ्या पुलाचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही. आजही ही पाईपलाईन त्याच पुलावर असून, अपघातास कारणीभूत ठरत आहे. दरम्यान ज्या कंत्राटदाराने महामार्गाचे काम केले त्या कंत्राटदाराने आपला गाशा गुंडाळला आहे. आपली सर्व यंत्रसामुग्री त्याने परतवाड्यातून इतरत्र हलविली आहे.

पूल हलतो, ट्रक झकोला मारतो

आज या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या पुलावरून दहा चाकी, बारा चाकी, लोडेड ट्रकची मोठ्या प्रमाणात अनियंत्रित वाहतूक होत आहे. लोकही त्याच पुलावरून ये-जा करीत आहेत. जेव्हा लोडिंग ट्रक या पुलावरून जातो तेव्हा हा पूल हलतो. या जीवघेण्या गड्यातून जाताना हे ट्रक हेलकावे मारतात. यात अपघाताची शक्यता बळावली आहे.

पुलाचे आयुष्य संपले

शहरातून जाणाऱ्या या बिच्छन नदीवर स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी सर्वप्रथम हा पांढरा पूल बांधला. आज या पुलाचे आयुष्य संपले आहे. कुठल्याही क्षणी तो पूल कोसळू शकतो. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे.

एकाच ठिकाणी दोन पूल

स्वातंत्र्यानंतर अगदी या पुलाला लागूनच १९९७ मध्ये अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुसरा पूल उभारला. एकाच ठिकाणी लागून असलेल्या या दोन पुलांपैकी एका पुलावरून जाणारी तर दुसऱ्या पुलावरून येणारी वाहतूक वळती केल्या गेली. १९९७ पासून ही दुहेरी व्यवस्था शहरात अस्तित्वात आली. परंतु २०१७ मध्ये हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित झाला. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दर्जावाढ करून सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण केले गेले. यातच या पांढऱ्या पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. पण हा पूल दुर्लक्षित आहे.