शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

उर्ध्व वर्धात पुरेसा पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:01 IST

सिंचनाकरिता जरी पाणी देणे बंद असले तरी उर्ध्व वर्धा प्रकल्पात अमरावती शहराला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा अद्यापही शिल्लक आहे. चिंता करण्याचे काहीही कारण नाही. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे मत उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकार्यकारी अभियंता : शहराला वर्षभर पुरेल, उद्योगासाठी राखीव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सिंचनाकरिता जरी पाणी देणे बंद असले तरी उर्ध्व वर्धा प्रकल्पात अमरावती शहराला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा अद्यापही शिल्लक आहे. चिंता करण्याचे काहीही कारण नाही. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे मत उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी व्यक्त केले.१६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह जलसंपदा विभाग व इतर विभागामार्फेत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने धरणातील पाणीसाठ्यात सतत घट होत असून भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे किंवा नाही या अनुषंगाने माहिती घेतली असता, अप्पर वर्धा धरणात २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये जिवंत पाणीसाठा हा १२० दलघमी असून वर्षभरात फक्त पिण्याकरिता ३६ दलघमी पाणीसाठ्याची मागणी असते. तीन महिन्यांनंतर पाऊस पडणारच आहे. तीन महिने १० दलघमी एवढ्या पाणीसाठ्याची पिण्याकरिता शहरात मागणी आहे. वर्षभरात ४५ ते ५० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होते. सोफीया या वीज निर्मितीच्या उद्योगाकरिता प्रकल्पातून वर्षभरात २० दलघमीची मागणी असते. जुलै महिन्यापर्यंत फक्त ८ दलघमी पाणीसाठ्याची सोफीयाकरिता मागणी असून तो पाणीसाठा आरक्षित ठेवला आहे. प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असली तरी अमरावती शहराला जो पाणीसाठा धरणातून देण्यात येतो त्यासंदर्भाची शहरात टंचाई राहणार नाही. पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांतील पाणीसाठ्यांची स्थिती चिंताजनक आहे. त्याकारणाने पाणीसाठा जरी असला तरी पाण्याची बचत करणे अनिवार्य असल्याचे मत जलजागृती सप्ताह निमित्त अनेक वरिष्ठ अभियंत्यांनी व्यक्त केले आहे.