शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सुरेंद्रचेही बोट शिरीष चौधरींकडेच!

By admin | Updated: September 18, 2016 00:10 IST

प्रथमेश आणि अजय यांच्यावर नरबळीच्या हेतुने हल्ला करणारा मुख्य आरोपी सुरेंद्र मराठे याने गंभीर आरोप करून आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्याकडे बोट दाखविले आहे.

तरीही अभय : कार्याध्यक्षांविरुद्ध फिर्यादी अन् आरोपी दोघांच्याही पोलीस तक्रारीअमरावती : प्रथमेश आणि अजय यांच्यावर नरबळीच्या हेतुने हल्ला करणारा मुख्य आरोपी सुरेंद्र मराठे याने गंभीर आरोप करून आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्याकडे बोट दाखविले आहे. प्रथमेशच्या नातेवाईकांनंतर आता आरोपीनेही चौधरींविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलीस आतातरी चौधरींच्या मुसक्या आवळतील काय, हे कळेलच. सुरेंद्रने तपास अधिकाऱ्यांना आश्रमातील प्रभावशाली मंडळींनी त्याला कसे या गुन्ह्यात अडकविले, त्याला कसा गुन्हा कबूल करायला लावला, यासंबंधीचे बयाण दिले होते; तथापि त्याने दिलेले बयाण पोलिसांनी अधिकृतपणे तपासात घेतलेच नाही, असा आरोप सुरेंद्रच्या वडिलांनी केला आहे. सुरेंद्रने त्याच्या वडिलांना दिलेली माहिती धक्कादायक आहे. आर्वी तालुक्यात वास्तव्याला असलेल्या रमेश मराठे यांनी शनिवारी अमरावती गाठले. जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्यांनी लेखी तक्रार दिली. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनाही त्यांनी निवेदन दिले. त्यांच्या मते, सुरेंद्रने दिलेली गुन्ह्याची कबुली बळजोरीची आहे. ही कबुली देण्यासाठी त्याला आश्रमातील ज्या प्रभावशाली व्यक्तींनी भाग पाडले, त्यात एकूण चार जणांचा समावेश आहे. सुरेंद्रने गुन्हा कबूल करावा, यासाठी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यासाठी या मंडळींनी पोलिसांचाही वापर केला. तीन ते चार दिवस आश्रमातील ही मंडळी पोलीस अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात होती. जिवाच्या भीतीमुळे सुरेंद्रने गुन्हा कबूल केला. सुरेंद्रला फसविणाऱ्या बड्या चार लोकांमध्ये आश्रमाचे अधिकृत कर्तेधर्ते शिरीष चौधरी यांचा समावेश आहे.शिरीष चौधरी यांच्याभोवती सर्वत्र संशयाचे गडद ढग आहेत. त्यांच्याविरुद्ध समान्यजनांतूनही अनेक तक्रारी झाल्या. लोकांदोलनांमध्ये चौधरींविरुद्ध प्रक्षुब्ध मते व्यक्त झाली. आता तर नरबळीप्रकरणी त्यांच्याविरुद्ध फिर्यादी आणि आरोपी अशा दोन्ही बाजुंनी गंभीर तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे अधिकार आहेत, त्या व्यक्तीविरुद्ध अशा टोकाच्या दिशांनी पोलीस तक्रारी दाखल होत असतानाही श्रीनिवास घाडगे यांना चौधरींना अटक करावीशी वाटू नये, हे न उमगणारेच कोडे आहे. या अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आकलनाची जी विशिष्ट ऊंची तपास अधिकाऱ्याकडे असणे अपेक्षित आहे, ती घाडगे यांच्या ठायी असल्याचे गृहित धरूनच त्यांना हा तपास सोपविण्यात आला असावा. तथापि शिरीष चौधरी, जे कार्याध्यक्ष आहेत, ते प्रथमेशच्या नातेवाईकांना चक्क धमकवतात. इस्पितळातून जाण्यास सांगतात. त्यांच्या पत्नीला ते प्रथमेशच्या खोलीच चोरून पाठवितात. त्यानंतर प्रथमेशच्या नातेवाईकांनाच गुंडांप्रमाणे धमकवितात. याची तक्रार नोंदविली जाते. चौधरींना तरीही अटक होत नाही. काय अर्थ याचा? चौधरींच्याच आश्रमातील आरोपी चौधरींनी फसविल्याची तक्रार करतो, तरी चौधरी मोकळेच? घाडगे साहेब, जनतेला उत्तर हवे आहे, सांगा चौधरींना इतकी कवचकुंडले देण्याचे कारण काय?