शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अधीक्षकांना नको व्हीआयपी फाईलची ब्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:43 IST

महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाचा (जीएडी) पायपोस कुणाच्याही पायात राहिलेला नाही. सहायक आयुक्तांना डावलून अनेक फायली थेट उपायुक्तांकडे जात असताना महत्त्वाच्या फायलींची ब्याद आपल्याकडेच नकोच, असा पवित्रा अधीक्षकांनी घेतला आहे.

ठळक मुद्देबांधकामामध्येच ठेवण्याचा सल्ला : जीएडीची निगरगठ्ठता उघड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाचा (जीएडी) पायपोस कुणाच्याही पायात राहिलेला नाही. सहायक आयुक्तांना डावलून अनेक फायली थेट उपायुक्तांकडे जात असताना महत्त्वाच्या फायलींची ब्याद आपल्याकडेच नकोच, असा पवित्रा अधीक्षकांनी घेतला आहे. अधीक्षकांच्या या घोंगडे फेकण्याचा मानसिकतेचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची प्रतिक्रिया महापालिकेत उमटली आहे.नियमित आस्थापनेसोबतच कंत्राटीबाबतच्या सर्व संचिका जीएडीत असणे अभिप्रेत आहे. त्याबाबतची सर्व प्रक्रिया जीएडीतूनच चालते. त्या पार्श्वभूमीवर ‘व्हीआयपी फाइलला फुटले पाय’ या वृत्तातून ‘लोकमत’ने कंत्राटी तत्त्वावरील सेवानिवृत्त अभियंत्यांच्या महत्त्वपूर्ण फाइलवर प्रकाशझोत टाकला होता. आपल्या विभागातील फाइल कुठे आहे, हेही अधीक्षकांना माहीत नव्हते. त्यानंतर कार्यकारी अभियंता १ मध्ये कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त कंत्राटी अभियंत्याने सदार यांच्या बाबतची ती फाइल आपल्याकडे असल्याची माहिती जीएडी अधीक्षकांना दिली. डाकेद्वारे ती फाइल पाठविण्याबाबत अधीक्षकांना विचारणाही केली. पण, ती फाइल तेथेच राहू द्या, उगाचच ब्याद नको, असे म्हणत अधीक्षकांनी ती महत्त्वपूर्ण फाइल परत पाठविण्याकरिता नकार दिला. अधीक्षकांकडून जीएडीतील फायलींच्या गोपनियतेची आणि गांभीर्याची कल्पना न केलेली बरी हेच हे सांगते. कार्यकारी अभियंता-१ च्या दालनातील कपाटात ती फाइल पडली असून, त्याच कार्यालयातून ती पुढे सरकवली जाते. मुदतवाढ जीएडीकडून प्रस्तावित करणे अभिप्रेत असताना अधीक्षकांनी बिनदिक्कतपणे ती महत्त्वपूर्ण फाइल आवक-जावक मध्ये न नोंदविता कंत्राटी अभियंत्याकडे दिली.म्हणून तुमच्याकडेच ठेवाकंत्राटी शहर अभियंता जीवन सदार यांच्या मुदतवाढीची फाइल सेवानिवृत्त कंत्राटी अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याकडून चालली. आयुक्त सिंगापूरला चालले असल्याने कुळकर्णींनी हातोहात फाइल फिरवून सदारांची मुदतवाढीवर आयुक्तांची स्वाक्षरी घेतली. ती फाइल जीएडीने चालविली नाही. त्यामुळे त्यापासून ती फाईल कुळकर्णींकडे असल्याचा पुनरूच्चार जीएडी अधीक्षकांना केला आहे. तसेही सदारांचा कार्यकाळ जूनमध्ये संपुष्टात येतो आहे. त्यामुळे त्या फाइलची आता गरजच भासणार नाही. त्यामुळे ती फाइल तुमच्याकडेच ठेवा, असा सूचना अधीक्षकांनी आपल्याला दिल्याचे कुळकर्णी म्हणाले.