शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

चार हजार प्रगणकांद्वारे ३.३२ लाख घरांचे सर्वेक्षण; मराठा समाजाचे मागासलेपणाचे सर्वेक्षण

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: January 29, 2024 21:18 IST

अडथड्यांची शर्यत, गावांचा नंबरच दिसेना

अमरावती : मराठा समाजाचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक मागासलेपण तपासणीच्या सर्वेक्षणातील अडथड्यांची शर्यत अद्याप संपलेली नाही. त्यातच सलग तीन दिवस सुट्या आल्याने सर्वेक्षण मंदावले. अशाही परिस्थितीत शहर व ग्रामीणमधील चार हजार प्रगणकांद्वारा आतापर्यंत ३.९४ लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाचे सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अचूक माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून गोळा केली जात आहे. जिल्हा ग्रामीणमधील ३,१४३ व महापालिका क्षेत्रातील ८३६ अशा एकूण ३,९७९ वर प्रगणक व पर्यवेक्षकांच्या माध्यमातून मराठा व खुला प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला २३ जानेवारीपासून जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे. या ॲपमध्ये सातत्याने अडचणी येत आहेत. ॲप हँग होत आहे. सुरू झाल्यास यामध्ये अनेक गावांचे क्रमांकच दिसत नसल्याची मोठी तक्रार समोर आलेली आहे. शिवाय खुल्या प्रवर्गातील काही जातींच्या नोंदी ॲपमध्ये दिसत नसल्याचेही समोर आले आहे. याबाबत कळविण्यात आल्यानंतर त्रुटी दूर करण्यात आल्या. महापालिकेच्या प्रभागांमध्येही प्रगणकांना अनेक ठिकाणी अडचणी आलेल्या आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे विहित मुदतीत काम पूर्ण होणे सध्या तरी अशक्य दिसत आहे.