शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:09 IST

अमरावती : घातखेड येथील कृषि विज्ञान केंद्र आणि महिला व बालविकास प्रकल्प, धारणी व भातकुली यांच्यातर्फे अंगणवाडी सेविकांना ...

अमरावती : घातखेड येथील कृषि विज्ञान केंद्र आणि महिला व बालविकास प्रकल्प, धारणी व भातकुली यांच्यातर्फे अंगणवाडी सेविकांना कोरोनाकाळात स्वास्थ सुरक्षिततेसाठी आहारविषयक उपायावर आॅनलाईन वेबिनारद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रामुख्याने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असणारे जीवनसत्त्व आणि त्यांच्या स्रोतांचे महत्?त्व सांगण्यात आले. यात धारणी आणि भातकुली तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

-----------

मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग कुठाय?

भातकुली : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे गावातील नागरिक आता सर्रास विनामास्क फिरताना दिसतात. तर वाहनातून प्रवास करताना क्षमतेपेक्षा अधिक आणि विनामास्क बसून प्रवास सुरु झाला. बाजारात आणि वर्दळीच्या ठिकाणी हीच अवस्था आहे. ना मास्क, ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टन्स अशी अवस्था आहे.

-------------------

दुकानासमोर गोल, मात्र गर्दी जैस ेथे

वरूड : मागील लॉकडाऊनमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी, ग्राहकांना दुकानांसमोर उभे राहण्याकरीता गोल वा चौकोनांची आखणी करण्यात आली. पण आता त्याचे पालन होत नाही. परिसरातील बसस्थानक, बाजारपेठ, शासकीय, निमशासकीय कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढत असून कोणीच नियम पाळताना दिसत नाही.

-------------------

धामणगाव तालुक्यातील ग्रामीण घरकुलापासून वंचित

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये ‘ड’ घरकुलांची यादी प्रलंबित आहे. या वंचितांना घरकुल नसल्यामुळे पावसाळा उन्हाळा उघड्यावर काढावा लागतो. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष नाही. हातावर आणून पानावर खाणाºया या सर्वसामान्य गरिबांना घरकुल नाही. पावसाळ्यानंतर त्यांना घरकुल मिळाले नाही.

--------------------

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

अमरावती : रुग्णालयामध्ये उपलब्ध असणाºया सुविधांचा वापर करून त्याच ठिकाणी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना प्रशिक्षण व रोजगार मिळवून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

------------

कडबी बाजार परिसरात वीज पुरवठा खंडित

अमरावती: महावितरणच्या कडबी बाजार वितरण केंद्र व आजूबाजूच्या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याला तांत्रिक दोष कारणीभूत नसून मानवी हस्तक्षेपामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे. महावितरण वीज ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी बांधिल आहे परंतू नागरीकांनीही सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केले आहे.

--------------