शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

जिल्ह्यात राबविले जाणार सुजलाम् अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:16 IST

हगणदरीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे साध्य करण्यासाठी आणि ग्रामीण भागात शोषखड्ड्यांच्या निर्मितीतून सांडपाणी व्यवस्थापन करणे या बाबींचा समावेश ...

हगणदरीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे साध्य करण्यासाठी आणि ग्रामीण भागात शोषखड्ड्यांच्या निर्मितीतून सांडपाणी व्यवस्थापन करणे या बाबींचा समावेश आहे. या कालावधीत जिल्ह्यात अभियान कालावधीत किमान ४० हजार शोषखड्डे तयार करण्याचे लक्ष निश्चित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतनिहाय उदिष्टे निश्चित करण्यात आले आहे.

हगणदरीमुक्तीची शाश्वतता टिकविणे आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक इतक्या शोषखड्डयांचे बांधकाम पूर्ण करणे, यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करावा. हगणदरीमुक्ती (ओ.डी.एफ.) ची शाश्वतता टिकविणे आणि नियोजित शोषखड्ड्यांचे बांधकाम करण्यासाठी १०० दिवसांचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायत तयार करणार आहे. नादुरुस्त शौचालयांची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. नादुरुस्त शौचालय

अंतर्गत शौचालय दुरुस्त करण्यासाठी कुटुंबांची निवड करण्यासाठी द्वितीयस्तर हगणदरीमुक्ती ग्रामपंचायत पडताळणी पूर्ण करावी तसेच

सर्व नवीन कुटुंबांकडे शौचालय असल्याबाबतची खात्री करावी. हे अभियानाबाबत लोकांना माहिती देण्यासाठी व सहभागासाठी आणि कृतीत

उतरविण्यासाठी वृत्तपत्रे, सोशल मीडिया व इतर माध्यमातून अभियानाची जनजागृती करण्यात येणार आहे. अभियानाचे जिल्हास्तरावरून संनियंत्रण करण्यासाठी अभियान कालावधीत जिल्हास्तरावरील जिल्हा कक्ष आणि विविध विभागांचे

खातेप्रमुखांच्या क्षेत्रीय भेटी होणार आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ मार्गदर्शिकेप्रमाणे हगणदरीमुक्त शाश्वतता आणि

शोषखड्ड्यांचे बांधकाम यासाठी लागणारा निधी स्वच्छ भारत मिशन पंधरावा वित्त आयोग किंवा मनरेगा यांच्या माध्यमातून उपलब्ध केला जाणार आहे.

पूर्ण झालेल्या शोषखड्ड्यांची ( वैयक्तिकस्तर व सार्वजनिक स्तर ) माहिती स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत उपलब्ध असलेल्या एसबीएम-२.० मोबाईल ॲप्लिकेशनमधून नोंदणी करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम् अभियान

यशस्वी होईल, यादृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व गटविकास आधिकारी यांना देण्यात आल्या आहेत, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी सांगितले.

बाॅक्स

जिल्ह्यात १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम् अभियान अंतर्गत हगणदरीमुक्त शाश्वतता टिकविण्यासाठी जिल्ह्यात ४० हजार शोषखडे निर्मिती करणार आहोत.

- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी