शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:11 IST

कोरोना मदत योजनेला मुदतवाढ अमरावती : कोरोना नियंत्रणाचे काम करताना मृत्यू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये ...

कोरोना मदत योजनेला मुदतवाढ

अमरावती : कोरोना नियंत्रणाचे काम करताना मृत्यू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मदत करण्याच्या योजनेला ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३० जून या काळात कोरोना नियंत्रणाच्या कामात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये दिले जातील.

--------------

फोटो पी १६ आसेगाव

पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण

आसेगाव पूर्णा : कोरोना काळात पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वच जण जिवाचे रान करत आहेत. गावोगावी भंगार जमा करणारा भंगारवाला तरुण आपल्या आईसोबत जिवावर उदार होऊन आयुष्याचा गाडा ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागात हे चित्र नवे नाही. लॉकडाऊनने गरिबांचे जिणे मुश्किल केले आहे.

--------------

तिवसा तालुक्यात लसीकरण केंद्र वाढवा

कु-हा : तिवसा तालुक्यात लसीकरण केंद्र वाढवा, लसीकरणाची नोंदणी ऑफलाईन करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तिवसा तालुकाध्यक्ष तुषार वाढणकर तहसीलदारांकडे केली. तालुका आरोग्य अधिकारी, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याविषयी जातीने लक्ष द्यावे व तालुक्यात कोविड संसर्ग रोखण्यासंदर्भात तात्काळ लसीचा पुरवठा करुन लसीकरण केंद्र वाढवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

--------------

लसीकरण केंद्रच हॉटस्पॉट होण्याची भीती

आसेगाव पूर्णा : शनिवारी अचलपूर तालुक्यातील येसुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात आले. नागरिकांनी केंद्रावर दुपारी २ ते ३ वाजतादरम्यान प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे ही लसीकरण केंद्रेच कोरोनाची हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

--------------

कडक निर्बंधामुळे शेतकरी सापडला संकटात

शिंदी बु : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदीतील कडक निर्बंधामुळे भाजीबाजार आणि चिल्लर विक्री पूर्णतः बंद आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना डिझेल देण्याचे आदेश दिले तरीही पेट्रोल पंपधारक शेतकऱ्यांना डिझेल देण्यास मनाई करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची चाके डिझेलविना थांबल्याने मशागतीची कामे ठप्प झाली आहे. सर्व बाजार समित्या, भाजी मार्केट पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे चिल्लर भाजी विक्रेते व हात मजुरी करणारे अडचणीत आहेत. अशात शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच पडून असल्याने टरबूज, मिरची आणि वांगीची नासाडी होत आहे.

--------------

लग्नात र्गदी झाल्यास कारवाई

पुसला : २२ मेपर्यंत सर्व स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरूपात करण्याचे आदेश आहेत. लग्नात मिरवणूक, जेवणावळी, वाजंत्री पथक यांना परवानगी नाही. लग्नाला केवळ १५ व्यक्ती उपस्थित राहू शकतील व लग्नसोहळा दोन तासांत आटोपणे आवश्यक आहे. बेकायदेशीरपणे लग्नसोहळा पार पडल्यास कारवाई होईल. ग्रामस्तरीय दक्षता समित्यांवर ती जबाबदारी टाकण्यात आली आहे.

--------------

शेतकऱ्यांनाही द्या टोकन, व्हॉट्सॲप ग्रुप करा

शेंदूरजनाघाट : २२ मे पर्यंत लागू असणाऱ्या लॉकडाउनमध्ये कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित सर्व दुकानांनी सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत घरपोच सेवा द्यावी. तालुका कृषी अधिकारी यांनी दुकानदार, शेतकरी बांधव यांचे व्हाॅटसॲप ग्रुप तयार करून टोकन सिस्टीम अवलंबवावी. त्याचप्रमाणे, आवश्यक निविष्ठा बांधावरही पोहोचविण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे कृषी केंद्रधारकांची मोठी पंचाईत झाली आहे.