शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:12 IST

तळेगाव दशासर : गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सन २०१३ मध्ये २ कोटी रुपयांच्या पेयजल पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली ...

तळेगाव दशासर : गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सन २०१३ मध्ये २ कोटी रुपयांच्या पेयजल पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली होती. मात्र, आठ वर्षानंतरही ती पूर्णत्वास गेलेली नाही. गावात राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा नळ योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. अर्ध्या गावाला जुन्या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत असून, इतरांना खासगी बोअरचा आधार घेऊन तहान भागवावी लागत आहे.

---------------

मजीप्राने खोदून ठेवले रस्ते

मंगरूळ दस्तगीर : पाणीपुरवठा योजनेसाठी गावातील सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आले. त्यामुळे हे गाव त्या खोदकामामुळे भकास झाले आहे. जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांंकडून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे. या गावातील रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने किरकोळ अपघातदेखील वाढले आहेत.

----------------

फोटो पी २३ कारवाई

पाच व्यापारी प्रतिष्ठानांवर कारवाई

अमरावती : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांवर निर्बंध असतानादेखील नियम तोडणाऱ्या पाच व्यापारी प्रतिष्ठानांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आदित्य झेरॉक्स (फरशी स्टॉप), सोहित सेल्स (विलासनगर), वेलकम सीट कवर (दसरा मैदान), पुणेरी चहा (रामपुरी कॅम्प), वन्स मोर सलून (पलाश लाइन) या आस्थापनांवर राजापेठ पोलीस व गाडगेनगर पोलीस ठाण्यांच्या तक्रारीनुसार महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.

---------------

बंदी कागदावरच, बोअर सुरूच

वरूड : जिल्हाधिकाऱ्यांनी बोअर करणाऱ्या रिंग माउंटेड मशीनवर बंदी घातली असताना, त्या मशीन येऊन बोअर करून जातात. तालुक्यात कोरोना वेगाने फैलावत असताना अधिकारी व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन काही दलाल अधिक रक्कम घेऊन अवैध बोअर करून देत आहेत. काही भागात भर दिवसा बोअर केला जात आहेत.

---------------

‘ते’ खुले रोहित्र झाकणबंद करण्याची मागणी

करजगाव : येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला लागून आझाद चौकात खुले रोहित्र आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक बळावली आहे. महावितरणला आणखी प्राणांतिक अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल करजगाववासीयांनी उपस्थित केला आहे.

---------------

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पाणीटंचाई

चिखलदरा : तालुक्यातील ३५ पेक्षा अधिक गावखेड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ३५ गावातील पाणीटंचाई ‘जैसे थे’ आहे. अनेक गावांत टँकरवारी सुरू झाली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ही पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे.