शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

लॉकडाऊनवर असाही तोडगा! जनावरांचा बाजार आता सोशल मीडियावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 10:24 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आठवडी बाजार बंदच आहेत. त्यामुळे शेतकरी आता गुरांची खरेदी-विक्री सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत.

ठळक मुद्देबैल बाजार बंद झाल्याने बळीराजा हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आठवडी बाजार बंदच आहेत. त्यामुळे शेतकरी आता गुरांची खरेदी-विक्री सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत. सोशल मीडियावर आपल्या जनावरांचे फोटो टाकून त्याखाली आपला मोबाइल क्रमांक दिला जातो. ज्या शेतकऱ्यांना जनावरांची खरेदी करायची आहे, त्यांनी मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे सोशल मीडियावरही आता गुरांची खरेदी-विक्री होताना दिसत आहे.

खरीप हंगाम महिनाभरावर आल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गुरांचा बाजार बंद आहे. त्यामुळे बैलांची खरेदी- विक्री बंद झालेली आहे. परिणामी वर्षभरात एक कोटीची होणारी उलाढाल ठप्प झाल्याने बैलांद्वारे केली जाणारी शेती मशागतीची कामे अडचणीत सापडली आहेत. हवामान खात्याने यंदा मान्सून हा जूनच्या १ तारखेला धडकणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आसेगावासह परिसरातील शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. सद्यस्थितीत शिवारात ट्रॅक्टरद्वारे नांगरणीच्या कामांना वेग आला आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत असल्याचे दिसून येते. शेतकरी बैलांच्या साह्याने यंदा मशागतीची कामे करण्यास प्राधान्य देत आहे. एप्रिल व मे महिन्यांत बैलजोडी खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असताना मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलबाजार बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही शेतकरी वैयक्तिक स्तरावर बैलांचा शोध घेत आहेत. अशातच बैलांचे भावदेखील प्रचंड वाढले आहेत.दोन-तीन वर्षांपासून नापिकी होत असल्यामुळे चाराटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे दूध व्यवसायाची जनावरे विक्री केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय उरलेला नाही. विक्री व खरेदी करण्याकरिता बैलबाजार पेरणीच्या तोंडावर खुला करण्यात यावा.- राजेंद्र नवले, शेतकरी, हिवरा पूर्णादोन-तीन एकर शेती असणाऱ्यांना यंत्राच्या साह्याने शेती करणे परवडत नाही. त्यामुळे बैलजोडीशिवाय लहान शेतकऱ्यांना पर्याय नाही. मात्र, लॉकडाऊनमुळे बैलबाजार बंद असल्याने बैलजोडी खरेदी-विक्री करण्याकरिता पेच निर्माण होत आहे.- योगेश कोळस्कर, शेतकरी, आसेगाव पूर्णा

 

टॅग्स :agricultureशेती