शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पर्णगळीने उन्हाळ्याचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:15 IST

पानगळ ही वृक्षांच्या जीवनातील एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेला वृक्ष ठरावीक ऋतुमध्ये वठलेला दिसतो. त्यानंतर त्याला नवे कपोल फुटतात. जगाच्या निरनिराळ्या भागात हा कालावधी वेगवेगळा आढळून येतो.

ठळक मुद्देउष्ण कटिबंधात हवामान शुष्क : वनस्पतींचा भार कमी होण्याची क्रिया

इंदल चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पानगळ ही वृक्षांच्या जीवनातील एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेला वृक्ष ठरावीक ऋतुमध्ये वठलेला दिसतो. त्यानंतर त्याला नवे कपोल फुटतात. जगाच्या निरनिराळ्या भागात हा कालावधी वेगवेगळा आढळून येतो. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतूचा असतो, तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ होते. पानगळीमुळे वनस्पतीमधील पानांद्वारे होणारे बाष्पीभवन थांबण्यास मदत होते, हे विशेष.आला शिशिर संपत।पाने गळत चालली।।या ओवीतून कवी निसर्गाचे छान विश्लेषण करतात. शांत निवांत शिशिर सरला. सळसळता हिरवा वसंत आला, असे कोकिळा गाणे गात असते. पर्यावरणाच्या दृष्टीने वर्षभरात सहा ऋतू येतात. प्रत्येक ऋतू वैशिष्ट्यपूर्णच. वर्षा ऋतूत पावसाच्या सरी कोसळतात.शिशिर ऋतूत थंडीचा कडाका असतो. शरद, हेमंत ऋतू व वसंत ऋतूत शुष्क वातावरणामुळे वनस्पतींना उन्हाळ्याची चाहूल लागते. फेब्रुवारी महिन्यात जवळपास ९५ टक्के झाडांची पाने गळून पडतात. याचे कारणच हे की, प्रत्येक वनस्पती हवा, पाणी व सूर्यप्रकाशावर जगतात. शिशिर ऋतूपर्यंत झाडांना पाणी मुबलक राहत असल्याने प्रत्येक मुळातून पानापर्यंत पाणी पोहचते. मात्र, शुष्क वातावरणात पाण्याची पातळी खालावत असल्याने झाडे मुळात पाणी साठवितात. पानांना पाण्याचा पुरवठा बंद होतो. परिणामी पान गळाली तरी झाड मात्र ओलसरच राहते, अशी माहिती भारतीय महाविद्यालयाचे प्राध्यापक यू.एस. पाटील यांनी दिली.आम्रवृक्षावर परिणाम नाहीविदर्भात वनस्पतींच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी पाच टक्के प्रजाती अशा आहेत, ज्यांची पाने वर्षभर गळत नाहीत. आम्रवृक्षाचीही पाने गळतात. मात्र, एकाच वेळी पूर्णत: गळत नसल्याने दिसून पडत नाही. कारण त्याची मुळे जमिनीत अत्यंत खोलवर गेलेल्या असतात. फांद्यांना पाणी मुबलक प्रमाणात मिळत असल्याने एकाच वेळी पूर्णत: पानगळ होत नसल्याची माहिती प्रा. डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.पानगळीनंतर फुलांचा बहरकाही वनस्पतींना पानगळ झाल्यावर फुले येतात. पानगळ झालेली अशी झाडे पक्षी, कीटक वा इतर सस्तन प्राण्यांकडून परागीभवन करून घेतात. पाने नसल्याने फुलांवर थेट प्रवेश होऊन रस शोषण करण्यात मिळत असल्याने कीटक त्यात सामावतात. काही काळातच फुलांच्या पाकळ्या बंद होऊन कीटक त्यात अडकतो, अशी निसर्गनिर्मित किमया विदर्भात फेब्रुवारी महिन्यात अनुभवास येते.