शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

संप, आत्महत्या हा पर्याय नव्हे !

By admin | Updated: February 7, 2015 00:04 IST

मानवाचे जीवन ईश्वराची देण असून प्रत्येक संकटावर मात करीत एकमेकास सहकार्य करणे हा मानव धर्म आहे.

अमरावती : मानवाचे जीवन ईश्वराची देण असून प्रत्येक संकटावर मात करीत एकमेकास सहकार्य करणे हा मानव धर्म आहे. त्यामुळे जगताना कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास संप किंवा आत्महत्या हा पर्याय नाही, असा मंत्र मुंबईचे डबेवाला असोशिएशनचे संचालक रघुनाथ मेडगे यांनी शुक्रवारी येथे दिला.येथील दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित कीर्ती तंत्रनिकेतन व विक्रशीला तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय व्याख्यानात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी विशेष अतिथी म्हणून राजेंद्र गवई, बाळासाहेब अढाऊ, पवन देशमुख, उमेश ठाकरे आदी उपस्थित होते. पुढे विद्यार्थ्यांना मुंबई डब्बेवाल्यांच्या व्यवस्थापनाची माहिती देताना मेडगे यांनी १८९० पासून सुरु झालेल्या या व्यवसायाचा प्रवास आजतागायत सुरु आहे. ऊन, वारा, पाऊस काहीही असो मुंबईकरांना दुपारी साडेबारा वाजता जेवणाचा डबा त्यांच्या हाती देण्याची किमया डबेवाले करतात. दरदिवसाला डबेवाला १५० कि.मी. प्रवास करतात. ५ हजार डबेवाले तेथे कार्यरत आहेत. डबे वाटपाचे अचूक नियोजनासाठी ८०० चमू (मोकादम) कार्यरत आहेत. मुंबईतील दोन लाख डब्यांची ने- आण करताना ज्या व्यक्तीचा डबा त्याच व्यक्तीच्या हाती मिळावा, यासाठी रंग संकेत (कलर कोड) आहे. एका डब्बेवाल्याकडे ४० डब्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डबेवाल्यांच्या व्यवस्थापनात ८५ टक्के निरक्षर तर १५ टक्के साक्षर आहेत. डबेवाल्यांच्या व्यवस्थापनात मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल रेल्वे ही मैलाचा दगड ठरत असल्याचे मेडगे यांनी सांगितले. मुंबई धावत असताना याच धावण्याला जाती, धर्माचे बंधन तोडून अधिक गती देण्याचे काम डबेवाला करीत आहे.