शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

सुंदर गाव योजनेचे पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात सन २०१९-२० या कालावधीत राबविण्यात आलेल्या आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेचे ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात सन २०१९-२० या कालावधीत राबविण्यात आलेल्या आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेचे पुरस्कार १६ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी जाहीर केले. यामध्ये १३ तालुक्यांत प्रत्येकी एक, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोन गावांना विभागून अशा १५ गावांना तालुकास्तरावर, तर दोन गावांना संयुक्तरीत्या जिल्हास्तरावरचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ८४० ग्रामपंचायतींपैकी अधिक गुण प्राप्त करणाऱ्या २१० ग्रामपंचायतींची गटविकास अधिका०यांमार्फत क्रॉस चेकिंग करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामपंचायतींचे अहवाल जिल्हा परिषदेतील पंचायत विभागाकङे सादर करण्यात आले होते. आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेच्या तालुकास्तरीय समितीकडून गुणांकन व मूल्यांकन करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीमार्फत गाव पाहणी अभिलेख्यांची व गुणांची पडताळणी करून ग्रामपंचायतींना पात्र ठरविण्यात आले होते. तालुकास्तरावर १५ ग्रामपंचायती पात्र ठरल्या. यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पुसनेर व मोखड या दोन ग्रामपंचायतींना पुरस्कार संयुक्तरीत्या जाहीर करण्यात आला. १४ तालुक्यांतून अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा आणि चांदूर बाजार तालुक्यातील गाेविंदपूर या दोन ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावरचा पुरस्कार संयुक्तरीत्या जाहीर झाला. तालुकास्तरावर पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाखांचा आणि जिल्हास्तरावर ४० लाखांचा रोख स्वरूपात पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मानकर यांनी दिली.

बॉक्स

तालुकास्तरावर पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती

रेवसा (अमरावती). सोमवारखेडा (भातकुली). पुसनेर व मोखड (नांदगाव खंडेश्वर). जावरा (तिवसा). लेहगाव (मोर्शी). सावंगा (वरूड). कापूसतळणी (अंजनगाव सुर्जी). दुनी (धारणी). गौलखेडा बाजार (चिखलदरा). शिंगणापूर (दर्यापूर). गोविंदपूर (चांदूर बाजार). सावळी दातुरा (अचलपूर). सावंगी संगम (चांदूर रेल्वे). कामनापूर घुसळी (धामणगाव रेल्वे).

जिल्हास्तरावर पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती

सावळी दातुरा (अचलपूर) व गाेविंदपूर (चांदूर बाजार)

कोट

जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील गावांची तपासणी केली असता, दोन ग्रामपंचायती अव्वल आढळल्या. यंदा सर्वच गावांना स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद लाभला.

- अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद