शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाची दाहकता वाढल्याने बाजारपेठेत फळांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:11 IST

चांदूर बाजार : तुलनेने यंदा तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत आहे. यावर्षी अनेक भागांत एप्रिल महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ...

चांदूर बाजार : तुलनेने यंदा तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत आहे. यावर्षी अनेक भागांत एप्रिल महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. उन्हाची दाहकता वाढली असल्याने बाजारपेठेत विविध फळांची मागणी वाढली आहे. मागणीला पाहता निरनिराळे रसदार फळे बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.

नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शीतपेयांचा वापर करताना दिसत आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी बाजारपेठेत विविध फळांची मागणी वाढली आहे. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वाधिक मागणी टरबूजची होत आहे. यंदा टरबूजची विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने होत आहे. तालुक्यात टरबुजाची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर देखील दिवसेंंदिवस ढासळत आहे. यासोबतच द्राक्ष, चिकू, खरबूज, नारळ पाणी, आदींना मागणी आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने बाजारपेठ केवळ ४ तास सुरू आहे. अशात शीतपेयांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. याचसोबत आईस्क्रीम, बदाम, काजू शेक यांच्या विक्रीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. या शीतपेयाचे दर प्रचंड वाढले असले तरी मागणी मात्र कमी झालेली नाही. तापमान दिवसेंदीवस वाढत असल्याने शीतपेयांची मागणी मोठी वाढत आहे. मात्र, लॉकडाऊनचा फटका शीतपेयांच्या दुकानांना बसला असल्याने फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

यंदा एप्रिलच्या सुरुवातीपासून उन्हाची दाहकता वाढल्याने एप्रिलपेक्षा मे महिन्यात परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात भरीस भर म्हणून पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस घडद होत आहे. ग्रामीण भागात विहिरींची पाणी पातळी खोल गेली आहे. त्याचबरोबर बोरवेलचे पाणी क्षारयुक्त असल्यामुळे या पाण्याची मागणी कमी असते.

गरीब गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ देखील बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. अशात उन्हापासून बचाव करण्यासाठी पाण्यासोबत थंडपेयाकडे नागरिकांची पावले वळली आहे. त्यामुळे फळांची मागणी मोठी वाढली आहे.

लॉकडाऊनमुळे यंदा रसवंतीचा व्यवसाय बंद आहे. यात ऊसाची वाहतूक बंद असल्याने रसवंती संचालकांनी ऊसाच्या रसाचे दर कमी ठेवले आहे. उन्हाळ्यात मात्र चहापेक्षा ऊसाचा रस बरा असे म्हनणाऱ्या ग्राहकांना यंदा ऊसाच्या रसाला मुकावे लागणार आहे. मात्र, लिंबू सरबतच्या गाड्यांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.