शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

उर्ध्व वर्धात पुरेसा पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:01 IST

सिंचनाकरिता जरी पाणी देणे बंद असले तरी उर्ध्व वर्धा प्रकल्पात अमरावती शहराला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा अद्यापही शिल्लक आहे. चिंता करण्याचे काहीही कारण नाही. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे मत उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकार्यकारी अभियंता : शहराला वर्षभर पुरेल, उद्योगासाठी राखीव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सिंचनाकरिता जरी पाणी देणे बंद असले तरी उर्ध्व वर्धा प्रकल्पात अमरावती शहराला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा अद्यापही शिल्लक आहे. चिंता करण्याचे काहीही कारण नाही. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे मत उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी व्यक्त केले.१६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह जलसंपदा विभाग व इतर विभागामार्फेत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने धरणातील पाणीसाठ्यात सतत घट होत असून भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे किंवा नाही या अनुषंगाने माहिती घेतली असता, अप्पर वर्धा धरणात २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये जिवंत पाणीसाठा हा १२० दलघमी असून वर्षभरात फक्त पिण्याकरिता ३६ दलघमी पाणीसाठ्याची मागणी असते. तीन महिन्यांनंतर पाऊस पडणारच आहे. तीन महिने १० दलघमी एवढ्या पाणीसाठ्याची पिण्याकरिता शहरात मागणी आहे. वर्षभरात ४५ ते ५० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होते. सोफीया या वीज निर्मितीच्या उद्योगाकरिता प्रकल्पातून वर्षभरात २० दलघमीची मागणी असते. जुलै महिन्यापर्यंत फक्त ८ दलघमी पाणीसाठ्याची सोफीयाकरिता मागणी असून तो पाणीसाठा आरक्षित ठेवला आहे. प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असली तरी अमरावती शहराला जो पाणीसाठा धरणातून देण्यात येतो त्यासंदर्भाची शहरात टंचाई राहणार नाही. पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांतील पाणीसाठ्यांची स्थिती चिंताजनक आहे. त्याकारणाने पाणीसाठा जरी असला तरी पाण्याची बचत करणे अनिवार्य असल्याचे मत जलजागृती सप्ताह निमित्त अनेक वरिष्ठ अभियंत्यांनी व्यक्त केले आहे.