शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

अकाली पावसाचा फटका

By admin | Updated: May 29, 2017 00:11 IST

शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान झालेल्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला.

ठिकठिकाणी नुकसान : दोन दिवस तूर खरेदी बंद, वृक्ष उन्मळली; वीजपुरवठा खंडितलोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार/ नांदगाव खंडेश्वर : शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान झालेल्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला. विशेष म्हणजे बाजार समितीमध्ये विक्रीस असलेली तूर भिजल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. नांदगावच्या बाजार समितीत नाफेडने खरेदी केलेली तूर ओलीचिंब झाली. अनेक शेतकऱ्यांच्या बाजार समितीच्या आवारात खुल्या मैदानात असलेल्या तुरीच्या गंजीखाली पाणी शिरल्याने शेतकऱ्यांनासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसला. पावसामुळे दोन दिवस तूर खरेदी बंद असल्याने महिनाभरापासून तूर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आणखी दोन दिवस तूर मोजणीसाठी थांबावे लागणार आहे.बाजार समितीत मोठ्या प्रमाणात तुरीची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना जागेअभावी बाजार समितीच्या आवारात खुल्या मैदानात तूर ठेवावी लागली. ज्या तुरीच्या गंजींना ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले होते. अशा गंजीच्या खालून पानी वाहिल्याने नुकसान झाले. चांदूरबाजार तालुक्यात लाखनवाडी, आसरा या गावांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिसरात वादळी पावसासह गारपीट झाली. वादळाचा वेग अधिक असल्याने नुकसान झाले. लाखनवाडी गावात नागरिकांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाले. विजेचे तार तुटून पडल्यामुळे विजपुरवठा खंडित झाला. विजेचे चार पोल व अनेक वृक्ष कोलमडून पडले. या घटनेची माहिती मिळताच नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांनी पीक नुकसानीचा पंचानामा केला. चांदूरबाजार तालुक्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातकुली तालुक्यात वादळी पावसामुळे मोठी झाडे कोसळली व वीजपुरवठा खंडित झाला. तिवसा येथील बाजार समितीमध्ये ढगाळ वातावरणामुळे तूर मोजणी बंद करण्यात आल्याने व त्यावर ताडपत्री झाकून ठेवल्याने मोठे नुकसान टळले. मोशी तालुक्यात रात्री उशिरा पाऊस पडला. मात्र आसपासच्या परिसरात वादळी पावसाची माहिती मिळाल्याने नागरिक सजग होते. कांदा पिकाला नुकसान अकाळी पावसामुळे बाजार समितीच्या यार्डात ठेवलेल्या तुरीचे नुकसान झाले. शेतातील उभ्या कादा पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला. कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकरी कांद्याची रस्त्यावर विक्री करीत आहेत. मात्र कांदा ओला झाल्याने तो सडण्याची शक्यता असून त्याचा भाव कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.