शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाची दाहकता वाढल्याने बाजारपेठेत फळांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:11 IST

चांदूर बाजार : तुलनेने यंदा तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत आहे. यावर्षी अनेक भागांत एप्रिल महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ...

चांदूर बाजार : तुलनेने यंदा तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत आहे. यावर्षी अनेक भागांत एप्रिल महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. उन्हाची दाहकता वाढली असल्याने बाजारपेठेत विविध फळांची मागणी वाढली आहे. मागणीला पाहता निरनिराळे रसदार फळे बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.

नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शीतपेयांचा वापर करताना दिसत आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी बाजारपेठेत विविध फळांची मागणी वाढली आहे. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वाधिक मागणी टरबूजची होत आहे. यंदा टरबूजची विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने होत आहे. तालुक्यात टरबुजाची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर देखील दिवसेंंदिवस ढासळत आहे. यासोबतच द्राक्ष, चिकू, खरबूज, नारळ पाणी, आदींना मागणी आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने बाजारपेठ केवळ ४ तास सुरू आहे. अशात शीतपेयांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. याचसोबत आईस्क्रीम, बदाम, काजू शेक यांच्या विक्रीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. या शीतपेयाचे दर प्रचंड वाढले असले तरी मागणी मात्र कमी झालेली नाही. तापमान दिवसेंदीवस वाढत असल्याने शीतपेयांची मागणी मोठी वाढत आहे. मात्र, लॉकडाऊनचा फटका शीतपेयांच्या दुकानांना बसला असल्याने फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

यंदा एप्रिलच्या सुरुवातीपासून उन्हाची दाहकता वाढल्याने एप्रिलपेक्षा मे महिन्यात परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात भरीस भर म्हणून पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस घडद होत आहे. ग्रामीण भागात विहिरींची पाणी पातळी खोल गेली आहे. त्याचबरोबर बोरवेलचे पाणी क्षारयुक्त असल्यामुळे या पाण्याची मागणी कमी असते.

गरीब गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ देखील बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. अशात उन्हापासून बचाव करण्यासाठी पाण्यासोबत थंडपेयाकडे नागरिकांची पावले वळली आहे. त्यामुळे फळांची मागणी मोठी वाढली आहे.

लॉकडाऊनमुळे यंदा रसवंतीचा व्यवसाय बंद आहे. यात ऊसाची वाहतूक बंद असल्याने रसवंती संचालकांनी ऊसाच्या रसाचे दर कमी ठेवले आहे. उन्हाळ्यात मात्र चहापेक्षा ऊसाचा रस बरा असे म्हनणाऱ्या ग्राहकांना यंदा ऊसाच्या रसाला मुकावे लागणार आहे. मात्र, लिंबू सरबतच्या गाड्यांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.