शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अनुदान बायोमेट्रिक पद्धतीने

By admin | Updated: March 26, 2016 00:14 IST

तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अनुदान आता लाभार्थ्यांना थेट गावातच मिळणार आहे.

पायपीट थांबणार : अचलपूर, चांदूरबाजारात प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्पचांदूरबाजार : तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अनुदान आता लाभार्थ्यांना थेट गावातच मिळणार आहे. परिणामी या योजनांमधील वृद्ध, अपंग व महिला लाभार्थ्यांची अनुदानासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. त्यासाठी तालुक्यात बायोमेट्रीक प्रकल्प राबविण्यात येणार असून या प्रकल्पाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.सामाजिक अर्थसहाय्य योजनेद्वारे तालुक्यात आजमितीस श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, संजय गांधी अर्थसहाय्य व अपंगांना लाभ दिला जातो. सद्यस्थितीत तालुक्यातील २८ हजार ५३५ लाभार्थ्यांना हा लाभ मिळत आहे. यासर्व लाभार्थ्यांना दर महिन्याला अनुदानप्राप्तीसाठी नेमून दिलेल्या बँकांपर्यंत पायपीट करावी लागते. बरेचदा अनुदान खात्यात जमा होण्यास विलंब होतो. त्यामुळे सर्वच लाभार्थ्यांना बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे लाभार्थ्यांचा वेळ व प्रवासाचा खर्च व्यर्थ जातो. यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना खात्यात जमा झालेले अनुदान काढण्यासाठी कुणाची तरी मदत घ्यावी लागते. अशा मदतनिसांना ‘एजंट’ म्हटले जाते. हा एजंट खात्यात अनुदान जमा झाले की त्याच्या परिचयातील दहा ते बारा लाभार्थ्यांना बँकेमध्ये सोबत घेऊन येतो. त्यांना बँक खात्यातील अनुदान काढून देण्यास मदत करतो. त्या मोबदल्यात हा एजंट लाभार्थ्यांकडून प्रत्येकी १०० रुपये घेतो. आता बायोमेट्रिक प्रकल्पामुळे लाभार्थ्यांना गावांतच अनुदान मिळणार असल्यामुळे एजंटाद्वारे त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबणार आहे. तसेच बोगस लाभार्थ्यांची संख्याही बायोमेट्रीकमुळे उघडकीस येणार असल्याने शासनाचे आर्थिक नुकसान थांबविण्यासही मदत मिळणार आहे. हा बायोमेट्रिक प्रकल्प तालुक्यात आयसीआयसीआय बँक व फिनोपेटेक लिमिटेड कंपनी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे. प्रकल्पावर बँकेतर्फे ज्ञानेश्वर लिंबतुरे व कंपनीकडून राज्य प्रमुख दिग्विजय देशमुख काम पाहात आहेत. लाभार्थ्यांना गावांतच अनुदान प्राप्त होण्यासाठी आयसीआयसीआय बँकेमार्फत खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती संगणकावर नोंदवून घेण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी लाभार्थ्याचे आधारकार्ड आवश्यक आहे. तसेच कंपनीकडून लाभार्थ्यांची गावनिहाय आकडेवारी घेणे सुरू असून एक हजार लाभार्थ्यांसाठी एक पॅनल तयार केले जाईल. या माध्यमातून गावातील ग्रामपंचायत कार्यालयात आधारकार्ड व बायोमेट्रीकवर अंगठा ठेऊन लाभार्थ्याची ओळख पटल्यानंतर त्याला अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्यात २५ ते ३० पॅनल तयार करण्यात येणार आहेत. या आधी हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आला आहे. त्याठिकाणी चांगले परिणाम दिसून आल्यानंतर अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर चांदूरबाजार व अचलपूर तालुक्याची हा प्रकल्प राबविण्यासाठी निवड करण्यात आली आहे. प्रकल्प त्वरीत कार्यान्वित होण्यासाठी लाभार्थ्यांनी आधारकार्डसह संपूर्ण माहिती तहसील कार्यालयात देणे आवश्यक आहे.या प्रकल्पामुळे निराधार योजनांच्या लाभासाठी लाभार्थ्यांची होणारी वणवण थांबण्यास मदत होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)