शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

उन्हाची दाहकता वाढल्याने बाजारपेठेत फळांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:11 IST

चांदूर बाजार : तुलनेने यंदा तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत आहे. यावर्षी अनेक भागांत एप्रिल महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ...

चांदूर बाजार : तुलनेने यंदा तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत आहे. यावर्षी अनेक भागांत एप्रिल महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. उन्हाची दाहकता वाढली असल्याने बाजारपेठेत विविध फळांची मागणी वाढली आहे. मागणीला पाहता निरनिराळे रसदार फळे बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.

नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शीतपेयांचा वापर करताना दिसत आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी बाजारपेठेत विविध फळांची मागणी वाढली आहे. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वाधिक मागणी टरबूजची होत आहे. यंदा टरबूजची विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने होत आहे. तालुक्यात टरबुजाची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर देखील दिवसेंंदिवस ढासळत आहे. यासोबतच द्राक्ष, चिकू, खरबूज, नारळ पाणी, आदींना मागणी आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने बाजारपेठ केवळ ४ तास सुरू आहे. अशात शीतपेयांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. याचसोबत आईस्क्रीम, बदाम, काजू शेक यांच्या विक्रीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. या शीतपेयाचे दर प्रचंड वाढले असले तरी मागणी मात्र कमी झालेली नाही. तापमान दिवसेंदीवस वाढत असल्याने शीतपेयांची मागणी मोठी वाढत आहे. मात्र, लॉकडाऊनचा फटका शीतपेयांच्या दुकानांना बसला असल्याने फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

यंदा एप्रिलच्या सुरुवातीपासून उन्हाची दाहकता वाढल्याने एप्रिलपेक्षा मे महिन्यात परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात भरीस भर म्हणून पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस घडद होत आहे. ग्रामीण भागात विहिरींची पाणी पातळी खोल गेली आहे. त्याचबरोबर बोरवेलचे पाणी क्षारयुक्त असल्यामुळे या पाण्याची मागणी कमी असते.

गरीब गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ देखील बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. अशात उन्हापासून बचाव करण्यासाठी पाण्यासोबत थंडपेयाकडे नागरिकांची पावले वळली आहे. त्यामुळे फळांची मागणी मोठी वाढली आहे.

लॉकडाऊनमुळे यंदा रसवंतीचा व्यवसाय बंद आहे. यात ऊसाची वाहतूक बंद असल्याने रसवंती संचालकांनी ऊसाच्या रसाचे दर कमी ठेवले आहे. उन्हाळ्यात मात्र चहापेक्षा ऊसाचा रस बरा असे म्हनणाऱ्या ग्राहकांना यंदा ऊसाच्या रसाला मुकावे लागणार आहे. मात्र, लिंबू सरबतच्या गाड्यांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.