शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

परतवाड्यातील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST

परतवाडा : शहरातील नदीवरील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची तीव्रता बघता पूल केव्हाही कोसळू शकतो. कालबाह्य झालेल्या ...

परतवाडा : शहरातील नदीवरील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची तीव्रता बघता पूल केव्हाही कोसळू शकतो. कालबाह्य झालेल्या या पुलाचे प्रस्तावित बांधकाम १५ महिन्यापासून रखडले आहे. संबंधित ठेकेदाराने गाशा गुंडाळला आहे. पुलावर थांबणारे पावसाचे पाणी काढण्याकरिता त्या पुलालाच भगदाड पाडण्यात आले आहे.

अंजनगाव-परतवाडा- बेतुल- मध्यप्रदेश सीमेपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले आहे. रस्ता दर्जा सुधार कार्यक्रमांतर्गत या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले. २७० कोटीहून अधिक खर्चाच्या या महामार्गाचे आणि पुलांचे बांधकाम पूर्ण झाले. या कामातच हा स्वातंत्र्यपूर्व काळातील पांढरा पूल काढून तेथे नवा पूल प्रस्तावित आहे.

या पुलावरून अचलपूर-परतवाडा शहराला पाणीपुरवठा करणारी चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन गेली आहे. ही पाईपलाईन काढण्याकरिता रस्ते महामार्ग अभियंत्याने १२ फेब्रुवारी २०२० ला अचलपूर पालिकेला पत्र दिले. यावर उशिरा नगरपरिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पत्र दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नगरपरिषदेला ही पाईपलाईन शिफ्ट करण्याकरिता २४ ऑगस्टला तांत्रिक मंजुरी मिळाली.

ती पाईप लाईन पुलावरच

ही मंजुरी मिळाल्यानंतर तीन निविदा प्रकाशित करूनही नगरपरिषदेला कंत्राटदार मिळाला नाही. म्हणून पाणीपुरवठ्याची पाईपलाईन, महामार्ग अभियंत्यांना वेळेत काढता आले नाही. या पाईपलाईनमुळे १५ महिन्यांपासून या पांढऱ्या पुलाचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही. आजही ही पाईपलाईन त्याच पुलावर असून, अपघातास कारणीभूत ठरत आहे. दरम्यान ज्या कंत्राटदाराने महामार्गाचे काम केले त्या कंत्राटदाराने आपला गाशा गुंडाळला आहे. आपली सर्व यंत्रसामुग्री त्याने परतवाड्यातून इतरत्र हलविली आहे.

पूल हलतो, ट्रक झकोला मारतो

आज या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या पुलावरून दहा चाकी, बारा चाकी, लोडेड ट्रकची मोठ्या प्रमाणात अनियंत्रित वाहतूक होत आहे. लोकही त्याच पुलावरून ये-जा करीत आहेत. जेव्हा लोडिंग ट्रक या पुलावरून जातो तेव्हा हा पूल हलतो. या जीवघेण्या गड्यातून जाताना हे ट्रक हेलकावे मारतात. यात अपघाताची शक्यता बळावली आहे.

पुलाचे आयुष्य संपले

शहरातून जाणाऱ्या या बिच्छन नदीवर स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी सर्वप्रथम हा पांढरा पूल बांधला. आज या पुलाचे आयुष्य संपले आहे. कुठल्याही क्षणी तो पूल कोसळू शकतो. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे.

एकाच ठिकाणी दोन पूल

स्वातंत्र्यानंतर अगदी या पुलाला लागूनच १९९७ मध्ये अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुसरा पूल उभारला. एकाच ठिकाणी लागून असलेल्या या दोन पुलांपैकी एका पुलावरून जाणारी तर दुसऱ्या पुलावरून येणारी वाहतूक वळती केल्या गेली. १९९७ पासून ही दुहेरी व्यवस्था शहरात अस्तित्वात आली. परंतु २०१७ मध्ये हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित झाला. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दर्जावाढ करून सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण केले गेले. यातच या पांढऱ्या पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. पण हा पूल दुर्लक्षित आहे.