शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

उन्हाची दाहकता वाढल्याने बाजारपेठेत फळांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:11 IST

चांदूर बाजार : तुलनेने यंदा तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत आहे. यावर्षी अनेक भागांत एप्रिल महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ...

चांदूर बाजार : तुलनेने यंदा तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत आहे. यावर्षी अनेक भागांत एप्रिल महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. उन्हाची दाहकता वाढली असल्याने बाजारपेठेत विविध फळांची मागणी वाढली आहे. मागणीला पाहता निरनिराळे रसदार फळे बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.

नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शीतपेयांचा वापर करताना दिसत आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी बाजारपेठेत विविध फळांची मागणी वाढली आहे. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वाधिक मागणी टरबूजची होत आहे. यंदा टरबूजची विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने होत आहे. तालुक्यात टरबुजाची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर देखील दिवसेंंदिवस ढासळत आहे. यासोबतच द्राक्ष, चिकू, खरबूज, नारळ पाणी, आदींना मागणी आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने बाजारपेठ केवळ ४ तास सुरू आहे. अशात शीतपेयांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. याचसोबत आईस्क्रीम, बदाम, काजू शेक यांच्या विक्रीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. या शीतपेयाचे दर प्रचंड वाढले असले तरी मागणी मात्र कमी झालेली नाही. तापमान दिवसेंदीवस वाढत असल्याने शीतपेयांची मागणी मोठी वाढत आहे. मात्र, लॉकडाऊनचा फटका शीतपेयांच्या दुकानांना बसला असल्याने फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

यंदा एप्रिलच्या सुरुवातीपासून उन्हाची दाहकता वाढल्याने एप्रिलपेक्षा मे महिन्यात परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात भरीस भर म्हणून पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस घडद होत आहे. ग्रामीण भागात विहिरींची पाणी पातळी खोल गेली आहे. त्याचबरोबर बोरवेलचे पाणी क्षारयुक्त असल्यामुळे या पाण्याची मागणी कमी असते.

गरीब गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ देखील बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. अशात उन्हापासून बचाव करण्यासाठी पाण्यासोबत थंडपेयाकडे नागरिकांची पावले वळली आहे. त्यामुळे फळांची मागणी मोठी वाढली आहे.

लॉकडाऊनमुळे यंदा रसवंतीचा व्यवसाय बंद आहे. यात ऊसाची वाहतूक बंद असल्याने रसवंती संचालकांनी ऊसाच्या रसाचे दर कमी ठेवले आहे. उन्हाळ्यात मात्र चहापेक्षा ऊसाचा रस बरा असे म्हनणाऱ्या ग्राहकांना यंदा ऊसाच्या रसाला मुकावे लागणार आहे. मात्र, लिंबू सरबतच्या गाड्यांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.