शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

सारांश पान ३ साठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:12 IST

राजुरा बाजार : पीक विम्याच्या नावावर विमा कंपन्या शेतकऱ्याचा प्रीमियम घेऊन मोबदल्यात अल्पशी मदत देऊन त्यांची बोळवण करीत ...

राजुरा बाजार : पीक विम्याच्या नावावर विमा कंपन्या शेतकऱ्याचा प्रीमियम घेऊन मोबदल्यात अल्पशी मदत देऊन त्यांची बोळवण करीत असल्याची ओरड आहे. अतिपाऊस व त्यानंतर अकाली व सततच्या पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळाली नाही.

-------------

नांदगावपेठ -पांढुर्णा महामार्गाला भेगा !

मोर्शी : नांदगाव पेठ ते पांढुर्णापर्यंत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाला अवघ्या दीड ते दोन वर्षांतच अनेक ठिकाणी भेगा पडल्या. या नवीन महामार्गावरील सिमेंट रोडवर पडलेल्या भेगा मोठ्या असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

--------------

पंचवटीच्या उड्डाणपुलाखाली अतिक्रमण

अमरावती : पंचवटी चौकातील उड्डाणपूल परिसरात पुन्हा हातगाडीधारकांचे अतिक्रमण झाले आहे. लॉकडाऊन काळात ते अतिक्रमण दूर सारले गेले होते. मात्र, आता पुन्हा सायंकाळी त्या भागात अनेक हातगाड्या लागत आहेत. त्याकडे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे दुर्लक्ष आहे.

--------------

कॉलेज रोडवर चप्पल, बुट विक्रीचा बाजार

अमरावती : शिवाजी कॉलेज, गणेशदास राठी विद्यालय या दोन्ही शाळा महाविद्यालयासमोरच्या पदपथावर पादत्राणे विक्रीचा बाजार बिनबोभाटपणे भरविला जात आहे. अगदी सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे अतिक्रमण थाटण्यात येत आहे. महापालिकेने ते अद्यापही दूर सारलेले नाही.

---------------

राजकमल चौकात अपघाताचे प्रमाण वाढले

अमरावती : जयस्तंभ चौकाकडून पुढे राजकमल चौकाकडे जाणारा मार्ग एकाच दिशेने बनल्याने या चौकात वाहतूक कोंडी होत आहे. राजलक्ष्मी टॉकीजच्या बाजुने रस्ता बांधकाम झाल्याने ती बाजू तुलनेत वर आली. त्यामुळे वाहने घसरून किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

-----------------------

रेल्वे गेट परिसराला अतिक्रमणाचा विळखा

चांदूर रेल्वे : येथील रेल्वेगेटसमोर दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुकानेही रोडला एक फूट लागूनच असून एका दुकानापासून सुरुवात होऊन आता १२ ते १४ दुकाने झालेली आहे. रस्त्याच्या आजूबाजूला सोनगाव व सावंगा पुनर्वसन हे गाव आहे. दुकानामुळे रोडच्या बाजूलाच वाहने उभी राहतात. त्यामुळे सदर दुकाने हटविण्यात यावे, अशी मागणी आहे.

---------------

धारणीतील कोल्हापुरी बंधारा भरला

धारणी : येथून सात किलोमीटर अंतरावरील रोहनीखेडा या गावाजवळून वाहणाऱ्या गडगा नदीच्या पात्रात कोल्हापूरी बंधारा बांधण्यात आला आहे. दरवर्षी या बंधाऱ्यातील पाणी दिवाळीनंतर अडविण्यात येते. त्यामुळे या भरलेल्या बंधाऱ्यातील पाणी जवळपासच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध करवून देण्यात आले आहे.

---------

बहिरमबाबाचे मुखदर्शन

ब्राम्हणवाडा थडी : यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात प्रवेश न देता भाविकांना बहिरमबाबाचे मुखदर्शन घेता येणे शक्य आहे. मूर्तीला हात लागू नये, यासाठी गाभाऱ्यातील प्रवेश वर्जित करण्यात आला. मंदिर प्रशासनाने कठडे उभारलेले आहे. तसेच मंदिरात शासनाने आखून दिलेल्या नियमाचे पूर्ण पालन केले जात आहे.

--------