शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

सुरेंद्रचेही बोट शिरीष चौधरींकडेच!

By admin | Updated: September 18, 2016 00:10 IST

प्रथमेश आणि अजय यांच्यावर नरबळीच्या हेतुने हल्ला करणारा मुख्य आरोपी सुरेंद्र मराठे याने गंभीर आरोप करून आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्याकडे बोट दाखविले आहे.

तरीही अभय : कार्याध्यक्षांविरुद्ध फिर्यादी अन् आरोपी दोघांच्याही पोलीस तक्रारीअमरावती : प्रथमेश आणि अजय यांच्यावर नरबळीच्या हेतुने हल्ला करणारा मुख्य आरोपी सुरेंद्र मराठे याने गंभीर आरोप करून आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्याकडे बोट दाखविले आहे. प्रथमेशच्या नातेवाईकांनंतर आता आरोपीनेही चौधरींविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलीस आतातरी चौधरींच्या मुसक्या आवळतील काय, हे कळेलच. सुरेंद्रने तपास अधिकाऱ्यांना आश्रमातील प्रभावशाली मंडळींनी त्याला कसे या गुन्ह्यात अडकविले, त्याला कसा गुन्हा कबूल करायला लावला, यासंबंधीचे बयाण दिले होते; तथापि त्याने दिलेले बयाण पोलिसांनी अधिकृतपणे तपासात घेतलेच नाही, असा आरोप सुरेंद्रच्या वडिलांनी केला आहे. सुरेंद्रने त्याच्या वडिलांना दिलेली माहिती धक्कादायक आहे. आर्वी तालुक्यात वास्तव्याला असलेल्या रमेश मराठे यांनी शनिवारी अमरावती गाठले. जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्यांनी लेखी तक्रार दिली. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनाही त्यांनी निवेदन दिले. त्यांच्या मते, सुरेंद्रने दिलेली गुन्ह्याची कबुली बळजोरीची आहे. ही कबुली देण्यासाठी त्याला आश्रमातील ज्या प्रभावशाली व्यक्तींनी भाग पाडले, त्यात एकूण चार जणांचा समावेश आहे. सुरेंद्रने गुन्हा कबूल करावा, यासाठी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यासाठी या मंडळींनी पोलिसांचाही वापर केला. तीन ते चार दिवस आश्रमातील ही मंडळी पोलीस अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात होती. जिवाच्या भीतीमुळे सुरेंद्रने गुन्हा कबूल केला. सुरेंद्रला फसविणाऱ्या बड्या चार लोकांमध्ये आश्रमाचे अधिकृत कर्तेधर्ते शिरीष चौधरी यांचा समावेश आहे.शिरीष चौधरी यांच्याभोवती सर्वत्र संशयाचे गडद ढग आहेत. त्यांच्याविरुद्ध समान्यजनांतूनही अनेक तक्रारी झाल्या. लोकांदोलनांमध्ये चौधरींविरुद्ध प्रक्षुब्ध मते व्यक्त झाली. आता तर नरबळीप्रकरणी त्यांच्याविरुद्ध फिर्यादी आणि आरोपी अशा दोन्ही बाजुंनी गंभीर तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे अधिकार आहेत, त्या व्यक्तीविरुद्ध अशा टोकाच्या दिशांनी पोलीस तक्रारी दाखल होत असतानाही श्रीनिवास घाडगे यांना चौधरींना अटक करावीशी वाटू नये, हे न उमगणारेच कोडे आहे. या अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आकलनाची जी विशिष्ट ऊंची तपास अधिकाऱ्याकडे असणे अपेक्षित आहे, ती घाडगे यांच्या ठायी असल्याचे गृहित धरूनच त्यांना हा तपास सोपविण्यात आला असावा. तथापि शिरीष चौधरी, जे कार्याध्यक्ष आहेत, ते प्रथमेशच्या नातेवाईकांना चक्क धमकवतात. इस्पितळातून जाण्यास सांगतात. त्यांच्या पत्नीला ते प्रथमेशच्या खोलीच चोरून पाठवितात. त्यानंतर प्रथमेशच्या नातेवाईकांनाच गुंडांप्रमाणे धमकवितात. याची तक्रार नोंदविली जाते. चौधरींना तरीही अटक होत नाही. काय अर्थ याचा? चौधरींच्याच आश्रमातील आरोपी चौधरींनी फसविल्याची तक्रार करतो, तरी चौधरी मोकळेच? घाडगे साहेब, जनतेला उत्तर हवे आहे, सांगा चौधरींना इतकी कवचकुंडले देण्याचे कारण काय?