शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

उर्ध्व वर्धात पुरेसा पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:01 IST

सिंचनाकरिता जरी पाणी देणे बंद असले तरी उर्ध्व वर्धा प्रकल्पात अमरावती शहराला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा अद्यापही शिल्लक आहे. चिंता करण्याचे काहीही कारण नाही. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे मत उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकार्यकारी अभियंता : शहराला वर्षभर पुरेल, उद्योगासाठी राखीव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सिंचनाकरिता जरी पाणी देणे बंद असले तरी उर्ध्व वर्धा प्रकल्पात अमरावती शहराला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा अद्यापही शिल्लक आहे. चिंता करण्याचे काहीही कारण नाही. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे मत उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी व्यक्त केले.१६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह जलसंपदा विभाग व इतर विभागामार्फेत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने धरणातील पाणीसाठ्यात सतत घट होत असून भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे किंवा नाही या अनुषंगाने माहिती घेतली असता, अप्पर वर्धा धरणात २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये जिवंत पाणीसाठा हा १२० दलघमी असून वर्षभरात फक्त पिण्याकरिता ३६ दलघमी पाणीसाठ्याची मागणी असते. तीन महिन्यांनंतर पाऊस पडणारच आहे. तीन महिने १० दलघमी एवढ्या पाणीसाठ्याची पिण्याकरिता शहरात मागणी आहे. वर्षभरात ४५ ते ५० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होते. सोफीया या वीज निर्मितीच्या उद्योगाकरिता प्रकल्पातून वर्षभरात २० दलघमीची मागणी असते. जुलै महिन्यापर्यंत फक्त ८ दलघमी पाणीसाठ्याची सोफीयाकरिता मागणी असून तो पाणीसाठा आरक्षित ठेवला आहे. प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असली तरी अमरावती शहराला जो पाणीसाठा धरणातून देण्यात येतो त्यासंदर्भाची शहरात टंचाई राहणार नाही. पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांतील पाणीसाठ्यांची स्थिती चिंताजनक आहे. त्याकारणाने पाणीसाठा जरी असला तरी पाण्याची बचत करणे अनिवार्य असल्याचे मत जलजागृती सप्ताह निमित्त अनेक वरिष्ठ अभियंत्यांनी व्यक्त केले आहे.