शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

अकाली पावसाचा फटका

By admin | Updated: May 29, 2017 00:11 IST

शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान झालेल्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला.

ठिकठिकाणी नुकसान : दोन दिवस तूर खरेदी बंद, वृक्ष उन्मळली; वीजपुरवठा खंडितलोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार/ नांदगाव खंडेश्वर : शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान झालेल्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला. विशेष म्हणजे बाजार समितीमध्ये विक्रीस असलेली तूर भिजल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. नांदगावच्या बाजार समितीत नाफेडने खरेदी केलेली तूर ओलीचिंब झाली. अनेक शेतकऱ्यांच्या बाजार समितीच्या आवारात खुल्या मैदानात असलेल्या तुरीच्या गंजीखाली पाणी शिरल्याने शेतकऱ्यांनासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसला. पावसामुळे दोन दिवस तूर खरेदी बंद असल्याने महिनाभरापासून तूर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आणखी दोन दिवस तूर मोजणीसाठी थांबावे लागणार आहे.बाजार समितीत मोठ्या प्रमाणात तुरीची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना जागेअभावी बाजार समितीच्या आवारात खुल्या मैदानात तूर ठेवावी लागली. ज्या तुरीच्या गंजींना ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले होते. अशा गंजीच्या खालून पानी वाहिल्याने नुकसान झाले. चांदूरबाजार तालुक्यात लाखनवाडी, आसरा या गावांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिसरात वादळी पावसासह गारपीट झाली. वादळाचा वेग अधिक असल्याने नुकसान झाले. लाखनवाडी गावात नागरिकांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाले. विजेचे तार तुटून पडल्यामुळे विजपुरवठा खंडित झाला. विजेचे चार पोल व अनेक वृक्ष कोलमडून पडले. या घटनेची माहिती मिळताच नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांनी पीक नुकसानीचा पंचानामा केला. चांदूरबाजार तालुक्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातकुली तालुक्यात वादळी पावसामुळे मोठी झाडे कोसळली व वीजपुरवठा खंडित झाला. तिवसा येथील बाजार समितीमध्ये ढगाळ वातावरणामुळे तूर मोजणी बंद करण्यात आल्याने व त्यावर ताडपत्री झाकून ठेवल्याने मोठे नुकसान टळले. मोशी तालुक्यात रात्री उशिरा पाऊस पडला. मात्र आसपासच्या परिसरात वादळी पावसाची माहिती मिळाल्याने नागरिक सजग होते. कांदा पिकाला नुकसान अकाळी पावसामुळे बाजार समितीच्या यार्डात ठेवलेल्या तुरीचे नुकसान झाले. शेतातील उभ्या कादा पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला. कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकरी कांद्याची रस्त्यावर विक्री करीत आहेत. मात्र कांदा ओला झाल्याने तो सडण्याची शक्यता असून त्याचा भाव कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.