शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
4
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
5
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
6
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
7
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
8
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
9
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
10
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
11
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
12
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
14
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
15
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
16
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
17
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
18
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
19
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
20
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:09 IST

अमरावती : घातखेड येथील कृषि विज्ञान केंद्र आणि महिला व बालविकास प्रकल्प, धारणी व भातकुली यांच्यातर्फे अंगणवाडी सेविकांना ...

अमरावती : घातखेड येथील कृषि विज्ञान केंद्र आणि महिला व बालविकास प्रकल्प, धारणी व भातकुली यांच्यातर्फे अंगणवाडी सेविकांना कोरोनाकाळात स्वास्थ सुरक्षिततेसाठी आहारविषयक उपायावर आॅनलाईन वेबिनारद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रामुख्याने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असणारे जीवनसत्त्व आणि त्यांच्या स्रोतांचे महत्?त्व सांगण्यात आले. यात धारणी आणि भातकुली तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

-----------

मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग कुठाय?

भातकुली : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे गावातील नागरिक आता सर्रास विनामास्क फिरताना दिसतात. तर वाहनातून प्रवास करताना क्षमतेपेक्षा अधिक आणि विनामास्क बसून प्रवास सुरु झाला. बाजारात आणि वर्दळीच्या ठिकाणी हीच अवस्था आहे. ना मास्क, ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टन्स अशी अवस्था आहे.

-------------------

दुकानासमोर गोल, मात्र गर्दी जैस ेथे

वरूड : मागील लॉकडाऊनमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी, ग्राहकांना दुकानांसमोर उभे राहण्याकरीता गोल वा चौकोनांची आखणी करण्यात आली. पण आता त्याचे पालन होत नाही. परिसरातील बसस्थानक, बाजारपेठ, शासकीय, निमशासकीय कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढत असून कोणीच नियम पाळताना दिसत नाही.

-------------------

धामणगाव तालुक्यातील ग्रामीण घरकुलापासून वंचित

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये ‘ड’ घरकुलांची यादी प्रलंबित आहे. या वंचितांना घरकुल नसल्यामुळे पावसाळा उन्हाळा उघड्यावर काढावा लागतो. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष नाही. हातावर आणून पानावर खाणाºया या सर्वसामान्य गरिबांना घरकुल नाही. पावसाळ्यानंतर त्यांना घरकुल मिळाले नाही.

--------------------

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

अमरावती : रुग्णालयामध्ये उपलब्ध असणाºया सुविधांचा वापर करून त्याच ठिकाणी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना प्रशिक्षण व रोजगार मिळवून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

------------

कडबी बाजार परिसरात वीज पुरवठा खंडित

अमरावती: महावितरणच्या कडबी बाजार वितरण केंद्र व आजूबाजूच्या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याला तांत्रिक दोष कारणीभूत नसून मानवी हस्तक्षेपामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे. महावितरण वीज ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी बांधिल आहे परंतू नागरीकांनीही सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केले आहे.

--------------