शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

सूर्योदय परिवाराचा आधारवड हरवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 23:55 IST

समाजातील सर्वच घटकांच्या उत्थानासाठी अविरत झिजलेले सद्गुरू श्री भय्युजी महाराज यांच्या अकाली निधनाचे वृत्त धडकताच येथील सूर्योदय परिवारात आधारवड कोसळल्याची भावना व्यक्त झाली.

अमरावती : समाजातील सर्वच घटकांच्या उत्थानासाठी अविरत झिजलेले सद्गुरू श्री भय्युजी महाराज यांच्या अकाली निधनाचे वृत्त धडकताच येथील सूर्योदय परिवारात आधारवड कोसळल्याची भावना व्यक्त झाली. अनेकांनी महाराजांचे अखेरचे दर्शन घ्यायला इंदुरकडे धाव घेतली. वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येथील सूर्योदय परिवार सद्गुरुंच्या मार्गदर्शनात नेहमीच कार्यमग्न राहत आला आहे.भय्यूजी महाराजांच्या अकाली मृत्यूने समाजाची भरून न निघणारी हानी झाली. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात त्यांचे मोठे कार्य आहेत. अमरावतीशी महाराजांचा घनिष्ठ स्रेह राहिला. एक वर्षापूर्वी महाराजांची मुंबईला भेट घेतली होती.- प्रवीण पोटे, पालकमंत्रीसर्व समाजाला घेऊन चालणारे सर्वसमावेशक असे महाराजांचे व्यक्तिमत्त्व होते. कधीही अडचणीत असलो की, महाराजांची भेट घ्यायचो. लगेच समस्येचे निराकरण व्हायचे. महाराज आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही.- प्रा.डॉ. हेमंत देशमुख, सूर्योदय परिवारमहाराजांच्या आकस्मिक मृत्यूने आमचा आधारच हिरावला. महाराजांची राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम अद्वितीय होते. आमच्यावर त्यांची वडिलांसारखी माया होती. या सर्व पे्रमाला आम्ही पारखे झालो आहोत.- रविराज देशमुख, सूर्योदय परिवारमहाराजांच्या सान्निध्यात १० वर्षांपासून समाजकार्याशी जुळलो आहे. महाराजांच्या संकल्पाची पूर्ती करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करीत राहू. महाराजांच्या अकाली निधनामुळे आमचा आधारवड हरविला आहे.- डॉ. स्वप्निल देशमुख, सूर्योदय परिवारसमाजातील सर्व क्षेत्रात सद्गुरु भय्यूजी महाराजांचे उदंड कार्य आहेत. वंचितांच्या शिक्षणासाठी महाराजांनी खामगाव येथे मोठी आश्रमशाळा काढली. महाराजांचे निधन झाले, यावर विश्वासच बसत नाही. आमचा मोठा आधार हिरावला गेलाय.- जयसिंह देशमुख, सूर्योदय परिवारमहाराजांनी लाखो लोकांना जगण्याची दीक्षा दिली. महाराजांच्या निधनाबाबत विश्वासच बसत नाही. वंचित समाजाला प्रवाहात आणायचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांच्यापश्चात हे कार्य अविरत सुरू राहावे, हा आमचा प्रयत्न राहील.- राजू सुंदरकर, सूर्योदय परिवार